शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

'मोदी... मोदी... Yes पापा, एनी डेव्हलपमेंट NO पापा', देशाची सत्य परिस्थिती हीच',

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 11:09 IST

मोदी सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध करत पंजाबमधील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला

ठळक मुद्देमोदी सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध करत पंजाबमधील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला

मुंबई -  केंद्र सरकारने तीन नवीन कृषी विधेयकांना संसंदेच्या दोन्ही सभागृहात मंजुरी दिली आहे. मोदी सरकारच्या या विधेयकांना काँग्रेससह इतरही अनेक पक्षांनी विरोध केला आहे. विशेष म्हणजे पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी या विधेयकांना मोठ्या प्रमाणात विरोध केला असून शेतकरी मोदी सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात लहानांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकजण सहभागी होताना दिसत आहेत. अशाच एका आंदोलनातील चिमुकल्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

मोदी सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध करत पंजाबमधील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच, अकाली दलाच्या नेत्या आणि खासदार हरसीमरत कौर यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामाही दिला आहे. पंजाबमधील काँग्रेससह अकाली दलानेही मोदी सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध करत, शेतकऱ्यांच्या बाजुने आंदोलन उभारले आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये या विधेयकाचा विरोध होत असून शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. मध्य प्रदेशमध्येही काही प्रमाणात मोदींच्या या कृषीविषयक धोरणाला शेतकरी संघटना व राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला आहे. 

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एका चिमुकलीचा फोटो शेअर केला आहे. या चिमुकलीच्या हातात मोदींचे चित्र असलेला कागद असून त्यावर एक कविता लिहिलेली आहे. जॉनी.. जॉनी.. एस पापा या कवितेचं हे विडंबन असून मोदींवर गोड शब्दात टीका करण्यात आली आहे. दिग्विजय सिंह यांनी हा फोटो शेअर करत, सध्या देशातील मूळ परिस्थिती हीच, नर्सरी स्कुलच्या या कवितेतील ओवींप्रमाणेच असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.     

कृषी कायद्याला विरोध, देशाचे नुकसान 

"मी तुम्हाला विचारू इच्छितो, हे कायदे या संकटाच्या काळातच का लागू केले गेले? एवढी घाई कशाची होती? कारण मोदीजींना माहीत आहे, की शेतकरी आणि मजुरांच्या पायावर कुऱ्हाड मारली, की ते घरातून बाहेर निघू शकणार नाहीत. नरेंद्र मोदी केवळ ही व्यवस्था नष्ट करत आहेत. जेथे त्यांनी MSPची हमी द्यायला हवी, तेथे ते या तीन कायद्याच्या माध्यमाने शेतकरी आणि मजुरांना मारत आहेत. त्यांचा गळा कापत आहेत. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना दोनच पर्याय उपलब्ध असतील. ते म्हणजे, अडानी आणि अंबानी. आता आपणच सांगा, एक शेतकरी त्यांच्याशी लढू शकतो? त्यांच्याशी बोलू शकतो? मुळीच नाही, सर्व काही नष्ट होईल. हेच मोदींचे लक्ष्य आहे. येथे मी केवळ शेतकऱ्यांसाठीच उभा नाही, तर भारतातील सर्व जनतेसाठी उभा आहे. कारण केवळ शेतकरी आणि मजुरांचे नाही, तर संपूर्ण देशाचे नुकसान होत आहे," असेही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारFarmerशेतकरीDigvijaya Singhदिग्विजय सिंह