शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

‘मुर्शिदाबादमध्ये परिस्थिती चिंताजनक, हिंदू होडीमधून करताहेत पलायन’, ममता बॅनर्जी सरकारवर चौफेर टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 11:33 IST

Murshidabad Violence Update: केंद्र सरकारने नुकत्याच पारित करून घेतलेल्या वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याविरोधात देशातील काही भागात विरोध होत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून, संतप्त जमावाने जाळपोळ, दगडफेक करत सार्वजनिक मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे.

केंद्र सरकारने नुकत्याच पारित करून घेतलेल्या वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याविरोधात देशातील काही भागात विरोध होत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून, संतप्त जमावाने जाळपोळ, दगडफेक करत सार्वजनिक मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. तसेच या हिंसाचारादरम्यान, तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुर्शिदाबादमध्ये परिस्थिती तणावपूर्ण असून, या हिंसाचारावरून भाजपाने राज्यातील ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच येथील भयावह परिस्थितीमुळे अनेक हिंदू कुटुंब पलायन करत आहेत, असा आरोपही केला आहे.

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील काही भागात मागच्या काही दिवसांपासून वक्फविरोधात हिंसक विरोध आंदोलनं होत आहेत. यादरम्यान, हिंसक जमावाने शनिवारी पिता-पुत्रासह तीन जणांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. हे पिता-पुत्र हिंदू-देवी देवतांच्या मूर्ती घडवायचे अशी माहिती समोर आली आहे, दरम्यान, हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी बीएसएफच्या आठ कंपन्या आणि सुमारे  एक हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये डीजींपासून ते एएसपी स्तरापर्यंतच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

यादरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात नवा वक्फ बोर्ड सुधारणा कायदा राज्यात लागू केला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते आणि भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी बंगालमध्ये हिंदू सुरक्षित नसल्याचा आणि परिस्थिती खूपच गंभीर असल्याचा आरोप केला आहे.

मुर्शिदाबाद हिंसाचारावरून सुवेंदू अधिकारी यांनी दावा केला की, धार्मिक कट्टरतावाद्यांच्या भीतीमुळे पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील धुलियन क्षेत्रामधून ४०० हून अधिक हिंदूंनी आपलं घर सोडणं भाग पडलं आहे. भयग्रस्त कुटुंबांनी नदी पार करून माल्दा जिल्ह्यातील बैष्णवनगर येथील देओनापूर-सोवापूर ग्रामपंचायत क्षेत्रामधील ग्रामपंचायत क्षेत्रातील लालपूर हायस्कूलमध्ये आश्रय घेतला आहे.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालwaqf board amendment billवक्फ बोर्डAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसBJPभाजपा