शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

कोरोनाने पोखरले भारतातील मुलांचे बालपण, देशातील ३७ कोटी मुलांबाबत सीएसईचा चिंता वाढवणारा अहवाल

By बाळकृष्ण परब | Updated: February 26, 2021 15:48 IST

Indian Children in Covid-19 : देशातील कोरोनाचा संसर्ग कमीजास्त होत आहे. तसेच कोरोनावरील लसही उपलब्द झाली आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या साथीचे दुष्परिणाम पुढील अनेक वर्षे कायम राहणार आहेत.

ठळक मुद्देदेशातील ३७.५ कोटी मुले दीर्घकाळापर्यंत कायम राहणाऱ्या कोरोनाच्या दुष्परिणामांच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता त्यांची रोगप्रतिकार क्षमता प्रभावित झाल्यामुळे हे दुष्परिणाम कमी वजन, कमी उंची आणि मृत्यूदरात वाढ या रूपात दिसतीलकोरोनामुळे जगभरात ५० कोटींहून अधिक मुलांची शाळा सुटली आहे. त्यातील अर्ध्याहून अधिक मुले ही भारतात आहेत

नवी दिल्ली - देशातील कोरोनाचा संसर्ग कमीजास्त होत आहे. तसेच कोरोनावरील लसही उपलब्द झाली आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या साथीचे दुष्परिणाम पुढील अनेक वर्षे कायम राहणार आहे. (corona virus) विशेष करून लहान मुलांच्या शारीरिक विकासावर कोरोनाचा मोठा परिणाम होणार आहे. (Indian Children in Covid-19 ) कोरोनामुळे मुलांच्या मृत्युदरात वाढ होणार असून, त्यांचे शिक्षणही विस्कळीत होण्याची शक्यता आहे, ही भीती सेंटर फॉर सायन्स अँड  एन्व्हायरमेंट (सीएसई) च्या वार्षिक अहवालामध्ये स्टेट ऑफ इंडियाज एन्व्हायर्मेंट (सीएसई) च्या वार्षिक अहवालात स्टेट ऑफ इंडियाज एन्वायर्मेंट २०२१ मधून व्यक्त करण्यात आली आहे. सीएसईच्या महासंचालक सुनीता नारायण यांच्यासह देशभरातील ६० हून अधिक पर्यावरणवाद्यांनी एकत्रितपणे हा अहवाल गुरुवारी संध्याकाळी प्रसिद्ध केला आहे.  (side effects of Covid-19 , CSE report raises concerns about 37 crore children in India)या अहवालानुसार, भारत आता महामारी जनरेशनमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला आहे. देशातील ३७.५ कोटी मुले (नवजात अर्भकांपासून ते १४ वर्षांच्या मुलांपर्यंत) दीर्घकाळापर्यंत कायम राहणाऱ्या कोरोनाच्या दुष्परिणामांच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. त्यांची रोगप्रतिकार क्षमता प्रभावित झाल्यामुळे हे दुष्परिणाम कमी वजन, कमी उंची आणि मृत्यूदरात वाढ या रूपात दिसतील. तसेच शैक्षणिक नुकसानापर्यंत दुष्परिणाम दिसून येणार आहेत. जगभरात ५० कोटींहून अधिक मुलांची शाळा सुटली आहे. त्यातील अर्ध्याहून अधिक मुले ही भारतात आहेत. सीएसईच्या महासंचालक सुनीता नारायण यांनी सांगितले की, आता कोरोना विषाणू आमच्यासाठी दीर्घकाळासाठी काय सोडून जाणार आहे याचा तपास करण्याची वेळ आली आहे. एक पिढी अस्वस्थता, कुपोष, गरिबी आणि शैक्षणिक लाभांबाबत दुर्बलतेने घेरली गेली आहे. त्याबरोबरच पर्यावरणाचा निरंतर विकासासाठी उपयोग कऱण्याचेही आव्हान आहे. जेणेकरून पर्यावरणीय आव्हानांच्या काळात आम्ही उदरनिर्वाह आणि पोषण सुरक्षेबाबत सुधारणा करू शकू.  सीएसईच्या अहवालात म्हटले आहे की, संपूर्ण लॉकडाऊन लागू केल्यानंतरही भारतात कोरोनाचा संसर्ग थांबू शकला नाही. देशातील लोकसंख्येचा मोठा भाग हा झोपडपट्ट्या तसेच दाट लोकवस्तीमध्ये राहतो. तिथे ना पिण्याच्या स्वच्छ पाण्याची उपलब्धता आहे. ना तिथे योग्य स्वच्छता होते. अशा परिस्थितीत संसर्गाची शक्यता सातत्याने कायम असते.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकIndiaभारतHealthआरोग्य