शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Sanjay Raut in Bharat Jodo Yatra: संजय राऊतांची ‘पवार’फुल खेळी; भरपावसात राहुल गांधींसोबत भारत जोडोची पदयात्रा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 13:18 IST

Sanjay Raut in Bharat Jodo Yatra: महाराष्ट्रातही पावसामुळेच सत्तांतर झाले होते. राजकारणात पाऊस आणि वादळे येतच असतात, असे संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut in Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जम्मू काश्मीरमध्ये पोहोचली आहे. दक्षिण भारतातून सुरू झालेली ही पदयात्रा हजारो किलोमीटरचा प्रवास करून जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचली आहे. भारत जोडो यात्रा ज्या ज्या राज्यांमध्ये गेली, त्या त्या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले जात आहे. यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. यापूर्वीच आपण भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते. 

भारत जोडो यात्रेत पुन्हा एकदा राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यातील जवळीक दिसून आली. राहुल गांधी यांच्या पदयात्रेला सुरुवात झाली तेव्हा जम्मू परिसरात पाऊस पडत होता. संजय राऊत यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. जम्मूमध्ये ५ अंश सेल्सिअस इतके तापमान आहे. अशातच पदयात्रेच्यावेळी पावसाला सुरुवात झाली. तेव्हा राहुल गांधी यांनी माझ्यासाठी रेनकोटची व्यवस्था केली. ते सुरुवातीला मला त्यांच्यात अंगावरील रेनकोट काढून देत होते. मी नको नको म्हणत असतान त्यांनी गाडीतून दुसरा रेनकोटही मागवला. मात्र, मी पावसात चालायची तयारी दाखवली आणि आम्ही पुढे चालू लागलो. महाराष्ट्रातही पावसामुळेच सत्तांतर झाले होते, असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी बोलताना लगावला.

राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेचा पहिला टप्पा पूर्ण केला

राहुल गांधी कडाक्याच्या थंडीत फक्त एका टी-शर्टवर फिरतात, याविषयी संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली. तेव्हा राऊत यांनी म्हटले की, मी गेल्या अनेक वर्षांपासून राहुल गांधी यांना ओळखतो. मला त्यांची दिनचर्या माहिती आहे, मला त्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता माहिती आहे. राहुल गांधीही मला अनेक वर्षांपासून ओळखतात. त्यांनी माझी विचारपूस केली. माझ्या हृदयात सहा स्टेन्स असल्याचे त्यांना माहिती आहे. त्यामुळे मी चालू शकेन की नाही, याबाबत राहुल गांधी यांना शंका होती. परंतु, मी राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेचा पहिला टप्पा पूर्ण केला, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

दरम्यान, संजय राऊत गळ्यात भगवी मफलर घालून राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत चालत होते. राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबर पासून तामिळनाडूच्या कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती. मागचे चार महिने कन्याकुमारीपासून दक्षिणेतली राज्य पायी चालत राहुल गांधी उत्तरेत पोहोचले आहेत. येत्या काही दिवसांत भारत जोडो यात्रेची सांगता होणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी