शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

शताब्दीच्या उंबरठ्यावरील शिवशाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 23:00 IST

निराधार विधान करायचं नाही, अशी प्रतिज्ञा आहे. लिहिताना अखंड सावधपण आहे.

- डॉ. सागर देशपांडे

पु. ल. देशपांडे यांनी म्हटलंय, ‘‘जगण्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट मिळवावी लागते, ती म्हणजे जगण्याचं प्रयोजन. पुरंदऱ्यांना हे प्रयोजन वयाच्या १६व्या, १७व्या वर्षीच गवसलं, शिवचरित्र लिहिणं. हे प्रयोजन सापडल्यावर पुढल्या बिकट वाटांचे राजरस्ते झाले. एका ड्रॉइंग मास्तराच्या बळवंत नामक मुलाला शिवनेरीच्या शिवरायानं झपाटलं. त्या झपाटलेल्या अवस्थेतच त्यांच्या जीवनाचा प्रवास चालू आहे. यापुढंही चालणार आहे. इतिहासाचा हा मोठा डोळस उपासक आहे, भक्त आहे. पण त्याच्या भक्तिमार्गावर ज्ञानदीपाचा प्रकाश आहे.

निराधार विधान करायचं नाही, अशी प्रतिज्ञा आहे. लिहिताना अखंड सावधपण आहे. त्यांच्या अंत:करणातला कवी मोहोरबंद-गोंडेदार भाषा लिहितो. पण हातातला इतिहासाचा लगाम सुटत नाही. वर्तमानाच्या रिकिबीतून पाय निसटत नाही, की नजर डळमळत नाही. हा इतिहासकार भूतकाळाइतकाच वर्तमानाशी जुळलेला आहे.’’ आजही वयाच्या ९९ व्या वर्षात पदार्पण करत असलेले बाबासाहेब ज्यावेळी बोलतात, गप्पा मारतात, त्यावेळी इतिहासातले दाखले अन् वर्तमानकाळात त्यांना आलेले गेल्या ८०-८५ वर्षांच्या आयुष्यातले अनुभव आपण ऐकू लागतो, अन् आपण एका दंतकथेच्या नायकाच्या सहवासातच आहोत की काय, असा भास होऊ लागतो.

‘स्मरणशक्ती’ हे बाबासाहेबांना लाभलेलं एक दैवी वरदानच म्हणावं लागेल. कारण वेद-उपनिषदांपासून ते संतसाहित्यापर्यंत प्राचीन अर्वाचीन इतिहासापासून ते नानासाहेब फाटक-शांता हुबळीकरांच्या अभिनयापासून ते मंगेशकर भावंडांच्या स्वर्गीय सुरांपर्यंत, शिवकालीन हत्यारांपासून ते दादरा-नगर हवेलीच्या युद्धभूमीवरील सुधीर फडके यांनी व्हायोलिनच्या केसमधून लपवून आणलेल्या लाइट मशीनगनपर्यंत, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वक्तृत्वाच्या कडाडणाºया तोफखान्यापासून ते डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या जगप्रसिद्ध शास्रज्ञाच्या संशोधनापर्यंत नेमक्या शब्दात तपशील मांडण्याचं अफाट कौशल्य बाबासाहेबांच्या मेंदूत विधात्यानं अशा कोणत्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संग्रहित केलंय कोण जाणे?

१९५४ साली दादरा-नगर हवेलीच्या रणसंग्रामात सुधीर फडके, यांच्यासह बाबासाहेबांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला, पोर्तुगीजांविरुद्ध झालेल्या या सशस्र संग्रामाच्या दरम्यान दमणगंगेच्या काठी त्यांनी शिवचरित्रावर पहिलं प्रेरणादायी व्याख्यान दिलं, याचकाळात अफाट कष्ट घेऊन, दारिद्र्याचे आणि अपमानाचे चटके सोसून, प्रसंगी पुण्याहून मुंबईला भायखळ्याच्या बाजारात कोथिंबिरीच्या पेंड्या विकून त्यांनी शिवचरित्रासाठी पैसे जमवले. ‘राजा शिवछत्रपती’ या महाग्रंथाच्या रूपाने १९५७ मध्ये ते प्रकाशित झाले. त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी खास बोलावून घेऊन त्याबद्दल त्यांचं कौतुक केलं.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला १९७४ मध्ये ३०० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्तानं मुंबईत बाबासाहेबांनी उभारलेली शिवसृष्टी हा सर्वत्र चर्चेचा आणि कौतुकाचा विषय झाला होता. पुढं १९८४ मध्ये ‘जाणता राजा’ हे महानाट्य आता मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषांमधून रंगमंचावर आलं अन् गेल्या ३६ वर्षात भारतातील अनेक राज्यांमध्ये अन् खुद्द अमेरिकेतही त्याचे हजारांवर प्रयोग झाले. त्यांनी शिवचरित्रविषयक जगभरात दिलेली सुमारे १२ हजारांपेक्षा अधिक व्याख्यानं, ‘जाणता राजा’चे शेकडो प्रयोग या साऱ्यांतून बाबासाहेबांनी मंदिरं, मशिदी, दर्गे, शाळा, ग्रंथालयं, इस्पितळं, रुग्णोपचार, भूकंपग्रस्त या व अशा अनेक गरजू व्यक्ती आणि प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांची थेट मदत तर केलीच; पण या महानाट्यामुळे संयोजकांनी उभारलेल्या निधीतून अनेक मोठी विधायक कामं उभी राहू शकली.बाबासाहेबांना ‘शिवशाहीर’ ही उपाधी खुद्द सातारच्या राजमाता सुमित्राराजेंनी दिली.

बाबासाहेब शिवचरित्र अभ्यासपूर्वक सांगतात. त्यांचा त्यात अभिमान दिसून येतो. पण त्यात खोटा अभिनिवेश नसतो. ते शिवाजीमहाराजांची खोटी किंवा अतिशयोक्त स्तुती चुकूनही करत नाहीत. अफजलखान किंवा औरंगजेब यांची खोटी निंदाही करीत नाहीत. त्यांच्या भाषणात स्वराज्याच्या शत्रूंचेही खरे आणि श्रेष्ठ दर्जाचे गुण मुक्तकंठाने सांगितले जातात तर दुर्गुणांबद्दल स्वकीयांची धगधगत्या शब्दांत होरपळ उडवलेली दिसते. अफजलखानाच्या लहानमोठ्या सद्गुणांची माहिती बाबासाहेबांनी जेवढी दिलेली आढळते, तेवढी माहिती आदिलशाही दरबारातील मुहंमद नुश्रतीसारख्या शाही इतिहासकारानेही दिलेली आढळत नाही’’, अशा शब्दात राजमातांनी बाबासाहेबांना कौतुकाची शाबासकी दिली आहे.

स्वत:सह समोरच्या प्रत्येकातल्या ‘माणूस’पणाला जपणारा, शताब्दीच्या उंबरठ्यावरील एक शिवशाहीर म्हणून आपण सर्वजण त्यांना वर्षानुवर्षे ओळखतो. ‘शिवचरित्र’ हाच आपला श्वास मानणाºया बाबासाहेबांना आई जगदंबेनं आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य द्यावं हीच प्रार्थना !(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)ज्येष्ठ इतिहास संशोधक, पद्मविभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे तिथीनुसार आज नागपंचमीस, तर तारखेनुसार २९ जुलै रोजी ९९व्या वर्षात पदार्पण करत आहेत, त्यानिमित्त...

टॅग्स :Babasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरे