शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

“काश्मीर गाझा बनले नाही याचे सगळे श्रेय पंतप्रधान मोदी अन् अमित शाहांनाच जाते”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 10:40 IST

जम्मू काश्मीरमधील बदललेल्या परिस्थितीचे श्रेय पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जाते, या शब्दांत कौतुक करण्यात आले आहे.

नवी दिल्ली: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला आता ४० दिवस झाले आहे. युद्ध न थांबवण्याची भूमिका इस्रायलने घेतली आहे. भारताने इस्रायलला पाठिंबा दिला आहे. गाझापट्टीत सुरू असलेल्या धुमश्चक्रीचा संदर्भत घेत, भारतातील काश्मीर हे गाझा बनले नाही, याचे सगळे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जाते, असे स्पष्ट मत जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या माजी उपाध्यक्ष शेहला रशीद यांनी व्यक्त केले आहे. 

काश्मीरचे गाझा बनले नाही. काश्मीरमध्ये जे सकारात्मक बदल पाहायला मिळत आहे, परिवर्तन झाले आहे, हे केंद्रातील मोदी सरकारमुळे झाले आहे, अशी स्तुतिसुमने शेहला रशीद यांनी उधळली आहेत. यापूर्वी शेहला रशीद यांनी काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांबाबत सहानुभूती व्यक्त केली होती. यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना, हे सत्य आहे. पण हे माझे मत २०१० पूर्वीचे होते. आता ते मत बदलले आहे. आजच्या घडीला काश्मीरमध्ये जी परिस्थिती पाहायला मिळत आहे, त्याबाबत मोदी सरकारचे आभार मानायला हवेत, असे शेहला रशीद यांनी म्हटले आहे. 

काश्मीरमधील स्थिती बदलली आहे

काश्मीरमध्ये गाझासारखी परिस्थिती नाही, ही बाब स्पष्ट झाली आहे. काश्‍मीर फक्त विरोधी आंदोलने, निषेध मोर्चे होत असल्याचे पाहायला मिळत होते. दहशतवाद, घुसखोरीच्या घटनांसाठी काश्मीर ओळखले जायचे. मात्र, काश्मीरमधील स्थिती बदलली आहे. बदललेल्या परिस्थितीचे श्रेय सध्याच्या केंद्र सरकारला, विशेषतः पंतप्रधानांना आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देऊ इच्छिते, या शब्दांत शेहला रशीद यांनी कौतुक केले आहे. 

दरम्यान, केंद्र सरकारची धोरणे आणि नीति यांवर शेहला रशीद यांनी यापूर्वी जोरदार टीका केली होती. जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर शेहला रशीद यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच भारतीय सैन्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. मात्र, यानंतर आता शेहला रशीद यांनी केंद्रातील मोदी सरकारची कौतुक केले आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह