शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

'टायगर जिंदा है', शिवराज सिंह चौहान यांच्या वक्तव्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 17:50 IST

मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया संपून नवे सरकारही स्थापन झाले आहे. मात्र राज्यातील राजयकी वर्तुळातील हवा अद्यापही गरमच आहे.

ठळक मुद्देमाजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहेमुख्यमंत्री निवास्थानी झालेल्या कार्यक्रमात शिवराज सिंह चौहान म्हणाले की, ''कार्यकर्त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. टायगर जिंदा हैमध्य प्रदेशच्या विधानसभेत काँग्रेसकडे बहुमतापेक्षा एक जागा कमी आहे. मात्र सपा, बसपा आणि अपक्षांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ 121 वर पोहोचले आहे. तर भाजपाकडे 109 आमदार आहेत

भोपाळ -  मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया संपून नवे सरकारही स्थापन झाले आहे. मात्र राज्यातील राजकीय वर्तुळातील हवा अद्यापही गरमच आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. बुधवारी रात्री मुख्यमंत्री निवास्थानी झालेल्या कार्यक्रमात शिवराज सिंह चौहान म्हणाले की, ''कार्यकर्त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. टायगर जिंदा है.''  राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले असले तरी काँग्रेस आणि भाजपाच्या संख्याबळामध्ये फारसे अंतर नाही. त्यामुळे शिवराज सिंह चौहान यांच्या वक्तव्याचा राजकीय अर्थ काढला जात आहे. बुधवारी रात्री शिवराज सिंह चौहान यांच्या निवासस्थानी अंतिम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी बुधनी येथून आलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, ''कार्यकर्त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. टायगर  जिंदा है,'' चौहान बोलत असतानाच पाच वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येणार का? अशी विचारणा मागून झाली. तेव्हा ''कदाचित पाच वर्षेही लागणार नाहीत,''असे प्रत्युत्तर शिवराज सिंह चौहान यांनी दिले. दरम्यान, शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी सकाळीसुद्धा एक ट्विट केले. त्यात उंच उडी घेण्यासाठी दोन पावले मागे हटावे लागते, असे या ट्विटमध्ये शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. त्यामुळे शिवराज सिंह चौहान यांच्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. सध्या मध्य प्रदेशच्या विधानसभेत काँग्रेसकडे बहुमतापेक्षा एक जागा कमी आहे. मात्र सपा, बसपा आणि अपक्षांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ 121 वर पोहोचले आहे. तर भाजपाकडे 109 आमदार आहेत.  

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानPoliticsराजकारणMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस