शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

लडाख सीमारेषेवर स्थिती सामान्य; चीनचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 02:26 IST

संबंध सुुधारण्यासाठी पावले उचला

नवी दिल्ली : लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आता पुन्हा एकदा स्थिती सामान्य झाल्याचा चीनने दावा केला आहे. ही स्थिती भारताने स्वीकारून संबंध सुधारण्यासाठी पावले उचलावीत, अशी चीनची मागणी आहे, तर लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर एप्रिल महिन्यात होती तशीच स्थिती पुन्हा कायम राखावी, असा भारताचा आग्रह आहे.तशा आशयाची वक्तव्ये परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी या महिन्यात केली होती. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्याच्या माघारीसाठी पावले उचलली असून, तिथे शांतता निर्माण झाल्याचा चीनचा दावा आहे. भारत व चीनमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्याला ७० वर्षे झाली आहेत. हा प्रसंग दोन्ही देशांनी आपापसातील सीमा तंटा व इतर मतभेद बाजूला ठेवून साजरा करायला हवा, असे चीनला वाटते. भारताने राहावे सावधअरुणाचल प्रदेशमध्ये पंतप्रधानांसह अन्य भारतीय नेते जे दौरे करतात, त्याला चीनने वेळोवळी आक्षेप घेतले आहेत. हा भूभाग आमचाच असल्याचा दावा चीनने सातत्याने केला आहे. त्यामुळे भारताने अतिशय सावध राहायला हवे, असे भारतीय संरक्षण तज्ज्ञांना वाटते.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाख