शिवाजी नगर पुलावरून आता फक्त दुचाकींनाच प्रवेश

By Admin | Updated: November 7, 2015 00:03 IST2015-11-07T00:03:23+5:302015-11-07T00:03:23+5:30

जळगाव : शिवाजी नगर उड्डाणपुलावरून अवैध वाहतूकीला वाव देऊन फक्त एस.टी.ची वाहतूक बंद केेल्याने मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत होता. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एस.टी.च्या सर्व संघटना एकवटून ७ रोजी मनपा विरोधात मोर्चा काढणार होते. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पुलावरुन फक्त पादचारी किंवा मोटार सायकल जावू शकतील अशा ठराविक अंतरावर उभे गर्डर बसविण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुभाष वारे यांनी मनपाचे आयुक्त संजय कापडणीस यांना पत्रकाद्वारे दिले.

From Shivaji Nagar bridge, now only two wheelers are admitted | शिवाजी नगर पुलावरून आता फक्त दुचाकींनाच प्रवेश

शिवाजी नगर पुलावरून आता फक्त दुचाकींनाच प्रवेश

गाव : शिवाजी नगर उड्डाणपुलावरून अवैध वाहतूकीला वाव देऊन फक्त एस.टी.ची वाहतूक बंद केेल्याने मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत होता. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एस.टी.च्या सर्व संघटना एकवटून ७ रोजी मनपा विरोधात मोर्चा काढणार होते. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पुलावरुन फक्त पादचारी किंवा मोटार सायकल जावू शकतील अशा ठराविक अंतरावर उभे गर्डर बसविण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुभाष वारे यांनी मनपाचे आयुक्त संजय कापडणीस यांना पत्रकाद्वारे दिले.
या बैठकीत विभाग नियंत्रक आर.वाय.साळवे, विभागीय वाहतूक अधिकारी विजय धायडे, वाहतूक निरिक्षक आर.डी.साबळे उपस्थित होते.
याआदेशामुळे रा.प.संघटनांच्या लढाईला यश आल्याने समाधान व्यक्त होत असले तरीही ७ रोजी सकाळी ९ वाजता संयुक्त कृती समितीची महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करून मोर्चाबाबत विचारविमर्ष होणार असल्याचे समितीचे समन्वयक गोपाळ पाटील यांनी सांगितले.
शिवाजी नगर उड्डाण पुल धोकेदायक घोषित करून अवजड वाहतूकीस २६ नोव्हेंबरपासून बंदी घालण्यात आली होती. तरीही पुलावरुन अवजड वाहन, वाळु, खडी, मुरूम घेऊन अवैध वाहतूक सुरु होती. यामुळे मोठी जिवीत हानी होण्याची शक्यता होती. तसेच रा.प.च्या चोपडा,यावलकडे जाणार्‍या बसेस गुजराल पेट्रोलपंपकडून ७ किमीच्या जास्तीच्या अंतराने वळविल्याने ६० ते ७० गावांच्या प्रवाशांना आर्थिक भार सहन करावा लागत होता. त्यामुळे अवैध प्रवाशी वाहतूकीला वाव मिळून रा.प.महामंडळाच्या महसूलात मोठी घट होत होती. याविरोधात रा.प.च्या सर्व संघटनांनी मनपा विरोधात ७ रोजी बसेससह मोर्चाचे नियोजन केले होते. त्याअनुशंघाने शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांसमवेत बैठकीचे आयोजन केेले. बैठकीत पुलावरुन फक्त पादचारी किंवा मोटार सायकल जावू शकतील अशा ठराविक अंतरावर उभे गर्डर बसविण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुभाष वारे यांनी मनपाचे आयुक्त संजय कापडणीस यांना पत्रकाद्वारे दिले.



Web Title: From Shivaji Nagar bridge, now only two wheelers are admitted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.