शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

इंधनाच्या दरवाढीला सिंग सरकारही जबाबदार; केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 10:45 IST

केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा आरोप; तेलरोख्यांची रक्कम थकविली

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती कडाडल्याने त्याचे परिणाम देशातही दिसून आले, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. तेलरोख्यांच्या परतफेडीची रक्कम तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या यूपीए सरकारने चुकती न केल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, अशी टीकाही प्रधान यांनी केली.

ते म्हणाले की, मनमोहन सिंग सरकारने न दिलेली तेलरोख्यांची रक्कम मोदी सरकारला आता मुद्दल व व्याजासह परत करावी लागत आहे. त्याचाही मोठा बोजा सरकारी तिजोरीवर पडत आहे. या महत्त्वाच्या कारणामुळेही देशात तेलाच्या किमती वाढल्या आहेत. हे कारण अर्थतज्ज्ञांनीही मान्य केले आहे. 

पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, भारताला लागणाऱ्या इंधन तेलापैकी ८० टक्के  तेलाची आयात करण्यात येते. इंधन तेल वस्तू व सेवा करांच्या कक्षेत आणायचे का, याचा निर्णय जीएसटी कौन्सिलने घ्यायचा आहे.  असा निर्णय झाल्यास इंधन तेलाच्या किमती आणखी कमी होतील, असा अनेकांना विश्वास वाटतो. पेट्रोलच्या किरकोळ विक्रीच्या किमतीत ६० टक्के भाग हा केंद्र व राज्ये सरकारे यांनी लावलेल्या करांचा असतो, तर डिझेलच्या किमतीत हे प्रमाण ५४ टक्के असते.

केंद्र सरकार पेट्रोलवर ३२.९० रुपये, तर डिझेलवर ३१.८० रुपये इतका अबकारी कर लावते. भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनीही आरोप केला की,  मनमोहन सिंग सरकारचा ढिसाळ कारभार हेही पेट्रोल, डिझेल दरवाढीमागचे एक कारण आहे. तेल कंपन्यांनी किरकोळ विक्रीच्या किंमती वाढवू नये, यासाठी त्या सरकारने काही निर्णय घेतले होते. पण, त्यातही निष्काळजीपणा झाल्याने त्याचे परिणाम आता मोदी सरकारलाही भोगावे लागत आहेत. 

तेलरोखे हे एकमेव कारण नाही

काँग्रेस नेते अमिताभ दुबे यांनी म्हटले आहे की, तेलाच्या दरवाढीसाठी तेलरोख्यांचा मुद्दा हे एकमेव कारण असू शकत नाही. भारताने २०१९ - २० या वर्षात ३ कोटी मेट्रिक टन पेट्रोल व ७.३ कोटी मेट्रिक टन डिझेलचा वापर केला होता. २० हजार कोटी रुपयांच्या तेलरोख्यांमुळे प्रतिलीटरला आणखी १ रुपये ४० पैसे समाविष्ट झाले. मोदी सरकारने गेल्या दोन आठवड्यांत इंधन तेलाच्या किमती प्रतिलीटर ७ रुपयांनी वाढविल्या आहेत. 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलManmohan Singhमनमोहन सिंगBJPभाजपा