शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

धक्कादायक...शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा केंद्र सरकारला माहीतच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 20:15 IST

केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी संसदेत ही माहिती दिली.

नवी दिल्ली : गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना हमीभाव, अच्छेदिनचे स्वप्न दाखवणारे मोदी सरकार शेतकऱ्यांप्रती किती जागरूक आहे याचा धक्कादायक खुलासा खुद्द कृषीमंत्र्यांनीच आज केला. महाराष्ट्रासह इतर राज्यांत हजारावर शेतकरी आत्महत्या करत असताना गेल्या तीन वर्षांत किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, याची कल्पना नसल्याचे केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी संसदेत सांगितले आहे.

आत्महत्यांबाबत केंद्र सरकारला नॅशनल क्राइम ब्यूरो (एनसीआरबी) ही संस्था माहिती पुरविते. हीच संस्था आत्महत्यांची माहिती गोळा करते. 2016 नंतर या संस्थेने कोणतीही माहिती जाहीर केलेली नसल्याचा खुलासा सिंह यांनी केला. 

तृणमूल काँग्रेसचे खासदार दिनेश त्रिवेदी यांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. त्रिवेदी यांनी 2016 पासून किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि सरकारने त्यांच्या कुटुंबियांना काय मदत केली, असा प्रश्न विचारला होता. 

राधामोहन सिंह यांनी लिहून दिलेल्या उत्तरामध्ये म्हटले आहे की, गृह मंत्रालयांतर्गत एनसीआरबी आत्महत्यांची माहिती एकत्र करून जाहीर करते. मात्र, त्यांच्या वेबसाईटवरच 2015 पर्यंतचे आकडे आहेत. त्यांनी 2016 नंतरचे आकडेवारी अद्याप प्रसिद्ध केलेली नाही. एनसीआरबीनुसार 2015 मध्ये 8 हजार शेतकऱ्यांनी तर 4500 हजार शेतमजुरांनी आत्महत्या केली आहे. महाराष्ट्राचा यामध्ये पहिला क्रमांक लागत असून 3000 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. दुसऱ्या क्रमांकावर तेलंगाना 1358 आणि तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक राज्य आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याParliamentसंसद