शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

नवरात्रीला मांसविक्री करणा-या 500 दुकानांना शिवसेनेनं ठोकलं टाळं, नवरात्री संपेपर्यंत विक्री न करण्याचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 13:19 IST

हरियाणामधील गुरुग्राम येथे नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभुमीवर शिवसेना कार्यकर्त्यांनी मांसविक्री करणा-या दुकानांवर कारवाई करत टाळं ठोकलं आहे. शिवसेनेने मांस आणि चिकनविक्री करणारी 500 दुकाने बंद केली आहेत.

गुरुग्राम - हरियाणामधील गुरुग्राम येथे नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभुमीवर शिवसेना कार्यकर्त्यांनी मांसविक्री करणा-या दुकानांवर कारवाई करत टाळं ठोकलं आहे. शिवसेनेने मांस आणि चिकनविक्री करणारी 500 दुकाने बंद केली आहेत. शिवसेनेचे कार्यकर्ते गुरुवारी पालमविहार येथे जमा झाले होते. यानंतर त्यांनी सूरतनगर, अशोक विहार, सेक्टर क्रमांक पाच आणि नऊ, पटौदी चौक, सदर बाजार, खांडसा धान्यबाजार, बस स्टॅण्ड, डीएलएफ, सोहना आणि सेक्टर 14 मधील मांसविक्रीची दुकानं बंद करुन टाकली.

गुरुग्राम युनिटचे महासचिव व प्रवक्ता ऋतूराज यांनी सांगितलं आहे की, आम्ही मांस आणि चिकनचं प्रत्येक दुकान बंद व्हावं यासाठी आधीच नोटीस बजावली होती. ते बोलले आहेत की, 'आम्ही यावेळी चिकन ऑफर करणा-या रेस्टॉरंट आणि इतर फूड चेन्सला कोणतीही नोटी दिलेली नाही. जर कोणी आदेशाचं पालन केलं नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील'. शिवसेना कार्यकर्त्यांनी हॉटेल्स आणि इतर खाद्यपदार्थ मिळणा-या दुकानांना नोटीस पाठवत नवरात्र संपत नाही तोपर्यंत आपली दुकानं बंद ठेवण्याचा आदेशच दिला आहे. 

ऋतूराज यांनी पुढे बोलताना सांगितलं की, 'आम्ही मंगळवारी गुरुग्रामचे उपायुक्त विनय प्रताप सिंह यांना अर्ज देत पुढील नऊ दिवस मांसविक्री करणारी दुकानं बंद करण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने ही दुकानं बंद ठेवण्याचा कोणताच आदेश दिला नाही'. 'गुरुग्राममधील 50 टक्के दुकानं आधीच बंद होती, आणि जी सुरु होती ती आम्ही बंद करायला लावली', अशी माहिती ऋतूराज यांनी दिली आहे. 

एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, 'आम्ही प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत. कोणालाही कायदा हातात घेण्याचा हक्क नाही'. जर शिवसेना कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने दुकानं बंद केली तर त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. याप्रकरणी तक्रार दाखल होण्याची वाट आम्ही पाहत आहोत असं ते बोलले आहेत. 

विशेष म्हणजे मुंबईत पर्युषण काळात मांसविक्रीवर बंदी आणण्याच्या निर्णयाला  शिवसेनेने विरोध केला होता. पर्युषण काळात एकीकडे मांसविक्रीवर बंदी आणण्याला विरोध करायचा, आणि नवरात्रीला मांसविक्री करण्याची मागणी करत दुकानं बंद केल्याने शिवसेनेची दुटप्पी भूमिका समोर येत असल्याची टीका विरोधक करत आहेत.

टॅग्स :Navratriनवरात्रीNavratri 2017नवरात्रौत्सव २०१७Shiv Senaशिवसेना