शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

शिवराज सिंह चौहान हे तर कंस मामा, अरविंद केजरीवाल यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 20:47 IST

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे कंस मामा आहेत, गेल्या 15 वर्षांत त्यांनी  अशी घणाघाती टीका दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

भोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे कंस मामा आहेत, गेल्या 15 वर्षांत त्यांनी  अशी घणाघाती टीका दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. आम आदमी पक्षाने भोपाळमध्ये आयोजित केलेल्या शंखनाद रॅलीमध्ये केजरीवाल यांनी हा घणाघात केला. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत सर्व 230 जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणाही केजरीवाल यांनी केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले,"सुमारे 15 वर्षांपासून मध्य प्रदेशमध्ये शिवराज चौहान यांची सत्ता आहे. एखाद्या सरकारसाठी 15 वर्षे खूप असतात. पण या 15 वर्षांत शिवराज सिंह चौहान यांनी कुठले एक चांगले काम केले असेल तर सांगा. मध्य प्रदेशात शिक्षक सुखी आहेत का, विद्यार्थी खूश आहेत का, महिला, शेतकरी, आदिवासी, व्यापासी सुखी आहेत का. मध्य प्रदेशमधील सर्वसामान्य जनता दु:खी आहे." केजरीवाल पुढे म्हणाले, दिल्लीची अवस्थासुद्धा अशीच होती. 15 वर्षे शीला दीक्षित यांचे सरकार होते. लोक दु:खी होते. मग अण्णांचे आंदोलन झाले. त्या आंदोलनातून आपचा जन्म झाला. "काँग्रेस-भाजपाची जुगलबंदी तोडण्याचे दिल्लीकरांनी निश्चित केले आणि एका नव्या राजकारणाचा जन्म झाला. आज दिल्लीची जनता सुखी आहे." गेल्या दीड वर्षांत दिल्लीमध्ये जेवढी विकासकामे झाली आहेत तेवढी गेल्या 70 वर्षांत कुठल्याही शहरात झालेली नाहीत, असा दावाही केजरीवाल यांनी केला.  मध्य प्रदेशची चर्चा सुरु झाल्यावर सर्वप्रथम डोक्यात व्यापम घोटाळा येतो, असा टोलाही केजरीवाल यांनी हाणला."शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातील 8 कोटी जनतेचा अपमान केला आहे.  व्यापम घोटाळ्यात 40 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. भ्रष्टाचार लपवण्यासाठी तरुण-तरुणींची हत्या केली गेली. मध्य प्रदेश संपूर्ण जगात भ्रष्टाचारासाठी ओळखला जातो. तर दिल्लीमधील आपच्या सरकारचे उदाहरण प्रामाणिक सरकार म्हणून दिले जाते. भाजपाच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या सेंट्रल व्हिजिंलेंस कमिशनने केलेल्या सर्व्हेमध्ये भाजपाच्या केंद्र सरकारमध्ये 67 टक्के भ्रष्टाचार वाढल्याचे तर दिल्लीच्या आप सरकारमध्ये 81 टक्के भ्रष्टाचार कमी झाल्याचा उल्लेख आहे."असेही केजरीवाल यांनी सांगितले.   

टॅग्स :AAPआपBJPभाजपा