शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिवराज सिंह चौहान हे तर कंस मामा, अरविंद केजरीवाल यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 20:47 IST

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे कंस मामा आहेत, गेल्या 15 वर्षांत त्यांनी  अशी घणाघाती टीका दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

भोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे कंस मामा आहेत, गेल्या 15 वर्षांत त्यांनी  अशी घणाघाती टीका दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. आम आदमी पक्षाने भोपाळमध्ये आयोजित केलेल्या शंखनाद रॅलीमध्ये केजरीवाल यांनी हा घणाघात केला. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत सर्व 230 जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणाही केजरीवाल यांनी केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले,"सुमारे 15 वर्षांपासून मध्य प्रदेशमध्ये शिवराज चौहान यांची सत्ता आहे. एखाद्या सरकारसाठी 15 वर्षे खूप असतात. पण या 15 वर्षांत शिवराज सिंह चौहान यांनी कुठले एक चांगले काम केले असेल तर सांगा. मध्य प्रदेशात शिक्षक सुखी आहेत का, विद्यार्थी खूश आहेत का, महिला, शेतकरी, आदिवासी, व्यापासी सुखी आहेत का. मध्य प्रदेशमधील सर्वसामान्य जनता दु:खी आहे." केजरीवाल पुढे म्हणाले, दिल्लीची अवस्थासुद्धा अशीच होती. 15 वर्षे शीला दीक्षित यांचे सरकार होते. लोक दु:खी होते. मग अण्णांचे आंदोलन झाले. त्या आंदोलनातून आपचा जन्म झाला. "काँग्रेस-भाजपाची जुगलबंदी तोडण्याचे दिल्लीकरांनी निश्चित केले आणि एका नव्या राजकारणाचा जन्म झाला. आज दिल्लीची जनता सुखी आहे." गेल्या दीड वर्षांत दिल्लीमध्ये जेवढी विकासकामे झाली आहेत तेवढी गेल्या 70 वर्षांत कुठल्याही शहरात झालेली नाहीत, असा दावाही केजरीवाल यांनी केला.  मध्य प्रदेशची चर्चा सुरु झाल्यावर सर्वप्रथम डोक्यात व्यापम घोटाळा येतो, असा टोलाही केजरीवाल यांनी हाणला."शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातील 8 कोटी जनतेचा अपमान केला आहे.  व्यापम घोटाळ्यात 40 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. भ्रष्टाचार लपवण्यासाठी तरुण-तरुणींची हत्या केली गेली. मध्य प्रदेश संपूर्ण जगात भ्रष्टाचारासाठी ओळखला जातो. तर दिल्लीमधील आपच्या सरकारचे उदाहरण प्रामाणिक सरकार म्हणून दिले जाते. भाजपाच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या सेंट्रल व्हिजिंलेंस कमिशनने केलेल्या सर्व्हेमध्ये भाजपाच्या केंद्र सरकारमध्ये 67 टक्के भ्रष्टाचार वाढल्याचे तर दिल्लीच्या आप सरकारमध्ये 81 टक्के भ्रष्टाचार कमी झाल्याचा उल्लेख आहे."असेही केजरीवाल यांनी सांगितले.   

टॅग्स :AAPआपBJPभाजपा