शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
5
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
6
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
7
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
8
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
9
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
10
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
11
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
12
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
13
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
14
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
15
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
16
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
17
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
18
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
19
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
20
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

भाजपाला परिस्थिती अनुकूल नाही! - ओमर अब्दुल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 04:34 IST

भाजपाचा आपण अजिंक्य असल्याचा दावा आता चालणार नाही. देशातील वातावरण आता बदलले असून भाजपाला राममंदिराचे प्रेम हे निवडणुका जिंकण्यात जेवढे असते तेवढेच आहे

भाजपाचा आपण अजिंक्य असल्याचा दावा आता चालणार नाही. देशातील वातावरण आता बदलले असून भाजपाला राममंदिराचे प्रेम हे निवडणुका जिंकण्यात जेवढे असते तेवढेच आहे, असे जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले. अब्दुल्ला म्हणाले, गेल्या साडेचार वर्षांत काही केले नाही तर आताही काही होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना तुमच्या बँक खात्यात लाखो रूपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, तसे झाले नाही. या परिस्थितीत भाजपाने आणखी आश्वासने दिली तरी लोकांना वाटेल आमची फसवणूक होतेय. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च करतात व मोदींच्या भाषणांकडे लोक ओढले जातात. परंतु, यंदा वातावरण भाजपाच्या बाजूने नाही हे सिद्ध झाले आहे.राहुल गांधींची उंची वाढलीमध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड निवडणूक निकालानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची राजकीय उंची वाढली आहे, असे सांगून अब्दुल्ला देशाचे राजकारण आणि प्रादेशिक पक्षांचे आव्हान यावर चर्चेत म्हणाले, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची महत्त्वाची भूमिका असेल व काँग्रेसला त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागेल. ज्या राज्यांत प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व आहे तेथे काँग्रेसला त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागेल. ज्या राज्यांत भाजपाशी काँग्रेसची थेट लढत आहे तेथे इतर पक्षांना त्याला सोबत घेण्यास आक्षेप असण्याचे कारण नाही.अब्दुल्ला म्हणाले, २०१४ नंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये परिस्थिती फारच बिघडली आहे. मोदी यांनी लवकर निवडणुका घ्याव्यात. तीन राज्यात झालेल्या पराभवामुळे भीतीतून निवडणुका न घेण्यासाठी राज्यपालांवर भाजपा दबाब आणू शकतो, अशी आम्हाला भीती आहे. लोकशाहीत लोकांवर विश्वास ठेवून सरकार बनवण्याची संधी दिली पाहिजे व जे सरकार येईल त्याला काम करण्याची संधी द्यायला हवी. सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत सहा महिन्यांची मुदत ठेवली आहे. पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाव्यात.जम्मू आणि काश्मीरमध्ये त्यांना सरकार स्थापन करण्याची संधी न मिळाल्याबद्दल अब्दुल्ला यांनी खेद व्यक्त केला. राज्यपालांना मी तीन पक्षांच्या पाठिंब्याची चिठ्ठी पाठवली. परंतु, राजभवनमध्ये फॅक्स मशीन नसल्यामुळे असे होऊ शकले नाही. आमचे नोंदणीकृत तीन पक्ष होते. एकाकडे २९, दुसऱ्याकडे १५ व तिसºयाकडे १२ सदस्य होते. हे तिघे मिळून आम्ही बहुमताच्या संख्येपेक्षाही पुढे होतो तरी आम्हाला नकार मिळाला. कारण होते की, आमचे राजकीय विचार समान नाहीत. एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा दावा करणाºयांचे राजकीय विचार एकसारखे आहेत की नाही हे पाहणे राज्यपालांचे काम नाही. हाच जर कायदा असेल तर बिहारमध्ये एकमेकांविरुद्ध लढलेल्या भाजपा व जनता दल (संयुक्त) आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये एकमेकांविरुद्ध लढलेल्या भाजपा व पीपल्स डेमोक्रॅटिक पक्ष यांचेही सरकार यायला नको होते. बहुमत तर विधानसभेत सिद्ध करायचे असते. राज्यपालांचे काम एवढेच असते की, पक्षाकडे आवश्यक तेवढे संख्याबळ आहे की नाही हे पाहायचे.काश्मिरी पंडित खोºयात परतल्याशिवाय जम्मू आणि काश्मीर अपूर्ण आहे. ते परत येतील, असे वातावरण बनवणे हे सगळ्यांचे कर्तव्य आहे. आम्ही त्यासाठी बरेच प्रयत्न केले. दुर्दैवाने २०१४ नंतर खोºयातील वातावरण फारच वाईट झाले. पंडितांनी मनमोकळेपणे यावे. शेते घ्यावीत. दहशतवादाच्या आधी लोक जसे एक राहायचे तसे वातावरण बनावे.भारताचा विश्वास जिंकावापाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे मला माहीत नाहीत. त्यांचा पक्षही नवा आहे. खान यांना काही करून दाखवावे लागेल. खान हे लष्कराने त्या पदावर बसवलेले पंतप्रधान असून त्याच्याच सांगण्यावर ते चालतात अशी आमच्या देशात शंका आहे. या वातावरणात परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांना काही पावले उचलावी लागतील. भारतात हल्ला करणारे पाकिस्तानात उजळ माथ्याने फिरावेत हे योग्य नाही. आतापर्यंत आम्हाला धोकाच झाला असून आम्ही जेव्हा एक पाऊल पुढे टाकतो तेव्हा चार पावले आम्हाला मागे पडावे लागले आहे. दोन्ही देशांच्या सरकारांना हे लक्षात घ्यावे लागेल की, आपण मित्र बदलू शकतो. परंतु, शेजारी नाही. पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी प्रशंसा केली. शब्दांकन : नितीन अग्रवालमुलाखत : सौरभ शर्मा

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपा