शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

'मोदी... मोदी... Yes पापा, एनी डेव्हलपमेंट NO पापा', देशाची सत्य परिस्थिती हीच',

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 11:09 IST

मोदी सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध करत पंजाबमधील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला

ठळक मुद्देमोदी सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध करत पंजाबमधील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला

मुंबई -  केंद्र सरकारने तीन नवीन कृषी विधेयकांना संसंदेच्या दोन्ही सभागृहात मंजुरी दिली आहे. मोदी सरकारच्या या विधेयकांना काँग्रेससह इतरही अनेक पक्षांनी विरोध केला आहे. विशेष म्हणजे पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी या विधेयकांना मोठ्या प्रमाणात विरोध केला असून शेतकरी मोदी सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात लहानांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकजण सहभागी होताना दिसत आहेत. अशाच एका आंदोलनातील चिमुकल्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

मोदी सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध करत पंजाबमधील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच, अकाली दलाच्या नेत्या आणि खासदार हरसीमरत कौर यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामाही दिला आहे. पंजाबमधील काँग्रेससह अकाली दलानेही मोदी सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध करत, शेतकऱ्यांच्या बाजुने आंदोलन उभारले आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये या विधेयकाचा विरोध होत असून शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. मध्य प्रदेशमध्येही काही प्रमाणात मोदींच्या या कृषीविषयक धोरणाला शेतकरी संघटना व राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला आहे. 

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एका चिमुकलीचा फोटो शेअर केला आहे. या चिमुकलीच्या हातात मोदींचे चित्र असलेला कागद असून त्यावर एक कविता लिहिलेली आहे. जॉनी.. जॉनी.. एस पापा या कवितेचं हे विडंबन असून मोदींवर गोड शब्दात टीका करण्यात आली आहे. दिग्विजय सिंह यांनी हा फोटो शेअर करत, सध्या देशातील मूळ परिस्थिती हीच, नर्सरी स्कुलच्या या कवितेतील ओवींप्रमाणेच असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.     

कृषी कायद्याला विरोध, देशाचे नुकसान 

"मी तुम्हाला विचारू इच्छितो, हे कायदे या संकटाच्या काळातच का लागू केले गेले? एवढी घाई कशाची होती? कारण मोदीजींना माहीत आहे, की शेतकरी आणि मजुरांच्या पायावर कुऱ्हाड मारली, की ते घरातून बाहेर निघू शकणार नाहीत. नरेंद्र मोदी केवळ ही व्यवस्था नष्ट करत आहेत. जेथे त्यांनी MSPची हमी द्यायला हवी, तेथे ते या तीन कायद्याच्या माध्यमाने शेतकरी आणि मजुरांना मारत आहेत. त्यांचा गळा कापत आहेत. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना दोनच पर्याय उपलब्ध असतील. ते म्हणजे, अडानी आणि अंबानी. आता आपणच सांगा, एक शेतकरी त्यांच्याशी लढू शकतो? त्यांच्याशी बोलू शकतो? मुळीच नाही, सर्व काही नष्ट होईल. हेच मोदींचे लक्ष्य आहे. येथे मी केवळ शेतकऱ्यांसाठीच उभा नाही, तर भारतातील सर्व जनतेसाठी उभा आहे. कारण केवळ शेतकरी आणि मजुरांचे नाही, तर संपूर्ण देशाचे नुकसान होत आहे," असेही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारFarmerशेतकरीDigvijaya Singhदिग्विजय सिंह