शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

Sanjay Raut in Bharat Jodo Yatra: संजय राऊतांची ‘पवार’फुल खेळी; भरपावसात राहुल गांधींसोबत भारत जोडोची पदयात्रा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 13:18 IST

Sanjay Raut in Bharat Jodo Yatra: महाराष्ट्रातही पावसामुळेच सत्तांतर झाले होते. राजकारणात पाऊस आणि वादळे येतच असतात, असे संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut in Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जम्मू काश्मीरमध्ये पोहोचली आहे. दक्षिण भारतातून सुरू झालेली ही पदयात्रा हजारो किलोमीटरचा प्रवास करून जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचली आहे. भारत जोडो यात्रा ज्या ज्या राज्यांमध्ये गेली, त्या त्या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले जात आहे. यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. यापूर्वीच आपण भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते. 

भारत जोडो यात्रेत पुन्हा एकदा राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यातील जवळीक दिसून आली. राहुल गांधी यांच्या पदयात्रेला सुरुवात झाली तेव्हा जम्मू परिसरात पाऊस पडत होता. संजय राऊत यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. जम्मूमध्ये ५ अंश सेल्सिअस इतके तापमान आहे. अशातच पदयात्रेच्यावेळी पावसाला सुरुवात झाली. तेव्हा राहुल गांधी यांनी माझ्यासाठी रेनकोटची व्यवस्था केली. ते सुरुवातीला मला त्यांच्यात अंगावरील रेनकोट काढून देत होते. मी नको नको म्हणत असतान त्यांनी गाडीतून दुसरा रेनकोटही मागवला. मात्र, मी पावसात चालायची तयारी दाखवली आणि आम्ही पुढे चालू लागलो. महाराष्ट्रातही पावसामुळेच सत्तांतर झाले होते, असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी बोलताना लगावला.

राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेचा पहिला टप्पा पूर्ण केला

राहुल गांधी कडाक्याच्या थंडीत फक्त एका टी-शर्टवर फिरतात, याविषयी संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली. तेव्हा राऊत यांनी म्हटले की, मी गेल्या अनेक वर्षांपासून राहुल गांधी यांना ओळखतो. मला त्यांची दिनचर्या माहिती आहे, मला त्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता माहिती आहे. राहुल गांधीही मला अनेक वर्षांपासून ओळखतात. त्यांनी माझी विचारपूस केली. माझ्या हृदयात सहा स्टेन्स असल्याचे त्यांना माहिती आहे. त्यामुळे मी चालू शकेन की नाही, याबाबत राहुल गांधी यांना शंका होती. परंतु, मी राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेचा पहिला टप्पा पूर्ण केला, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

दरम्यान, संजय राऊत गळ्यात भगवी मफलर घालून राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत चालत होते. राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबर पासून तामिळनाडूच्या कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती. मागचे चार महिने कन्याकुमारीपासून दक्षिणेतली राज्य पायी चालत राहुल गांधी उत्तरेत पोहोचले आहेत. येत्या काही दिवसांत भारत जोडो यात्रेची सांगता होणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी