शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

'भाजपाला बहुमत मिळू नये ही तर गडकरींची इच्छा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 18:25 IST

'भाजपाला 150 जागा मिळाल्यास गडकरी पंतप्रधान होऊ शकतात'

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्याच क्षणाची वाट पाहत आहेत, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. गेल्या काही महिन्यांमध्ये मोदींची जादू ओसरली आहे. तर राहुल गांधी अधिकाधिक लोकप्रिय होऊ लागले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत कोणालाच स्पष्ट बहुमत मिळणार नाही आणि याला मोदी जबाबदार असतील, असं राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये असलेल्या लेखात म्हटलं आहे. देशातील सध्याची परिस्थिती भाजपासाठी अनुकूल नाही. तीन राज्यांमधील जनतेनं भाजपाविरोधात कौल दिला आहे, असं राऊत यांनी त्यांच्या लेखात नमूद केलं आहे. भाजपाला बहुमत न मिळाल्यास गडकरींनी पंतप्रधानाची संधी असेल आणि सध्या गडकरी त्यांच्या विधानातून त्याचेच संकेत देत आहेत, असं त्यांनी लेखात म्हटलं आहे. 'भाजपाला 150च्या आसपास जागा मिळाल्यास गडकरी पंतप्रधान होऊ शकतात. त्यांच्या नावाला इतर नेतेही संमती देतील. अतिशय झपाट्यानं काम करणारे मंत्री अशी त्यांची मंत्रिमंडळात ओळख आहे. त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो,' असं राऊत यांनी लेखात म्हटलं आहे. शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक असलेल्या राऊत यांनी लेखातून पंतप्रधान मोदींवर तोंडसुख घेतलं आहे. मोदींना 2014 मध्ये स्पष्ट बहुमत मिळालं. मात्र त्यांना ही संधी पूर्णपणे गमावली. 2014 मध्ये मोदींच्या समर्थनाची लाट होती. कारण काँग्रेसचा पराभव करण्याचा निश्चय लोकांनी केला होता. मात्र आता देशातील परिस्थिती बदलली आहे. मोदींची प्रतिमा आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. राहुल गांधींची प्रतिमा मोदींइतकी मोठी नाही. मात्र आता त्यांना महत्त्व मिळू लागलं आहे. कारण मतदार सध्याच्या सरकारवर नाराज आहेत, असं विश्लेषण राऊत यांनी केलं आहे.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीShiv SenaशिवसेनाBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान