शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! आसाममध्ये गेल्या चोवीस तासात 8 नवजात अर्भकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 08:59 IST

आसामच्या फकरुद्दीन अली अहमद वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या २४ तासांत तब्बल ८ नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे आसामच्या फकरुद्दीन अली अहमद वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या २४ तासांत तब्बल ८ नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.  दोन ते चार दिवसांची पाच नवजात अर्भक बुधवारी रात्री दगावली होती.

गुवाहाटी- आसामच्या फकरुद्दीन अली अहमद वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या २४ तासांत तब्बल ८ नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. बुधवार रात्रीपासून हा प्रकार घडल्याचं निदर्शनास आलं आहे.  दोन ते चार दिवसांची पाच नवजात अर्भक बुधवारी रात्री दगावली होती. तर इतर तीन जणांचा गुरुवारी मृत्यू झाला. पण आश्चर्याची बाब म्हणजे एकाच हॉस्पिटलमध्ये इतक्या मोठ्या संख्येने नवजात अर्भकांचा मृत्यू होऊनही हॉस्पिटल प्रशासनाने याची जबाबदारी झटकली आहे. हॉस्पिटल प्रशासनाने डॉक्टरांची आणि हॉस्पिटलमधील स्टाफची बाजू घेत यात त्यांच्याकडून दृर्लक्ष किंवा चूक न झाल्याचं म्हटलं आहे. बाळ जन्मला आल्यावर त्याचं वजन कमी असल्याने मृत्यू झाला, असं कारण हॉस्पिटल प्रशासनाने दिलं आहे.

बाळाचं जन्मावेळी वजन कमी असणं हे त्याच्या मृत्यूमागील महत्वाचं कारण असतं. या आठ नवजात अर्भकांच्या मृ्त्यूंमागेही हेच कारण असून त्यात डॉक्टरांचा दोष नाही. मृत्यू झालेल्या सर्व मुलांना नवजात गर्भधारणा देखभाल युनिट (एनआयसीयू) मध्ये ठेवण्यात आलं होतं. यातील काही बालकांचं वजन अडीच किलो इतकं होतं. तर एका बाळाचं वजन हे फक्त एक किलो इतकं होतं, असं या वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य तसंच हॉस्पिटलचे मुख्य अधीक्षक डॉ. दिलीप कुमार दत्ता यांनी सांगितले आहे. 

हॉस्पिटलमध्ये दररोज याच कारणामुळे एक ते दोन नवजात अर्भकांचे मृत्यू होतच असतात, असं ही दत्ता यांनी सांगितलं. बुधवारी आणि गुरुवारी या संख्येत वाढ झाल्याने याची चर्चा होत आहे. त्याचबरोबर राज्याच्या आरोग्यमंत्री हिमंता बिस्वास शर्मा यांनी या घटनेची माहिती मिळताच हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. तसंच वैद्यकीय शिक्षण संचालकांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत. पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

ऑगस्ट महिन्यात उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या पुरवठ्या अभावी 30 मुलांचा मृत्यू झाला होता. सगळ्यांनाच हादरविणाऱ्या या घटनेमुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर आता आसाममधील या घटनेची चर्चा सुरू आहे.  

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्य