शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

लोकसभा, विधानसभा, पालिका निवडणुकीला एकच मतदार यादी? पंतप्रधान कार्यालयाकडून चाचपणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 05:48 IST

या निवडणुकांकरिता समान मतदार यादी तयार करता येईल का, याची चाचपणी करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एक बैठक घेऊन या मुद्यावर सविस्तर चर्चा केली.

नवी दिल्ली : लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रितपणे घेण्यासाठी या निवडणुकांकरिता समान मतदार यादी तयार करता येईल का, याची चाचपणी करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एक बैठक घेऊन या मुद्यावर सविस्तर चर्चा केली.पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी.के. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली १३ आॅगस्टला झालेल्या या बैठकीत दोन पयार्यांवर विचार करण्यात आला. त्यातील पहिला पर्याय म्हणजे सर्वच निवडणुकांसाठी एकच मतदार यादी बंधनकारक करण्यासाठी राज्यघटनेतील कलम २४३ क, २४३ झअ यामध्ये दुरुस्ती करणे. दुसरा पर्याय म्हणजे निवडणूक आयोगाने तयार केलेली मतदार यादीच महापालिका, ग्रामपंचायत संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरण्याकरिता राज्यांना त्यांचे कायदे बदलायला लावणे.सूत्रांनी सांगितले की, या बैठकीला कॅबिनेट सचिव राजीव गौबा, विधिमंडळ सचिव जी. नारायण राजू, पंचायती राज सचिव सुनीलकुमार, तसेच निवडणूक आयोगाचे तीन प्रतिनिधी उपस्थित होते.पंचायत व पालिकांच्या निवडणुकांच्या मतदार याद्या सुरू करण्याबाबत राज्यघटनेच्या २४३ क, २४३ झअ या कलमांद्वारे तरतुदी करण्यात आल्या आहेत. पालिका, पंचायतीच्या निवडणुका घेणे, त्यांच्यावर देखरेख व नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी या कलमांद्वारे राज्य निवडणूक आयोगावर सोपविण्यात आलीआहे.राज्यघटनेच्या ३२४ (१) या कलमाद्वारे लोकसभा, राज्यसभा तसेच राज्य विधानसभांच्या निवडणुका घेण्याचे, त्यांच्यावर देखरेख करण्याचे काम केंद्रीय निवडणूक आयोगाला सोपविण्यात आले आहे. याचा अर्थ असा की, पंचायत व पालिका निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोग स्वतंत्र मतदार याद्या करू शकतात. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाशी संपर्र्क साधण्याची आवश्यकता नसते.या राज्यांची आहे स्वतंत्र मतदार यादीसध्या बहुतांश राज्ये पालिका, पंचायतीच्या निवडणुकांसाठी स्वत: मतदार यादी तयार न करता केंद्रीय निवडणूक आयोगाने बनविलेलीच मतदार यादी वापरत आहेत. मात्र, ओदिशा, आसाम, मध्यप्रदेश, केरळ, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, नागालँड ही राज्ये व जम्मू-काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश पालिका, पंचायत निवडणुकांसाठी स्वत:च तयार केलेल्या मतदार याद्या वापरत आहे. त्यामुळे लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका एकत्रितरीत्या घ्यायच्या असतील, तर समान मतदार यादी असणे आवश्यक आहे व ते उद्दिष्ट कसे साध्य करता येईल, या दिशेने केंद्र सरकारने प्रयत्न करायचे ठरविले आहे. 

टॅग्स :IndiaभारतElectionनिवडणूक