शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

"राम मंदिर आंदोलन 500 वर्षं चाललं..."; कृष्ण जन्मभूमी प्रकरणावरील HC च्या निर्णयावर प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 20:09 IST

प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, "मी आठवण करून देऊ इच्छिते की, रामजन्मभूमी आंदोलन हे 500 वर्षे चालले, सर्वोच्च न्यायालयात लढाई लढली गेली. भारतीय जनता पार्टीने त्याचे श्रेय घेण्याचे काम केले. त्यावर राजकारण केले.

मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी तथा शाही ईदगाह मशीद प्रकरण सुनावणी योग्य असल्याचे आज (गुरुवार) आलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. यानंतर, आता या मुद्द्यावर राजकारण व्हायला सुरुवात झाली आहे. यातच, शिव सेना (उद्धव ठाकरे गट) खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, उच्च न्यायालयाने कृष्ण जन्मभूमीशी संबंधित प्रकरण स्वीकारले आहे. आता एक कायदेशी प्रक्रिया सुरू केली जाईल आणि दोन्ही पक्षांची बाजू एकली जाईल.

पीटीआय सोबत बोलताना राज्यसभा कासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, "मी आठवण करून देऊ इच्छिते की, रामजन्मभूमी आंदोलन हे 500 वर्षे चालले, सर्वोच्च न्यायालयात लढाई लढली गेली. भारतीय जनता पार्टीने त्याचे श्रेय घेण्याचे काम केले. त्यावर राजकारण केले. शंकराचार्यांना बोलावले नाही. स्वतः जाऊन मंदिराचे उद्घाटन केले. तर, प्रभू श्रीरामांनीही त्यांचा लोकसभेत पराभव करून, 'माझ्या नावावर राजकारण होऊ नये', असा संदेश दिला. तो सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमाने झालेला आम्हा लाखो करोडो हिंदूंच्या भावनांचा विजय होता." 

चतुर्वेदी पुढे म्हणाल्या, "जर यांनी कृष्ण जन्मभूमीच्या बाबतीतही हेच काम केले तर..., मी सांगते, भगवान श्रीकृष्णांनी 17 वेळा मथुरा सोडली असेल, मात्र अठराव्यांदा जेव्हा आले, त्यांनी कंसाचा वध केला होता. भगवान श्रीकृष्ण आणि प्रभू श्रीराम यांच्या नावाने जे राजकारण करतील, त्यांना धडा तेच शिकवतील."

कृष्ण जन्मभूमीवर सुनावणी सुरूच राहणार - मथुरेतील भगवान श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह प्रकरणी आज अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.  याप्रकरणी हिंदू पक्षाने 18 याचिका दाखल केल्या होत्या. यात शाही ईदगाह मशिदीची जागा आपली (हिंदू) असल्याचे म्हणण्यात आले होते. एवढेच नाही तर, आपल्याला तेथे पूजा करण्याचा अधिकारही मिळावा, अशी मागणीही हिंदू पक्षाकडून करण्यात आली होती. 

यानंतर, मुस्लीम पक्षानेही प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट, वक्फ अ‍ॅक्ट, लिमिटेशन अ‍ॅक्ट आणि स्पेसिफिक पझेशन रिलीफ अ‍ॅक्टचा हवाला देत हिंदू पक्षाच्या याचिका फेटाळण्याची विनंती केली होती. मात्र अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळून लावली आहे. याचाच दुसरा अर्थ असा की, आता अलाहाबाद उच्च न्यायालयात हिंदू पक्षाने दाखल केलेल्या 18 याचिकांवर सुनावणी सुरू राहणार आहे. पुढची सुनावणी 12 ऑगस्टला होणार आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारण