शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut in Bharat Jodo Yatra: संजय राऊतांची ‘पवार’फुल खेळी; भरपावसात राहुल गांधींसोबत भारत जोडोची पदयात्रा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 13:18 IST

Sanjay Raut in Bharat Jodo Yatra: महाराष्ट्रातही पावसामुळेच सत्तांतर झाले होते. राजकारणात पाऊस आणि वादळे येतच असतात, असे संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut in Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जम्मू काश्मीरमध्ये पोहोचली आहे. दक्षिण भारतातून सुरू झालेली ही पदयात्रा हजारो किलोमीटरचा प्रवास करून जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचली आहे. भारत जोडो यात्रा ज्या ज्या राज्यांमध्ये गेली, त्या त्या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले जात आहे. यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. यापूर्वीच आपण भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते. 

भारत जोडो यात्रेत पुन्हा एकदा राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यातील जवळीक दिसून आली. राहुल गांधी यांच्या पदयात्रेला सुरुवात झाली तेव्हा जम्मू परिसरात पाऊस पडत होता. संजय राऊत यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. जम्मूमध्ये ५ अंश सेल्सिअस इतके तापमान आहे. अशातच पदयात्रेच्यावेळी पावसाला सुरुवात झाली. तेव्हा राहुल गांधी यांनी माझ्यासाठी रेनकोटची व्यवस्था केली. ते सुरुवातीला मला त्यांच्यात अंगावरील रेनकोट काढून देत होते. मी नको नको म्हणत असतान त्यांनी गाडीतून दुसरा रेनकोटही मागवला. मात्र, मी पावसात चालायची तयारी दाखवली आणि आम्ही पुढे चालू लागलो. महाराष्ट्रातही पावसामुळेच सत्तांतर झाले होते, असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी बोलताना लगावला.

राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेचा पहिला टप्पा पूर्ण केला

राहुल गांधी कडाक्याच्या थंडीत फक्त एका टी-शर्टवर फिरतात, याविषयी संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली. तेव्हा राऊत यांनी म्हटले की, मी गेल्या अनेक वर्षांपासून राहुल गांधी यांना ओळखतो. मला त्यांची दिनचर्या माहिती आहे, मला त्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता माहिती आहे. राहुल गांधीही मला अनेक वर्षांपासून ओळखतात. त्यांनी माझी विचारपूस केली. माझ्या हृदयात सहा स्टेन्स असल्याचे त्यांना माहिती आहे. त्यामुळे मी चालू शकेन की नाही, याबाबत राहुल गांधी यांना शंका होती. परंतु, मी राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेचा पहिला टप्पा पूर्ण केला, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

दरम्यान, संजय राऊत गळ्यात भगवी मफलर घालून राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत चालत होते. राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबर पासून तामिळनाडूच्या कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती. मागचे चार महिने कन्याकुमारीपासून दक्षिणेतली राज्य पायी चालत राहुल गांधी उत्तरेत पोहोचले आहेत. येत्या काही दिवसांत भारत जोडो यात्रेची सांगता होणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी