शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 05:36 IST

मतदारांना आमिष प्रकरणात दोषी उमेदवारांना अपात्र ठरविण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली होती.

नवी दिल्ली : देशात निवडणुकांमध्ये ईव्हीएमऐवजी पुन्हा मतपत्रिकांचा वापर सुरू करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. न्या. प्रसन्न वराळे, न्या. विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने म्हटले की, जे निवडणूक जिंकतात ते ईव्हीएमशी छेडछाड झाल्याची तक्रार करत नाहीत, मात्र निवडणुकीत पराभव झाला की, ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याच्या तक्रारी केल्या जातात.

मतदारांना आमिष प्रकरणात दोषी उमेदवारांना अपात्र ठरविण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली होती.  याचिकाकर्ते के. ए. पाॅल म्हणाले की, निवडणूक प्रक्रियेत सुधारणा होण्यासाठी मी ही याचिका केली आहे. त्यांना खंडपीठाने म्हटले, तुम्ही फार कल्पक याचिका करता. तुम्हाला या सर्व कल्पना कशा सुचतात? 

याचिकाकर्त्याशी संवाद

याचिकाकर्ते पॉल : मी १५० देशांत जाऊन आलो आहे.खंडपीठ : त्या देशांत मतपत्रिकेचा की ईव्हीएमचा वापर करतात?याचिकाकर्ते पॉल : अनेक देश निवडणुकांमध्ये मतपत्रिकेचा वापर करत आहेत. भारताने त्यांचे अनुकरण केले पाहिजे.खंडपीठ : निवडणुकांत मतपत्रिकांचा वापर पुन्हा सुरू केल्यास गैरव्यवहार होणारच नाहीत याची खात्री काय?

यात कशाला उतरता?

पॉल यांची एक संस्था असून त्यांनी ३ लाख अनाथ व्यक्ती व ४० लाख विधवांचे आयुष्य नीट मार्गी लागण्यासाठी काम केले आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन खंडपीठाने त्यांना विचारणा केली की, तुमचे कार्यक्षेत्र खूप वेगळे आहे. असे असताना तुम्ही राजकीय क्षेत्रात का उतरत आहात?

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयEVM Machineईव्हीएम मशीनElectionनिवडणूक 2024