शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

संजय राऊतांनी गुवाहाटीत येऊ नये, हीच कळकळीची विनंती; बंडखोर आमदारांनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 14:20 IST

एकीकडे संजय राऊत यांच्यावर टीका करताना, दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बंडखोर आमदारांनी कौतुक केले आहे.

गुवाहाटी: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात अगदी वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. राज्याचे आणखी एक मंत्री उदय सामंतही गुवाहाटीला पोहोचले. मात्र, या बंडखोरीसंदर्भातील सर्व प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. यातच आता बंडखोर आमदार शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांच्याकडून होत असलेल्या विधानासंदर्भात बंडखोर आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

बंडखोर आमदारांमध्ये काही मंत्रीही आहेत. राज्याचे कामकाज थांबू नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडील खाती काढून त्याचा कार्यभार अन्य मंत्र्यांकडे वर्ग केला आहे.  बंडखोर आमदारांचे प्रवक्ते असलेले दीपक केसरकर यांनी या सर्व घटनांवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योग्य निर्णय घेतला आहे. राज्याचा कारभार थांबू नये, ही आमचीही इच्छा आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याची काळजी घेणे आवश्यक आहे. उद्धव ठाकरे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री राज्याच्या बाहेर गेले असतील, तर त्यांची खाती इतरांकडे देऊन राज्यकारभार सुरळीत सुरू ठेवणे हे त्यांचे कर्तव्य आहे. मुख्यमंत्री कर्तव्यदक्ष असल्यामुळे त्यांनी त्याचे पालन केले. 

संजय राऊतांनी गुवाहाटीत येऊ नये, हीच कळकळीची विनंती

राज्यातील राजकारण ढवळून निघत असताना दुसरीकडे संजय राऊत यांना ईडीने नोटीस बजावत मंगळवारी सकाळी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना, माझी मान कापली तरी गुवाहाटीचा मार्ग स्वीकारणार नाही, असे स्पष्ट केले होते. यावर प्रतिक्रिया देताना दीपक केसरकर म्हणाले की, संजय राऊतांनी गुवाहाटीत येऊ नये, हीच कळकळीची विनंती आहे. मी संयमाने बोलतो. बाळासाहेब ठाकरे असते तर हाकलून लावले असते. बाळासाहेब असते बंडखोरी झालीच नसती. त्यांनी मायेने पाठिवर थाप फिरवून म्हणणे ऐकून घेतले असते. संजय राऊतांचे ईडीचे प्रकरण जुनेच आहे. राऊतांचे टायमिंगही चुकीचे असते. आम्हाला मृत झालेले आहेत बोलतात. संजय राऊतांचे टायमिंग चुकते. ईडीच्या प्रश्नांना सौम्य भाषेत उत्तर द्यावीत, असा टोला दीपक केसरकर यांनी राऊतांना लगावला. 

दरम्यान, संजय राऊत यांच्यावर बंडखोर आमदार संतप्त आहे. या लोकांची मते घेऊन राज्यसभेत गेले. थोडीशी  शिल्लक असेल तर राजीनामा द्या, तुमचे राष्ट्रवादीत हितचिंतक आहेत त्यांची मते घेऊन राज्यसभेत जा. संजय राऊतांना मतदान करून आम्ही चुकलो, आमच्या चुकीबद्दल ईश्वराची माफी मागतो. आमच्याकडून मते मिळाली त्यांनी राजीनामा द्यावा. राऊतांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर खासदार व्हावे. ते अर्धावेळ राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून काम करतात. आमच्याबद्दल बोलू नये. असा प्रवक्ता कुठल्याही पक्षाला देऊ नये अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDeepak Kesarkarदीपक केसरकर Shiv Senaशिवसेना