शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

“काश्मीर गाझा बनले नाही याचे सगळे श्रेय पंतप्रधान मोदी अन् अमित शाहांनाच जाते”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 10:40 IST

जम्मू काश्मीरमधील बदललेल्या परिस्थितीचे श्रेय पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जाते, या शब्दांत कौतुक करण्यात आले आहे.

नवी दिल्ली: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला आता ४० दिवस झाले आहे. युद्ध न थांबवण्याची भूमिका इस्रायलने घेतली आहे. भारताने इस्रायलला पाठिंबा दिला आहे. गाझापट्टीत सुरू असलेल्या धुमश्चक्रीचा संदर्भत घेत, भारतातील काश्मीर हे गाझा बनले नाही, याचे सगळे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जाते, असे स्पष्ट मत जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या माजी उपाध्यक्ष शेहला रशीद यांनी व्यक्त केले आहे. 

काश्मीरचे गाझा बनले नाही. काश्मीरमध्ये जे सकारात्मक बदल पाहायला मिळत आहे, परिवर्तन झाले आहे, हे केंद्रातील मोदी सरकारमुळे झाले आहे, अशी स्तुतिसुमने शेहला रशीद यांनी उधळली आहेत. यापूर्वी शेहला रशीद यांनी काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांबाबत सहानुभूती व्यक्त केली होती. यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना, हे सत्य आहे. पण हे माझे मत २०१० पूर्वीचे होते. आता ते मत बदलले आहे. आजच्या घडीला काश्मीरमध्ये जी परिस्थिती पाहायला मिळत आहे, त्याबाबत मोदी सरकारचे आभार मानायला हवेत, असे शेहला रशीद यांनी म्हटले आहे. 

काश्मीरमधील स्थिती बदलली आहे

काश्मीरमध्ये गाझासारखी परिस्थिती नाही, ही बाब स्पष्ट झाली आहे. काश्‍मीर फक्त विरोधी आंदोलने, निषेध मोर्चे होत असल्याचे पाहायला मिळत होते. दहशतवाद, घुसखोरीच्या घटनांसाठी काश्मीर ओळखले जायचे. मात्र, काश्मीरमधील स्थिती बदलली आहे. बदललेल्या परिस्थितीचे श्रेय सध्याच्या केंद्र सरकारला, विशेषतः पंतप्रधानांना आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देऊ इच्छिते, या शब्दांत शेहला रशीद यांनी कौतुक केले आहे. 

दरम्यान, केंद्र सरकारची धोरणे आणि नीति यांवर शेहला रशीद यांनी यापूर्वी जोरदार टीका केली होती. जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर शेहला रशीद यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच भारतीय सैन्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. मात्र, यानंतर आता शेहला रशीद यांनी केंद्रातील मोदी सरकारची कौतुक केले आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह