शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

धक्कादायक! मुलांच्या जेवणात सापडली पाल; 50 हून अधिक विद्यार्थी पडले आजारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 10:45 IST

मध्यान्ह भोजनामुळे पन्नासहून अधिक मुलं आजारी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील डुमरा ब्लॉकमधील रिकौली येथे मध्यान्ह भोजनामुळे पन्नासहून अधिक मुलं आजारी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलांनी गंभीर आरोप केला आहे की, जेवणात पाल पडली होती आणि त्याबाबत तक्रार करूनही शाळा प्रशासनाने जबरदस्तीने मुलांना अन्न खाऊ घातलं. भयंकर बाब म्हणजे मुलं आजारी पडल्यावर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखलही करण्यात आले नाही. 

पालकांना याची माहिती मिळताच सर्वांनी तेथे धाव घेत शाळेचा दरवाजा तोडला. स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली. डुमरा पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मुलांना रुग्णालयात नेण्यात आले. याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली, त्यानंतर पोलीस वाहनातून मुलांना डुमरा पीएचसीमध्ये दाखल करण्यात आले. आजारी बालकांची संख्या इतकी होती की अनेक बालकांना सदर रुग्णालयात दाखल करावे लागले. वैद्यकीय पथक सतत मुलांची काळजी आणि उपचार करत आहे. 

सीतामढी सदर रुग्णालयाच्या उपअधीक्षक सुधा झा यांनी सांगितले की, सर्व मुलांची प्रकृती सामान्य आहे आणि मुलं बरी होत असल्याने त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात येत आहे. पालक रोहित यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलं जेवल्यानंतर आजारी पडली, तेव्हा शाळा प्रशासनाने गावकऱ्यांना याची माहिती दिली नाही. लोकांना माहिती मिळताच सर्वजण पोहोचले, त्यानंतर गेट तोडून मुलांना रुग्णालयात पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. 

दुसरीकडे, सीतामढीचे डीएम मनेश कुमार मीना यांच्या सूचनेवरून शिक्षण विभागाचे डीपीओ अमरेंद्र पाठक या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सदर रुग्णालयामध्ये पोहोचले आणि प्रकरणाची चौकशी करण्यात आली. अनेक मुलांची चौकशी केली. तेव्हा पाल पडल्याचं सांगितलं. तर ही केवळ अफवा असल्याचं शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचं म्हणणे असून, सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :BiharबिहारSchoolशाळाStudentविद्यार्थी