शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

Lakhimpur Kheri Incident: “खून करणाऱ्यांना सरकार वाचवतंय, मग शेतकऱ्यांसाठी अश्रू कशाला ढाळता?”; संजय राऊतांचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 13:21 IST

Lakhimpur Kheri Incident: संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून, देश सर्वोच्च न्यायालयाचा आभारी आहे, असे म्हटले आहे.

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी (Lakhimpur Kheri Incident) येथे झालेल्या हिंसाचारानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. योगी आणि मोदी सरकारविरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. यातच या घटनेतील पीडितांच्या कुटुंबीयांची राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी भेट घेतली. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतः दखल घेत याचिका दाखल करून घेतली असून, यावर सुनावणी होणार आहे. या एकूणच घटनाक्रमाबाबत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून, देश सर्वोच्च न्यायालयाचा आभारी आहे, असे म्हटले आहे. 

लखीमपूर खिरी घटनेवरून राकेश टिकैत यांनी सरकारला इशारा दिला आहे. लखीमपूर खिरी घटनेसंदर्भात आमचा विरोध कायम असून, तो शमलेला नाही. आम्ही केवळ आठ दिवस प्रतीक्षा करू. आठ दिवसात सरकारकडून ठोस पावले उचचली गेली नाहीत. अटक झाली नाही, तर देशव्यापी आंदोलन केले जाईल, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. यानंतर आता संजय राऊत यांनी यावर भाष्य करत सरकारवर निशाणा साधला आहे. 

देश सर्वोच्च न्यायालयाचा आभारी आहे

केंद्र सरकारने किंवा उत्तर प्रदेश सरकारने यासंदर्भातील जे प्रमुख गुन्हेगार आहे त्यांना अटक केलेली नाही. त्यांच्या संदर्भात सगळे पुरावे, व्हिडिओ, ऑडिओ हे समोर येऊन सुद्धा सरकार कुणाला वाचवत आहे? शेतकऱ्यांचा खून करणाऱ्याला सरकार वाचवत आहे. मग शेतकऱ्यांकरता कशाला अश्रू ढाळता. पण देश सर्वोच्च न्यायालयाचा आभारी आहे. या गंभीर प्रकरणाची दखल देशाच्या न्यायालयाला घ्यावीशी वाटत आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, भाजप खासदार वरुण गांधी यांनी लखीमपूर येथे झालेल्या घटनेवरुन पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. वरुण गांधी यांनी ट्विटरवर लखीमपूर येथील एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात एक भरधाव गाडी शेतकऱ्यांना चिरडत जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी निष्पाप शेतकऱ्यांच्या मृत्यूची जबाबदारी स्विकारण्याचे आवाहन केले आहे. 

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत