शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

“काश्मीर गाझा बनले नाही याचे सगळे श्रेय पंतप्रधान मोदी अन् अमित शाहांनाच जाते”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 10:40 IST

जम्मू काश्मीरमधील बदललेल्या परिस्थितीचे श्रेय पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जाते, या शब्दांत कौतुक करण्यात आले आहे.

नवी दिल्ली: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला आता ४० दिवस झाले आहे. युद्ध न थांबवण्याची भूमिका इस्रायलने घेतली आहे. भारताने इस्रायलला पाठिंबा दिला आहे. गाझापट्टीत सुरू असलेल्या धुमश्चक्रीचा संदर्भत घेत, भारतातील काश्मीर हे गाझा बनले नाही, याचे सगळे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जाते, असे स्पष्ट मत जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या माजी उपाध्यक्ष शेहला रशीद यांनी व्यक्त केले आहे. 

काश्मीरचे गाझा बनले नाही. काश्मीरमध्ये जे सकारात्मक बदल पाहायला मिळत आहे, परिवर्तन झाले आहे, हे केंद्रातील मोदी सरकारमुळे झाले आहे, अशी स्तुतिसुमने शेहला रशीद यांनी उधळली आहेत. यापूर्वी शेहला रशीद यांनी काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांबाबत सहानुभूती व्यक्त केली होती. यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना, हे सत्य आहे. पण हे माझे मत २०१० पूर्वीचे होते. आता ते मत बदलले आहे. आजच्या घडीला काश्मीरमध्ये जी परिस्थिती पाहायला मिळत आहे, त्याबाबत मोदी सरकारचे आभार मानायला हवेत, असे शेहला रशीद यांनी म्हटले आहे. 

काश्मीरमधील स्थिती बदलली आहे

काश्मीरमध्ये गाझासारखी परिस्थिती नाही, ही बाब स्पष्ट झाली आहे. काश्‍मीर फक्त विरोधी आंदोलने, निषेध मोर्चे होत असल्याचे पाहायला मिळत होते. दहशतवाद, घुसखोरीच्या घटनांसाठी काश्मीर ओळखले जायचे. मात्र, काश्मीरमधील स्थिती बदलली आहे. बदललेल्या परिस्थितीचे श्रेय सध्याच्या केंद्र सरकारला, विशेषतः पंतप्रधानांना आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देऊ इच्छिते, या शब्दांत शेहला रशीद यांनी कौतुक केले आहे. 

दरम्यान, केंद्र सरकारची धोरणे आणि नीति यांवर शेहला रशीद यांनी यापूर्वी जोरदार टीका केली होती. जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर शेहला रशीद यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच भारतीय सैन्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. मात्र, यानंतर आता शेहला रशीद यांनी केंद्रातील मोदी सरकारची कौतुक केले आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह