शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

Pulwama Attack: सामाजिक भान जपणाऱ्या जिल्हाधिकारी; स्वीकारणार शहिदाच्या कुटुंबाची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 17:07 IST

शहीद जवानांच्या मदतीसाठी सरसावल्या जिल्हाधिकारी इनायत खान

शेखपुरा: पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्यानं देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करा, अशी भावना संपूर्ण देशातून व्यक्त होत आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली जात आहे. एका बाजूला पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त होत असताना दुसऱ्या बाजूला हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत. बिहारमधील एक जिल्हाधिकारी राज्यातील शहीद जवानाच्या कुटुंबीयांची जबाबदार स्वीकारणार आहेत. बिहारच्या शेखपूरच्या जिल्हाधिकारी इनायत खान यांनी जिल्ह्यातील एका शहीद कुटुंबाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. राज्यातील दोन जवान गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. या दोन्ही कुटुंबांच्या मदतीसाठी बँक खाती उघडण्याचे आदेश इनायत खान यांनी दिले. या कुटुंबांच्या सहाय्यासाठी जमा झालेला निधी या खात्यांमध्ये जमा करण्यात येईल. 10 मार्चपर्यंत जितका मदत निधी जमा होईल, त्याचे दोन समान भाग करुन ते दोन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये जमा केले जातील, अशी माहिती खान यांनी दिली. मी दोनपैकी एका कुटुंबाची जबाबदारी स्वीकारणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पाटनाच्या रारगढ गावचे संजय कुमार सिन्हा आणि भागलपूरच्या रतनपूर गावचे रतन कुमार ठाकूर यांनी पुलवामातील हल्ल्यात हौतात्म्य पत्करलं. गुरुवारी पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. आदिल अहमद दार या दहशतवादी तरुणानं स्फोटकांनी भरलेल्या कारसह एका बसला धडक दिली. जैश-ए-मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांनी शहीद जवानांच्या कुटुंबांना मदत जाहीर केली. याशिवाय सर्वसामान्य जनताही शहिदांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी पुढे सरसावली. क्रिकेटपटू, बॉलिवूड कलाकार यांच्यासह अनेक क्षेत्रांमधली व्यक्तींनीदेखील शहीदांच्या कुटुंबीयांना सढळ हातांनी मदत केली.  

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाMartyrशहीदBiharबिहारTerror Attackदहशतवादी हल्लाJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मद