शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

संजय राऊत कडाडले! बोम्मई यांची जीभ जास्तच वळवळतेय, त्याचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 10:28 IST

बोम्मई यांच्यावर महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दल खटला दाखल करा अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

नवी दिल्ली - चीनच्या राष्ट्रपतींना अहमदाबादमध्ये बोलावून झोपाळ्यावर झुले देऊन सन्मान करणाऱ्यांना काय म्हणणार? चीनने जगभरात घुसखोरी केली. त्यात भारतातही घुसखोरी केलीय. त्याच पद्धतीने घुसखोरी करण्याचा प्रयत्न कर्नाटक सांगली, कोल्हापूरात करतेय. बेसावध ठेऊन तुम्ही असे करणार असाल तर आम्हालाही तोच मार्ग अवलंबवावा लागेल. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादात तेल ओतून आग लावण्याचं काम बोम्मई करतायेत. केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर ते जे काही बोलले तेच बोम्मई मानायला तयार नाहीत. ते आमची संस्कृती काढतायेत. आम्हाला त्यांनी संस्कृती, संस्कार, भाषा शिकवण्याची गरज नाही. बोम्मई यांची जीभ जास्त वळवळतेय याचं कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची तोंडं बंद आहेत अशा शब्दात संजय राऊत यांनी कडाडून भाजपा-शिंदे सरकारचा समाचार घेतला. 

संजय राऊत म्हणाले की, विधानसभेत सगळ्या विषयांवर गोंधळ झाला, अनावश्यक विषय काढले गेले. व्यक्तिगत विषयांवर बोलत होते. कर्नाटक विधानसभेत महाराष्ट्राविरोधात ठराव मंजूर केला त्याची माहिती सरकारला नसावी हे दुर्दैवी आहे. आम्हाला कर्नाटकची जमीन नको. आमची हक्काची गावे बेळगाव, कारवार, निपाणी मागतोय. आम्ही कायद्याच्या भाषेत बोलतोय. फायद्याच्या भाषेत नाही जे बोम्मई बोलतायेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकार या विषयावर तोंड बंद करून बसलंय हे राज्यातील साडे अकरा कोटी जनतेचे दुर्दैव आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यात कुठल्याही प्रकारे सांस्कृतिक वाद नाही. हा वाद राजकीय फायद्यासाठी बोम्मई यांनी बाहेर काढला. आम्ही चीनचे एजेंट असाल तर तुम्ही कुणाचे एजेंट आहात? देशाच्या गृहमंत्र्यांसमोर जी गोष्ट मान्य केली ती मानायला तुम्ही तयार नाही. आम्हालाही घटनेने अधिकार दिलाय. महाराष्ट्रातील आमच्या गावांवर हक्क सांगता त्याला विरोध करण्याचा अधिकार आम्हाला आहे. महाराष्ट्र सरकारनंही अधिवेशनात कर्नाटक सरकारविरोधात आणि बोम्मई यांच्यावर ठराव आहे. बोम्मई यांच्यावर महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दल खटला दाखल करा. २० लाख सीमावासियांना तुम्ही गुन्हेगार ठरवाल. बोम्मई यांच्यावर खटला दाखल करा. ज्याप्रकारे महाराष्ट्राविरोधात भाषेचा वापर केला तो आजतागायत कुठल्या सरकारने केला नाही. महाराष्ट्रात दुर्बळ सरकार बसलंय. आमची भाषा घुसण्याची आहे पण सरकारमध्ये हिंमत आहे का? असा सवालही संजय राऊत यांनी राज्य सरकारला विचारला.   

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाKarnatakकर्नाटकEknath Shindeएकनाथ शिंदे