शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांपेक्षा शरद पवार अधिक प्रिय, अन्यथा...”; बंडखोरांनी पुन्हा सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 16:01 IST

Maharashtra Political Crisis: आता निर्णय विधानसभेच्या पटलावरच होईल, असे बंडखोर आमदारांनी पुन्हा एकदा निक्षून सांगितले आहे.

गुवाहाटी: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३५ हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आठवडाभरापासून राज्यातील राजकीय संघर्ष पराकोटीला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. आठवडभरापासून वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या भाजपने अखेर या राजकीय नाट्यात उडी घेत थेट राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना बहुमत चाचणीचे पत्र दिले. यातच बुधवारी सकाळी बंडखोर आमदारांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर बोलताना शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना शिवसैनिकांपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांचा पक्षच जवळचा वाटत असल्याची टीका केली. 

दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जायचे नाही. महाविकास आघाडीने आपली नाटके आता थांबवावीत. आमची हात जोडून विनंती आहे की, आता ताणून धरू नका. तुमच्याकडे बहुमत नाही हे मान्य करा. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात बहुमत चाचणीवेळी केवळ अपक्षांनी भाजपच्या बाजूने मतदान केले तरी हे सरकार पडेल, ३९ लोक तर सोडूनच द्या. तुम्ही बंडखोर आमदारांना वाटेल तसे बोलणार, मग ते तुम्हाला येऊन मतदान करणार, ही शिवसेना नेत्यांना असलेली वेडी आशा आहे, असा टोलाही दीपक केसरकर यांनी लगावला आहे. 

उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांपेक्षा शरद पवार अधिक प्रिय

आम्ही त्यांना आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेसोबतची युती तोडावी असा सल्ला देत होतो. आम्ही खरे शिवसैनिक आहोत. मात्र त्यांना शिवसैनिकांपेक्षा शरद पवार आणि त्यांचा पक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस) अधिक प्रिय आहेत. हे सर्वांना मान्य होणारे नाही. त्यामुळे यापुढे काही चर्चेची अपेक्षा आहे असे वाटत नाही. आता वेळ निघून गेलेली आहे आता निर्णय विधानसभेच्या पटलावरच होईल, असे दीपक केसरकर यांनी स्पष्टपणे सांगितले. 

दरम्यान, आम्हाला संजय राऊत यांनी महाराष्ट्रात येण्यापासून रोखले आहे. त्यांनाच विचारा. संजय राऊत यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरवले आहे. आमची कार्यालये फोडली जात आहेत. धमक्या दिल्या जात आहेत. मग अशा परिस्थितीत कसे परतणार, अशी विचारणा दीपक केसरकर यांनी केली. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाDeepak Kesarkarदीपक केसरकर