शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक...शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा केंद्र सरकारला माहीतच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 20:15 IST

केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी संसदेत ही माहिती दिली.

नवी दिल्ली : गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना हमीभाव, अच्छेदिनचे स्वप्न दाखवणारे मोदी सरकार शेतकऱ्यांप्रती किती जागरूक आहे याचा धक्कादायक खुलासा खुद्द कृषीमंत्र्यांनीच आज केला. महाराष्ट्रासह इतर राज्यांत हजारावर शेतकरी आत्महत्या करत असताना गेल्या तीन वर्षांत किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, याची कल्पना नसल्याचे केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी संसदेत सांगितले आहे.

आत्महत्यांबाबत केंद्र सरकारला नॅशनल क्राइम ब्यूरो (एनसीआरबी) ही संस्था माहिती पुरविते. हीच संस्था आत्महत्यांची माहिती गोळा करते. 2016 नंतर या संस्थेने कोणतीही माहिती जाहीर केलेली नसल्याचा खुलासा सिंह यांनी केला. 

तृणमूल काँग्रेसचे खासदार दिनेश त्रिवेदी यांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. त्रिवेदी यांनी 2016 पासून किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि सरकारने त्यांच्या कुटुंबियांना काय मदत केली, असा प्रश्न विचारला होता. 

राधामोहन सिंह यांनी लिहून दिलेल्या उत्तरामध्ये म्हटले आहे की, गृह मंत्रालयांतर्गत एनसीआरबी आत्महत्यांची माहिती एकत्र करून जाहीर करते. मात्र, त्यांच्या वेबसाईटवरच 2015 पर्यंतचे आकडे आहेत. त्यांनी 2016 नंतरचे आकडेवारी अद्याप प्रसिद्ध केलेली नाही. एनसीआरबीनुसार 2015 मध्ये 8 हजार शेतकऱ्यांनी तर 4500 हजार शेतमजुरांनी आत्महत्या केली आहे. महाराष्ट्राचा यामध्ये पहिला क्रमांक लागत असून 3000 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. दुसऱ्या क्रमांकावर तेलंगाना 1358 आणि तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक राज्य आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याParliamentसंसद