शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

धक्कादायक! 2020 मध्ये दररोज 31 मुलांची आत्महत्या, का उचलले टोकाचे पाऊल...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 15:08 IST

NCRB च्या आकडेवारीनुसार 2020 मध्ये देशात 11 हजार 396 मुलांनी आत्महत्या केल्या आहेत.

नवी दिल्ली: मागील काही वर्षात मुलांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. एका रिपोर्टनुसार गेल्या वर्षी दररोज सरासरी 31 मुलांनी आत्महत्या केल्या होत्या. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो(NCRB) च्या आकडेवारीनुसार, 2020 मध्ये 11 हजार 396 मुलांनी आत्महत्या केल्या, जे 2019 च्या तुलनेत 18% आणि 2018 च्या तुलनेत 21% जास्त आहे. 2019 मध्ये देशात 9,613 आणि 2018 मध्ये 9,413 मुलांनी आत्महत्या केल्या होत्या.

कोरोनामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणामNCRBनुसार, कौटुंबिक समस्या(4,006), प्रेमप्रकरण (1,337) आणि आजार (1,327) ही 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये आत्महत्येची प्रमुख कारणे आहेत. बाल संरक्षणावर काम करणाऱ्या सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेचे उपसंचालक प्रभात कुमार यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, कोविड महामारी आणि शाळा बंद झाल्यामुळे मानसिक आरोग्याचा प्रश्न वाढला आहे. मुलांच्या आत्महत्येची वाढती संख्या ही प्रणालीगत अपयश दर्शवते. मुलांना अशी व्यवस्था देण्याची जबाबदारी पालक, कुटुंब, शेजारी आणि सरकार या सर्वांची आहे, जिथे मुले त्यांच्यातील क्षमता ओळखू शकतील आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास तयार असतील.

दररोज 31 मुलांची आत्महत्या'चाईल्ड राइट्स अँड यू'च्या पॉलिसी रिसर्च आणि अॅडव्होकसीच्या संचालक प्रीती महारा यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, महामारीच्या सुरुवातीपासूनच सर्वात मोठी भीती होती की याचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होऊ शकतो आणि NCRB आकडे या भीतीवर आधारित आहेत. कोरोना साथीच्या रोगामुळे लहान मुलांचा मानसिक आघात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. NCRB च्या आकडेवारीनुसार 2020 मध्ये 11,396 मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी 5,392 मुले आणि 6,004 मुली होत्या. म्हणजेच गेल्या वर्षी दररोज 31 मुलांनी तर तासाला 1 मुलाने आत्महत्या केली.

पालकांनी मुलांकडे विशेष लक्ष्य देण्याची गरजप्रीती महारा पुढे म्हणाल्या, कोविड-19 मुळे शाळा बंद, घराला कुलूप, मित्र किंवा शिक्षकांशी बोलता न येणे, यामुळे मुलांमधील तणाव वाढला आहे. त्यांच्यापैकी अनेकांना घरातील तणावपूर्ण वातावरण, त्यांच्या प्रियजनांचा मृत्यू, संसर्गाची भीती आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. अनेक मुले ऑनलाइन क्लासेससाठी धडपडत आहेत तर अनेकजण सोशल मीडियाला बळी पडले आहे. या सगळ्याचा मुलांवर खोलवर परिणाम झालाय. 

पोड्डा फाउंडेशनचे व्यवस्थापकीय ट्रस्ट आणि मानसिक आरोग्य तज्ज्ञ प्रकृति पोद्दार यांनी सांगितले की, पालकांनी आपल्या मुलांची मानसिक स्थिती किती गंभीर आहे हे समजून घेतले पाहिजे. मानसिक समस्यांची लक्षणे आणि नमुने ओळखण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. 

टॅग्स :Healthआरोग्यMental Health Tipsमानसिक आरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या