शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

संजय राऊतांनी गुवाहाटीत येऊ नये, हीच कळकळीची विनंती; बंडखोर आमदारांनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 14:20 IST

एकीकडे संजय राऊत यांच्यावर टीका करताना, दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बंडखोर आमदारांनी कौतुक केले आहे.

गुवाहाटी: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात अगदी वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. राज्याचे आणखी एक मंत्री उदय सामंतही गुवाहाटीला पोहोचले. मात्र, या बंडखोरीसंदर्भातील सर्व प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. यातच आता बंडखोर आमदार शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांच्याकडून होत असलेल्या विधानासंदर्भात बंडखोर आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

बंडखोर आमदारांमध्ये काही मंत्रीही आहेत. राज्याचे कामकाज थांबू नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडील खाती काढून त्याचा कार्यभार अन्य मंत्र्यांकडे वर्ग केला आहे.  बंडखोर आमदारांचे प्रवक्ते असलेले दीपक केसरकर यांनी या सर्व घटनांवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योग्य निर्णय घेतला आहे. राज्याचा कारभार थांबू नये, ही आमचीही इच्छा आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याची काळजी घेणे आवश्यक आहे. उद्धव ठाकरे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री राज्याच्या बाहेर गेले असतील, तर त्यांची खाती इतरांकडे देऊन राज्यकारभार सुरळीत सुरू ठेवणे हे त्यांचे कर्तव्य आहे. मुख्यमंत्री कर्तव्यदक्ष असल्यामुळे त्यांनी त्याचे पालन केले. 

संजय राऊतांनी गुवाहाटीत येऊ नये, हीच कळकळीची विनंती

राज्यातील राजकारण ढवळून निघत असताना दुसरीकडे संजय राऊत यांना ईडीने नोटीस बजावत मंगळवारी सकाळी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना, माझी मान कापली तरी गुवाहाटीचा मार्ग स्वीकारणार नाही, असे स्पष्ट केले होते. यावर प्रतिक्रिया देताना दीपक केसरकर म्हणाले की, संजय राऊतांनी गुवाहाटीत येऊ नये, हीच कळकळीची विनंती आहे. मी संयमाने बोलतो. बाळासाहेब ठाकरे असते तर हाकलून लावले असते. बाळासाहेब असते बंडखोरी झालीच नसती. त्यांनी मायेने पाठिवर थाप फिरवून म्हणणे ऐकून घेतले असते. संजय राऊतांचे ईडीचे प्रकरण जुनेच आहे. राऊतांचे टायमिंगही चुकीचे असते. आम्हाला मृत झालेले आहेत बोलतात. संजय राऊतांचे टायमिंग चुकते. ईडीच्या प्रश्नांना सौम्य भाषेत उत्तर द्यावीत, असा टोला दीपक केसरकर यांनी राऊतांना लगावला. 

दरम्यान, संजय राऊत यांच्यावर बंडखोर आमदार संतप्त आहे. या लोकांची मते घेऊन राज्यसभेत गेले. थोडीशी  शिल्लक असेल तर राजीनामा द्या, तुमचे राष्ट्रवादीत हितचिंतक आहेत त्यांची मते घेऊन राज्यसभेत जा. संजय राऊतांना मतदान करून आम्ही चुकलो, आमच्या चुकीबद्दल ईश्वराची माफी मागतो. आमच्याकडून मते मिळाली त्यांनी राजीनामा द्यावा. राऊतांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर खासदार व्हावे. ते अर्धावेळ राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून काम करतात. आमच्याबद्दल बोलू नये. असा प्रवक्ता कुठल्याही पक्षाला देऊ नये अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDeepak Kesarkarदीपक केसरकर Shiv Senaशिवसेना