शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

धक्कादायक! आसाममध्ये गेल्या चोवीस तासात 8 नवजात अर्भकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 08:59 IST

आसामच्या फकरुद्दीन अली अहमद वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या २४ तासांत तब्बल ८ नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे आसामच्या फकरुद्दीन अली अहमद वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या २४ तासांत तब्बल ८ नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.  दोन ते चार दिवसांची पाच नवजात अर्भक बुधवारी रात्री दगावली होती.

गुवाहाटी- आसामच्या फकरुद्दीन अली अहमद वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या २४ तासांत तब्बल ८ नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. बुधवार रात्रीपासून हा प्रकार घडल्याचं निदर्शनास आलं आहे.  दोन ते चार दिवसांची पाच नवजात अर्भक बुधवारी रात्री दगावली होती. तर इतर तीन जणांचा गुरुवारी मृत्यू झाला. पण आश्चर्याची बाब म्हणजे एकाच हॉस्पिटलमध्ये इतक्या मोठ्या संख्येने नवजात अर्भकांचा मृत्यू होऊनही हॉस्पिटल प्रशासनाने याची जबाबदारी झटकली आहे. हॉस्पिटल प्रशासनाने डॉक्टरांची आणि हॉस्पिटलमधील स्टाफची बाजू घेत यात त्यांच्याकडून दृर्लक्ष किंवा चूक न झाल्याचं म्हटलं आहे. बाळ जन्मला आल्यावर त्याचं वजन कमी असल्याने मृत्यू झाला, असं कारण हॉस्पिटल प्रशासनाने दिलं आहे.

बाळाचं जन्मावेळी वजन कमी असणं हे त्याच्या मृत्यूमागील महत्वाचं कारण असतं. या आठ नवजात अर्भकांच्या मृ्त्यूंमागेही हेच कारण असून त्यात डॉक्टरांचा दोष नाही. मृत्यू झालेल्या सर्व मुलांना नवजात गर्भधारणा देखभाल युनिट (एनआयसीयू) मध्ये ठेवण्यात आलं होतं. यातील काही बालकांचं वजन अडीच किलो इतकं होतं. तर एका बाळाचं वजन हे फक्त एक किलो इतकं होतं, असं या वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य तसंच हॉस्पिटलचे मुख्य अधीक्षक डॉ. दिलीप कुमार दत्ता यांनी सांगितले आहे. 

हॉस्पिटलमध्ये दररोज याच कारणामुळे एक ते दोन नवजात अर्भकांचे मृत्यू होतच असतात, असं ही दत्ता यांनी सांगितलं. बुधवारी आणि गुरुवारी या संख्येत वाढ झाल्याने याची चर्चा होत आहे. त्याचबरोबर राज्याच्या आरोग्यमंत्री हिमंता बिस्वास शर्मा यांनी या घटनेची माहिती मिळताच हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. तसंच वैद्यकीय शिक्षण संचालकांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत. पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

ऑगस्ट महिन्यात उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या पुरवठ्या अभावी 30 मुलांचा मृत्यू झाला होता. सगळ्यांनाच हादरविणाऱ्या या घटनेमुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर आता आसाममधील या घटनेची चर्चा सुरू आहे.  

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्य