शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

Sanjay Raut: “कलम ३७० रद्द केल्यावर कुठेच स्वर्ग दिसला नाही, काश्मिरी पंडितांच्या घरवापसीचं काय झालं?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 15:11 IST

Sanjay Raut: उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार भारत जोडो यात्रेत सहभागी झालो होतो, असे सांगत जम्मू काश्मीरमधील समस्या आजही कायम असल्याची टीका संजय राऊतांनी केली.

Sanjay Raut: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सहभागी झाले होते. आताच्या घडीला भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये आहे. संजय राऊत यांनी जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद ३७० कलम रद्द केल्यानंतर मोदी सरकारने दिलेल्या आश्वासनांवरून निशाणा साधला आहे. अनुच्छेद ३७० रद्द केल्यावर कुठेच स्वर्ग दिसला नाही. काश्मिरी पंडितांच्या घरवापसीचे काय झाले, असा थेट सवाल संजय राऊत यांनी मोदी सरकारला केला आहे. 

मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, जम्मू काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० नाही. मात्र, अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये उद्योग येतील, रोजगार वाढेल, काश्मीर पुन्हा एकदा स्वर्ग बनेल आदी आश्वासने मोदी सरकारकडून देण्यात आली होती. पण आज इथे आल्यानंतर जेव्हा लोकांशी चर्चा केली तेव्हा इथे कुठेच स्वर्ग दिसला नाही, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी यावेळी बोलताना केली. 

काश्मिरी पंडितांच्या घरवापसीचे काय झाले?

काश्मिरी पंडितांचा आक्रोश आजही कायम आहे. ते आजही स्वत:च्या घरी ज्यायला घाबरत आहेत. सत्तेत आल्यानंतर त्यांची घरवापसी केली जाईल, असे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. त्याचे काय झाले? अशी विचारणा संजय राऊत यांनी केली. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचलो, तेव्हा मला आश्चर्य वाटले. काही वर्षांपूर्वी आपण जम्मू-काश्मीरच्या ज्या प्रश्नांवर आपण चर्चा करत होतो, तेच प्रश्न आजही कायम आहेत. यादरम्यान राज्यात आणि केंद्रात सरकारे बदलली. मात्र, काश्मीरी पंडित, कायदा सुव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद हे मुद्दे आजही कायम आहेत. गेल्या चार वर्षांपासून इथे राज्यपालांचे शासन आहे. निवडणुका झाल्या नाहीत. येथील मुख्ममंत्री निवास्थानही खाली आहे, तिथे काय होते मला माहिती नाही, या शब्दांत संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, जम्मू काश्मीर आणि बाळासाहेब ठाकरेंचं नेहमीच एक भावनिक नातं राहिलं आहे. त्यानुसार मी उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार या यात्रेत सहभागी झालो होतो. हा अतिशय सुंदर अनुभव होता. खरे तर या यात्रेला राजकीय यात्रा मानत नाही. या देशतील जवळपास सर्वच राजकीय पक्षाचे नेते या यात्रेत सहभागी झाले होते. महाराष्ट्रात यात्रा आली तेव्हा आदित्य ठाकरेही सहभागी झाले होते, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर