शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

Lakhimpur Kheri Incident: “खून करणाऱ्यांना सरकार वाचवतंय, मग शेतकऱ्यांसाठी अश्रू कशाला ढाळता?”; संजय राऊतांचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 13:21 IST

Lakhimpur Kheri Incident: संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून, देश सर्वोच्च न्यायालयाचा आभारी आहे, असे म्हटले आहे.

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी (Lakhimpur Kheri Incident) येथे झालेल्या हिंसाचारानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. योगी आणि मोदी सरकारविरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. यातच या घटनेतील पीडितांच्या कुटुंबीयांची राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी भेट घेतली. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतः दखल घेत याचिका दाखल करून घेतली असून, यावर सुनावणी होणार आहे. या एकूणच घटनाक्रमाबाबत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून, देश सर्वोच्च न्यायालयाचा आभारी आहे, असे म्हटले आहे. 

लखीमपूर खिरी घटनेवरून राकेश टिकैत यांनी सरकारला इशारा दिला आहे. लखीमपूर खिरी घटनेसंदर्भात आमचा विरोध कायम असून, तो शमलेला नाही. आम्ही केवळ आठ दिवस प्रतीक्षा करू. आठ दिवसात सरकारकडून ठोस पावले उचचली गेली नाहीत. अटक झाली नाही, तर देशव्यापी आंदोलन केले जाईल, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. यानंतर आता संजय राऊत यांनी यावर भाष्य करत सरकारवर निशाणा साधला आहे. 

देश सर्वोच्च न्यायालयाचा आभारी आहे

केंद्र सरकारने किंवा उत्तर प्रदेश सरकारने यासंदर्भातील जे प्रमुख गुन्हेगार आहे त्यांना अटक केलेली नाही. त्यांच्या संदर्भात सगळे पुरावे, व्हिडिओ, ऑडिओ हे समोर येऊन सुद्धा सरकार कुणाला वाचवत आहे? शेतकऱ्यांचा खून करणाऱ्याला सरकार वाचवत आहे. मग शेतकऱ्यांकरता कशाला अश्रू ढाळता. पण देश सर्वोच्च न्यायालयाचा आभारी आहे. या गंभीर प्रकरणाची दखल देशाच्या न्यायालयाला घ्यावीशी वाटत आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, भाजप खासदार वरुण गांधी यांनी लखीमपूर येथे झालेल्या घटनेवरुन पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. वरुण गांधी यांनी ट्विटरवर लखीमपूर येथील एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात एक भरधाव गाडी शेतकऱ्यांना चिरडत जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी निष्पाप शेतकऱ्यांच्या मृत्यूची जबाबदारी स्विकारण्याचे आवाहन केले आहे. 

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत