शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांपेक्षा शरद पवार अधिक प्रिय, अन्यथा...”; बंडखोरांनी पुन्हा सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 16:01 IST

Maharashtra Political Crisis: आता निर्णय विधानसभेच्या पटलावरच होईल, असे बंडखोर आमदारांनी पुन्हा एकदा निक्षून सांगितले आहे.

गुवाहाटी: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३५ हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आठवडाभरापासून राज्यातील राजकीय संघर्ष पराकोटीला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. आठवडभरापासून वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या भाजपने अखेर या राजकीय नाट्यात उडी घेत थेट राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना बहुमत चाचणीचे पत्र दिले. यातच बुधवारी सकाळी बंडखोर आमदारांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर बोलताना शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना शिवसैनिकांपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांचा पक्षच जवळचा वाटत असल्याची टीका केली. 

दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जायचे नाही. महाविकास आघाडीने आपली नाटके आता थांबवावीत. आमची हात जोडून विनंती आहे की, आता ताणून धरू नका. तुमच्याकडे बहुमत नाही हे मान्य करा. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात बहुमत चाचणीवेळी केवळ अपक्षांनी भाजपच्या बाजूने मतदान केले तरी हे सरकार पडेल, ३९ लोक तर सोडूनच द्या. तुम्ही बंडखोर आमदारांना वाटेल तसे बोलणार, मग ते तुम्हाला येऊन मतदान करणार, ही शिवसेना नेत्यांना असलेली वेडी आशा आहे, असा टोलाही दीपक केसरकर यांनी लगावला आहे. 

उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांपेक्षा शरद पवार अधिक प्रिय

आम्ही त्यांना आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेसोबतची युती तोडावी असा सल्ला देत होतो. आम्ही खरे शिवसैनिक आहोत. मात्र त्यांना शिवसैनिकांपेक्षा शरद पवार आणि त्यांचा पक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस) अधिक प्रिय आहेत. हे सर्वांना मान्य होणारे नाही. त्यामुळे यापुढे काही चर्चेची अपेक्षा आहे असे वाटत नाही. आता वेळ निघून गेलेली आहे आता निर्णय विधानसभेच्या पटलावरच होईल, असे दीपक केसरकर यांनी स्पष्टपणे सांगितले. 

दरम्यान, आम्हाला संजय राऊत यांनी महाराष्ट्रात येण्यापासून रोखले आहे. त्यांनाच विचारा. संजय राऊत यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरवले आहे. आमची कार्यालये फोडली जात आहेत. धमक्या दिल्या जात आहेत. मग अशा परिस्थितीत कसे परतणार, अशी विचारणा दीपक केसरकर यांनी केली. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाDeepak Kesarkarदीपक केसरकर