शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Shivsena: सावरकरांचा स्वातंत्र्य लढ्यातील संघर्ष दुर्लक्षित करता येणार नाही, शिवसेनेनं स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 08:55 IST

मोदींनी केवळ लाल किल्ल्यावरुन भ्रष्टाचार संपविण्याची घोषणा करु नये, ती कृतीतून करावी, असा टोला खासदार चतुर्वेदी यांनी लगावला आहे. 

मुंबई - शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर आपलं मत व्यक्त केलं. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन भाषण करताना देशातील दोन समस्यांना संपवायचं असल्याचं म्हटलं. त्यात, भ्रष्टाचार आणि घराणेशाहीला संपवून टाकायचं आहे. ज्यांनी देशाला लुटलं त्या लुटणाऱ्यांकडून आता लुटलेला माल परत घ्यायची वेळ आलीय, असेही मोदींनी म्हटले होते. त्यानंतर, शिवसेनेकडून यावर जोरदार प्रतिक्रिया देण्यात आली आहे. मोदींनी केवळ लाल किल्ल्यावरुन भ्रष्टाचार संपविण्याची घोषणा करु नये, ती कृतीतून करावी, असा टोला खासदार चतुर्वेदी यांनी लगावला आहे. 

देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना प्रियंका चतुर्वेदी यांनी दिलेल्या मुलाखतीत मोदींचे भाषण आणि स्वातंत्र्य लढ्यातील महापुरुषांच्या योगदानाबद्दल भाष्य केलं. तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही महात्मा गांधींचा तिरस्कार करुन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत गोडसेंवर लक्ष केंद्र करता. पण, हा देश महात्मा गांधींच्या ऊर्जेवर आणि त्यांच्या तत्वानेच चालत आला आहे. जर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही महात्मा गांधींचं नाव घेत असतील, तर तेही गांधींचाच मार्ग अवलंबत असतील, अशी मला आशा आहे, असेही चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, देशाच्या उभारणीत अनेक कुटुंबांचं योगदान आहे. त्यामध्ये, स्वातंत्र्य सैनिक, सैन्यदल, न्यायालयीन, प्रशासकीय अधिकारी यांसह अनेक परिवारांनी आपलं योगदान दिलं आहे. नरेंद्र मोदींनी अप्रत्यक्षपणे गांधी परिवारावर केलेल्या टिकेला प्रियंका यांनी हे प्रत्युत्तर दिलं आहे. 

सावरकराचं योगदान दुर्लक्षित करता येणे नाही

स्वातंत्र्य लढ्यातील विनायक दामोदर सावरकर यांचंही योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष लक्षवेधी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकांनी आपलं महत्त्वाचं योगदान दिलं आहे. म्हणूनच, सावरकरांचही महत्त्व दुर्लक्षित होता येणे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.   

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरIndiaभारतIndependence Dayस्वातंत्र्य दिनNarendra Modiनरेंद्र मोदी