शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

चिन्मयानंद प्रकरणाच्या चौकशीसाठी आता एसआयटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 05:27 IST

सर्वोच्च न्यायालयाचे उत्तर प्रदेश सरकारला निर्देश; विधि महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने केले आहेत आरोप

नवी दिल्ली / लखनौ : विधि महाविद्यालयाच्या एका विद्यार्थिनीने भाजप नेते चिन्मयानंद यांच्यावर केलेल्या छळाच्या आरोपांचा तपास करण्यासाठी आयजी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला दिले आहेत.

न्या. आर. भानुमती आणि ए.एस. बोपन्ना यांच्या पीठाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना असे सूचित केले की, या प्रकरणात एकमेकांविरुद्ध केलेल्या तक्रारींचा तपास करण्यासाठी एक पीठाची स्थापना करावी. भाजपचे नेते चिन्मयानंद प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी सोमवारी एका व्यक्तीची चौकशी केली. चिन्मयानंद यांच्यावर छळाचे आरोप करून बेपत्ता झालेल्या एका २३ वर्षीय तरुणीसोबत ही व्यक्ती राजस्थानात सापडली होती.विधि महाविद्यालयाची विद्यार्थिनी असणाºया या तरुणीने सोशल मीडियात एक व्हिडिओ पोस्ट करून भाजपच्या या नेत्यावर असा आरोप केला होता की, त्यांनी अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केलेआहे. चिन्मयानंद यांना मागितली खंडणी?भाजप नेते चिन्मयानंद यांनी असा दावा केला आहे की, २२ आॅगस्ट रोजी आपल्याला व्हॉटस्अ‍ॅपवरून एक मेसेज आला आणि आपल्याला ५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. या प्रकरणात त्यांनी तक्रारही दाखल केली आहे.विधि महाविद्यालयाचा एक विद्यार्थी गायब होणे आणि चिन्मयानंद यांना ५ कोटी रुपयांची खंडणी मागणे या घटनांचा काही संबंध असू शकतो, असे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे, तर चिन्मयानंद यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांचे वकील ओम सिंह यांनी म्हटले आहे.

टॅग्स :BJPभाजपाcollegeमहाविद्यालयCrime Newsगुन्हेगारी