शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

धक्कादायक! मुलांच्या जेवणात सापडली पाल; 50 हून अधिक विद्यार्थी पडले आजारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 10:45 IST

मध्यान्ह भोजनामुळे पन्नासहून अधिक मुलं आजारी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील डुमरा ब्लॉकमधील रिकौली येथे मध्यान्ह भोजनामुळे पन्नासहून अधिक मुलं आजारी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलांनी गंभीर आरोप केला आहे की, जेवणात पाल पडली होती आणि त्याबाबत तक्रार करूनही शाळा प्रशासनाने जबरदस्तीने मुलांना अन्न खाऊ घातलं. भयंकर बाब म्हणजे मुलं आजारी पडल्यावर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखलही करण्यात आले नाही. 

पालकांना याची माहिती मिळताच सर्वांनी तेथे धाव घेत शाळेचा दरवाजा तोडला. स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली. डुमरा पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मुलांना रुग्णालयात नेण्यात आले. याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली, त्यानंतर पोलीस वाहनातून मुलांना डुमरा पीएचसीमध्ये दाखल करण्यात आले. आजारी बालकांची संख्या इतकी होती की अनेक बालकांना सदर रुग्णालयात दाखल करावे लागले. वैद्यकीय पथक सतत मुलांची काळजी आणि उपचार करत आहे. 

सीतामढी सदर रुग्णालयाच्या उपअधीक्षक सुधा झा यांनी सांगितले की, सर्व मुलांची प्रकृती सामान्य आहे आणि मुलं बरी होत असल्याने त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात येत आहे. पालक रोहित यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलं जेवल्यानंतर आजारी पडली, तेव्हा शाळा प्रशासनाने गावकऱ्यांना याची माहिती दिली नाही. लोकांना माहिती मिळताच सर्वजण पोहोचले, त्यानंतर गेट तोडून मुलांना रुग्णालयात पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. 

दुसरीकडे, सीतामढीचे डीएम मनेश कुमार मीना यांच्या सूचनेवरून शिक्षण विभागाचे डीपीओ अमरेंद्र पाठक या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सदर रुग्णालयामध्ये पोहोचले आणि प्रकरणाची चौकशी करण्यात आली. अनेक मुलांची चौकशी केली. तेव्हा पाल पडल्याचं सांगितलं. तर ही केवळ अफवा असल्याचं शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचं म्हणणे असून, सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :BiharबिहारSchoolशाळाStudentविद्यार्थी