शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

धक्कादायक...शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा केंद्र सरकारला माहीतच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 20:15 IST

केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी संसदेत ही माहिती दिली.

नवी दिल्ली : गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना हमीभाव, अच्छेदिनचे स्वप्न दाखवणारे मोदी सरकार शेतकऱ्यांप्रती किती जागरूक आहे याचा धक्कादायक खुलासा खुद्द कृषीमंत्र्यांनीच आज केला. महाराष्ट्रासह इतर राज्यांत हजारावर शेतकरी आत्महत्या करत असताना गेल्या तीन वर्षांत किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, याची कल्पना नसल्याचे केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी संसदेत सांगितले आहे.

आत्महत्यांबाबत केंद्र सरकारला नॅशनल क्राइम ब्यूरो (एनसीआरबी) ही संस्था माहिती पुरविते. हीच संस्था आत्महत्यांची माहिती गोळा करते. 2016 नंतर या संस्थेने कोणतीही माहिती जाहीर केलेली नसल्याचा खुलासा सिंह यांनी केला. 

तृणमूल काँग्रेसचे खासदार दिनेश त्रिवेदी यांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. त्रिवेदी यांनी 2016 पासून किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि सरकारने त्यांच्या कुटुंबियांना काय मदत केली, असा प्रश्न विचारला होता. 

राधामोहन सिंह यांनी लिहून दिलेल्या उत्तरामध्ये म्हटले आहे की, गृह मंत्रालयांतर्गत एनसीआरबी आत्महत्यांची माहिती एकत्र करून जाहीर करते. मात्र, त्यांच्या वेबसाईटवरच 2015 पर्यंतचे आकडे आहेत. त्यांनी 2016 नंतरचे आकडेवारी अद्याप प्रसिद्ध केलेली नाही. एनसीआरबीनुसार 2015 मध्ये 8 हजार शेतकऱ्यांनी तर 4500 हजार शेतमजुरांनी आत्महत्या केली आहे. महाराष्ट्राचा यामध्ये पहिला क्रमांक लागत असून 3000 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. दुसऱ्या क्रमांकावर तेलंगाना 1358 आणि तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक राज्य आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याParliamentसंसद