शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

सिंघू सीमेवरचं भयाण वास्तव! बॅरिकेट्समुळे शेतकऱ्यांना ना प्यायचं पाणी...ना टॉयलेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 11:14 IST

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्यी सिंघू सीमेवर आंदोलन करत असणाऱ्या शेतकरी आंदोलकांची नाचक्की करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी आता नवे हातखंडे आजमवण्यास सुरुवात केलीय

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्यी सिंघू सीमेवर (Singhu Border) आंदोलन करत असणाऱ्या शेतकरी आंदोलकांची नाचक्की करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी आता नवे हातखंडे आजमवण्यास सुरुवात केली आहे. याचं एक भयाण वास्तव समोर आलं आहे. सिंघू सीमेवर दिल्ली पोलिसांनी चार ते पाच फुटांची भिंत उभारण्यात आली आहे. या भिंतीच्या पलिकडे पाच पदरी बॅरिकेट्स उभारण्यात आले आहेत. हे बॅकिरेट्स जवळपास १.५ किमी इतके दूरवर पसरले आहेत. या बॅरिकेट्समुळे शेतकरी आंदोलकांना दिल्ली जल बोर्डाच्या पाण्याच्या टँकर्सपर्यंत पोहोचता येत नाहीय. इतकंच नव्हे, तर शेतकरी आंदोलकांसाठी ठेवण्यात आलेल्या मोबाइल टॉयलेट्सपर्यंतही पोहोचणं आता कठीण झालं आहे. ( Singhu Border No access to water toilets for farmers)

दिल्ली पोलिसांच्या या वागणुकीमुळे शेतकरी आंदोलकांमध्ये कमालीचा रोष आहे. तरीही आंदोलन थांबणार या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. "आम्ही शेतकरी आहोत. गरज पडली तर बोअरवेल खणून पाणी मिळवू पण आम्ही घाबरुन जाऊ असा सरकारने अजिबात विचार करू नये. जोवर आमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित होत नाही तोवर आम्ही इथून माघारी जाणार नाही", असं शेतकरी आंदोलक कुलजित सिंग म्हणाले. 

शेतकरी आंदोलन भाजपला पडणार महागात?; 'या' राज्यातील सरकार सापडलं संकटात

शेतकरी आंदोलकांना आता दैनंदिन स्वच्छतेच्या मुद्द्याशी झगडावं लागतं आहे. बोटावर मोजण्या इतके मोबाइल टॉयलेट आता उपलब्ध असल्यानं शेतकरी आंदोलकांच्या टॉयलेटबाहेर रांगा लागत आहेत. त्यामुळे सध्या अनेकांना खुल्या मैदानातच शौच करावे लागत असून महिला आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखणं हा पोलिसांचा उद्देश नसून दिल्लीकडून मिळणाऱ्या सर्व सुविधांपासून वंचित ठेवण्याचा मनसुबा पोलिसांचा असल्याचा आरोप भारतीय किसान युनियनचे कार्यकर्ते मनजित ढिल्लन यांनी केला आहे. 

बॉर्डरवर पोलीस वाजवतायेत 'संदेशे आते है' गाणं; शेतकरी म्हणाले, बंद करा, आम्हाला त्रास होतोय

"दिल्लीच्या बाजूनं याआधी आमच्यापर्यंत अनेक पाण्याचे टँकर येत होते. पण आता तिथून काहीच येत नाही. हरियाणाच्या बाजूनं आमच्याकडे टँकर येत आहेत. अनेकांना पाणी विकत घ्यावं लागत आहे.", असं ढिल्लन यांना सांगितलं. 

दिल्ली पोलिसांकडून शेतकरी आंदोलकांना रोखण्यासाठी फक्त बॅरिकेट्स उभारण्यात आलेले नाहीत. तर बॅरिकेट्ससोबतच मोठे कंटेनर्स ठेवून रस्ते ब्लॉक करण्यात आले आहेत. या कंटेनर्समध्ये सिमेंटच्या गोण्या भरण्यात आल्यात. दिल्लीच्या दिशेनं एक पाच फुटांची सिमेंटची भिंत उभारण्यात आलीय तर बॅरिकेट्सची भलीमोठी रांगच या भिंती पलिकडे उभारण्यात आली आहे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीStrikeसंपdelhiदिल्ली