शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

मोदी सरकार फॅसिस्ट, सिद्धरामय्यांनी हिटलरसोबत केली तुलना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 12:08 IST

काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.नरेंद्र मोदी केंद्रात 'फॅसिस्ट' सरकार चालवत असल्याची टीका सिद्धरामय्या यांनी केली .'नरेंद्र मोदी यांचे सरकार अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या सरकारसारखेच आहे. त्यांच्याविरुद्ध बोलण्यास कोणीही धजत नाही'

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रात 'फॅसिस्ट' सरकार चालवत असल्याची टीका सिद्धरामय्या यांनी केली आहे. शनिवारी (5 ऑक्टोबर) विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हिटलरसोबत मोदींची तुलना केली आहे. 

'नरेंद्र मोदी यांचे सरकार अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या सरकारसारखेच आहे. त्यांच्याविरुद्ध बोलण्यास कोणीही धजत नाही' असं सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे. चिकमगळुरूतील कालसा येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याप्रकरणी त्याच्या कुटुंबाला सिद्धरामय्या यांनी भेट दिली. त्याचवेळी पूरग्रस्तांना मदत मिळावी, यासाठीच्या पाच हजार कोटी रुपयांच्या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केल्याबद्दलही त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

तीन महिन्यांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर केवळ एक हजार 200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना राज्याच्या आर्थिक स्थितीविषयी फारच कमी ज्ञान असल्याचं सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे. तसेच जनतेने भरलेला कर दरमहा सरकारजमा करत आहे. त्यामुळे तिजोरी रिकामी राहूच शकत नाही. राज्यात पूर आल्यानंतर अनेक महिन्यांनंतर सरकारला मदतकार्यासाठी केंद्राकडून निधी मिळू शकला नसल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला आहे. याआधी सिद्धरामय्या यांनी कर्नाटकातील राजकिय घडामोडींमागे राज्यातील भाजपाच्या नेत्यांचाच फक्त सहभाग नाही तर राष्ट्रीय स्तरावरील नेते अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्यांचाही सहभाग असल्याचं म्हटलं होतं. 

काँग्रेस-जेडीएसचे सरकार अस्थिर करण्याचा डाव असून हे लोकशाही आणि जनमताच्या विरोधात आहे. त्यांच्याकडून आमदारांना पैसा, पद आणि मंत्रीपदाची ऑफर दिली जात आहे असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला होता. तसेच सरकारे अस्थिर करणं ही भाजपाची सवय आहे. हे असंविधानिक असून लोकांनी भाजपाचे सरकार बनवण्याचा जनादेश दिलेला नाही. जनतेने आम्हाला सर्वाधिक मतं दिली असल्याचं म्हटलं होतं. काँग्रेस आणि जदयूने मिळून 57 टक्के मतं मिळवली आहेत. तसेच भाजपाचे हे ऑपरेशन लोट्स असून आमदारांच्या राजीनाम्यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. 

टॅग्स :siddaramaiahसिद्धरामय्याNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस