शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

मोदी सरकार फॅसिस्ट, सिद्धरामय्यांनी हिटलरसोबत केली तुलना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 12:08 IST

काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.नरेंद्र मोदी केंद्रात 'फॅसिस्ट' सरकार चालवत असल्याची टीका सिद्धरामय्या यांनी केली .'नरेंद्र मोदी यांचे सरकार अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या सरकारसारखेच आहे. त्यांच्याविरुद्ध बोलण्यास कोणीही धजत नाही'

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रात 'फॅसिस्ट' सरकार चालवत असल्याची टीका सिद्धरामय्या यांनी केली आहे. शनिवारी (5 ऑक्टोबर) विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हिटलरसोबत मोदींची तुलना केली आहे. 

'नरेंद्र मोदी यांचे सरकार अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या सरकारसारखेच आहे. त्यांच्याविरुद्ध बोलण्यास कोणीही धजत नाही' असं सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे. चिकमगळुरूतील कालसा येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याप्रकरणी त्याच्या कुटुंबाला सिद्धरामय्या यांनी भेट दिली. त्याचवेळी पूरग्रस्तांना मदत मिळावी, यासाठीच्या पाच हजार कोटी रुपयांच्या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केल्याबद्दलही त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

तीन महिन्यांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर केवळ एक हजार 200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना राज्याच्या आर्थिक स्थितीविषयी फारच कमी ज्ञान असल्याचं सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे. तसेच जनतेने भरलेला कर दरमहा सरकारजमा करत आहे. त्यामुळे तिजोरी रिकामी राहूच शकत नाही. राज्यात पूर आल्यानंतर अनेक महिन्यांनंतर सरकारला मदतकार्यासाठी केंद्राकडून निधी मिळू शकला नसल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला आहे. याआधी सिद्धरामय्या यांनी कर्नाटकातील राजकिय घडामोडींमागे राज्यातील भाजपाच्या नेत्यांचाच फक्त सहभाग नाही तर राष्ट्रीय स्तरावरील नेते अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्यांचाही सहभाग असल्याचं म्हटलं होतं. 

काँग्रेस-जेडीएसचे सरकार अस्थिर करण्याचा डाव असून हे लोकशाही आणि जनमताच्या विरोधात आहे. त्यांच्याकडून आमदारांना पैसा, पद आणि मंत्रीपदाची ऑफर दिली जात आहे असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला होता. तसेच सरकारे अस्थिर करणं ही भाजपाची सवय आहे. हे असंविधानिक असून लोकांनी भाजपाचे सरकार बनवण्याचा जनादेश दिलेला नाही. जनतेने आम्हाला सर्वाधिक मतं दिली असल्याचं म्हटलं होतं. काँग्रेस आणि जदयूने मिळून 57 टक्के मतं मिळवली आहेत. तसेच भाजपाचे हे ऑपरेशन लोट्स असून आमदारांच्या राजीनाम्यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. 

टॅग्स :siddaramaiahसिद्धरामय्याNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस