शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार फॅसिस्ट, सिद्धरामय्यांनी हिटलरसोबत केली तुलना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 12:08 IST

काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.नरेंद्र मोदी केंद्रात 'फॅसिस्ट' सरकार चालवत असल्याची टीका सिद्धरामय्या यांनी केली .'नरेंद्र मोदी यांचे सरकार अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या सरकारसारखेच आहे. त्यांच्याविरुद्ध बोलण्यास कोणीही धजत नाही'

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रात 'फॅसिस्ट' सरकार चालवत असल्याची टीका सिद्धरामय्या यांनी केली आहे. शनिवारी (5 ऑक्टोबर) विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हिटलरसोबत मोदींची तुलना केली आहे. 

'नरेंद्र मोदी यांचे सरकार अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या सरकारसारखेच आहे. त्यांच्याविरुद्ध बोलण्यास कोणीही धजत नाही' असं सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे. चिकमगळुरूतील कालसा येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याप्रकरणी त्याच्या कुटुंबाला सिद्धरामय्या यांनी भेट दिली. त्याचवेळी पूरग्रस्तांना मदत मिळावी, यासाठीच्या पाच हजार कोटी रुपयांच्या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केल्याबद्दलही त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

तीन महिन्यांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर केवळ एक हजार 200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना राज्याच्या आर्थिक स्थितीविषयी फारच कमी ज्ञान असल्याचं सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे. तसेच जनतेने भरलेला कर दरमहा सरकारजमा करत आहे. त्यामुळे तिजोरी रिकामी राहूच शकत नाही. राज्यात पूर आल्यानंतर अनेक महिन्यांनंतर सरकारला मदतकार्यासाठी केंद्राकडून निधी मिळू शकला नसल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला आहे. याआधी सिद्धरामय्या यांनी कर्नाटकातील राजकिय घडामोडींमागे राज्यातील भाजपाच्या नेत्यांचाच फक्त सहभाग नाही तर राष्ट्रीय स्तरावरील नेते अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्यांचाही सहभाग असल्याचं म्हटलं होतं. 

काँग्रेस-जेडीएसचे सरकार अस्थिर करण्याचा डाव असून हे लोकशाही आणि जनमताच्या विरोधात आहे. त्यांच्याकडून आमदारांना पैसा, पद आणि मंत्रीपदाची ऑफर दिली जात आहे असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला होता. तसेच सरकारे अस्थिर करणं ही भाजपाची सवय आहे. हे असंविधानिक असून लोकांनी भाजपाचे सरकार बनवण्याचा जनादेश दिलेला नाही. जनतेने आम्हाला सर्वाधिक मतं दिली असल्याचं म्हटलं होतं. काँग्रेस आणि जदयूने मिळून 57 टक्के मतं मिळवली आहेत. तसेच भाजपाचे हे ऑपरेशन लोट्स असून आमदारांच्या राजीनाम्यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. 

टॅग्स :siddaramaiahसिद्धरामय्याNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस