शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

Pulwama Attack: सामाजिक भान जपणाऱ्या जिल्हाधिकारी; स्वीकारणार शहिदाच्या कुटुंबाची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 17:07 IST

शहीद जवानांच्या मदतीसाठी सरसावल्या जिल्हाधिकारी इनायत खान

शेखपुरा: पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्यानं देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करा, अशी भावना संपूर्ण देशातून व्यक्त होत आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली जात आहे. एका बाजूला पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त होत असताना दुसऱ्या बाजूला हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत. बिहारमधील एक जिल्हाधिकारी राज्यातील शहीद जवानाच्या कुटुंबीयांची जबाबदार स्वीकारणार आहेत. बिहारच्या शेखपूरच्या जिल्हाधिकारी इनायत खान यांनी जिल्ह्यातील एका शहीद कुटुंबाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. राज्यातील दोन जवान गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. या दोन्ही कुटुंबांच्या मदतीसाठी बँक खाती उघडण्याचे आदेश इनायत खान यांनी दिले. या कुटुंबांच्या सहाय्यासाठी जमा झालेला निधी या खात्यांमध्ये जमा करण्यात येईल. 10 मार्चपर्यंत जितका मदत निधी जमा होईल, त्याचे दोन समान भाग करुन ते दोन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये जमा केले जातील, अशी माहिती खान यांनी दिली. मी दोनपैकी एका कुटुंबाची जबाबदारी स्वीकारणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पाटनाच्या रारगढ गावचे संजय कुमार सिन्हा आणि भागलपूरच्या रतनपूर गावचे रतन कुमार ठाकूर यांनी पुलवामातील हल्ल्यात हौतात्म्य पत्करलं. गुरुवारी पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. आदिल अहमद दार या दहशतवादी तरुणानं स्फोटकांनी भरलेल्या कारसह एका बसला धडक दिली. जैश-ए-मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांनी शहीद जवानांच्या कुटुंबांना मदत जाहीर केली. याशिवाय सर्वसामान्य जनताही शहिदांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी पुढे सरसावली. क्रिकेटपटू, बॉलिवूड कलाकार यांच्यासह अनेक क्षेत्रांमधली व्यक्तींनीदेखील शहीदांच्या कुटुंबीयांना सढळ हातांनी मदत केली.  

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाMartyrशहीदBiharबिहारTerror Attackदहशतवादी हल्लाJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मद