शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"आज बाळासाहेब ठाकरे असते अन्..."; श्रीकांत शिंदेंनी वक्फ विधेयकाला विरोध करणाऱ्या ठाकरे गटाला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 18:35 IST

ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांना हालहाल करून मारले, आज त्याची वकीली करण्याची वेळ काँग्रेस सोबत उभे राहिल्यानंतर यूबीटी वाल्यांवर आली आहे, असेही श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले.

वक्फ सुधारणा विधेयक (Waqf Amendment  Bill)  आज (02 अप्रैल) लोकसभेत सादर करण्यात आले असून त्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. हे विधेयक मंजूर करण्यासाठी एनडीए पूर्णपणे तयार आहे. या विधेयकावर सुरू असलेल्या चर्चेत आज शिवसेना (शिंदे) खासदार श्रीकांत शिंदे यांनीही भाग घेतला होता. यावेळी या विधेयकाच्या बाजूने बोलत त्यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला.

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, "मी माझा पक्ष शिवसेना आणि आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्या वतीने या विधेयकाचे पूर्णपणे समर्थन करतो. आज एक ऐतिहासिक दिवस आहे. आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, आधी कलम ३७०, नंतर ट्रिपल तलाक सीए आणि आज गरीब मुस्लिम बांधवांच्या उद्धारासाठी हे वक्फ विधेयक सभागृहात आणण्यात आले आहे."

अरविंद सावंतांना टोला -शिंदे म्हणाले "मला अरविंद सावंत यांना पहिला प्रश्न विचारायचा आहे की, त्यांनी आज हिरव्या रंगाचे जॅकेट बुधवारसाठी परिधान केले आहे की, वक्फसाठी खास ड्रेस करून आले आहात? मला येथे त्यांचे भाषण ऐकताना प्रचंड वेदना झाल्या. अत्यंत धक्कादायक होते. मला यूबीटी वाल्यांना प्रश्न विचारायाचा आहे की, त्यांनी त्यांच्या अतरात्म्याला प्रश्न विचारायला हवा की, आज बाळासाहेब असते, तर ते येथे हे भाषण करू शकले असते का? 

"आज या सभागृहात एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे, हे यूबीटी वाले कुणाची विचारधारा मानत आहेत आणि विधेयकाला विरोध करत आहेत. यांच्याकडे आपल्या चुका सुधारण्याची, आपला इतिहास सांभाळायची आणि विचारधारा जिवंत ठेवण्याची सुवर्ण संधी होती. मात्र, यूबीटीने आधीच त्यांची विचारधारा पायदळी तुडवली आहे. बाळासाहेबांची विचारधारा स्पष्ट होती, ती म्हणजे, हिंदुत्वाचे रक्षण, देशाची एकता आणि इतर धर्मातील लोकांसाठी आदर," असे शिंदे म्हणाले. 

"आज जर बाळासाहेब ठाकरे येथे असते अन्..." -श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले, "आज जर बाळासाहेब ठाकरे येथे असते आणि त्यांनी यूबीटीची डिसेंट नोट वाचली असती, तर त्यांच्या आत्म्याला प्रचंड वेदना झाल्या असत्या. मी येथे यूबीटीची असहमती नोट घेऊन आलो आहे, यात त्यांनी म्हटले आहे की, गैर-मुस्लिम सदस्य वक्फ बोर्डमध्ये नसावेत आणि त्यावर ते शिष्टाई करत होते. बाळासाहेब नेहमी हिंदुत्वासाठी लढत होते. मला वाटले यांना केवळ हिंदूत्वाची अॅलर्जी होती, मात्र आज युबाटीला हिंदूंचीही अॅलर्जी होऊ लागली आहे." 

हे लोक औरंगजेबाच्या विचारधारेवर चालतायत, असे आम्ही उगाचच म्हणत नाहीत -औरंगजेब आणि अफजलखानाचा उल्लेख करत  शिंदे म्हणाले, "आज त्यांनी आणखी एका असहमती नोटमध्ये म्हटले आहे की, विविध शासक, नवाब आणि जमीनदारांनी समर्पित केलेल्या वैयक्तिक मालमत्तांचे संरक्षण आणि जतन करा." हे लोक औरंगजेब आणि अफजलखानाच्या विचारधारेवर चालत आहेत, असे आम्ही उगाचच म्हणत नाहीत. आता त्यांच्या मालमत्तांचे रक्षण करण्यासाठी उघडपणे पत्र लिहिण्याचे कामही यूबीटी वाल्यांनी केले आहे." 

ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांना हालहाल करून मारले, आज त्याची वकीली करण्याची वेळ काँग्रेस सोबत उभे राहिल्यानंतर यूबीटी वाल्यांवर आली आहे, असेही श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेlok sabhaलोकसभाwaqf board amendment billवक्फ बोर्डShiv Senaशिवसेना