शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'आता पुढे जाण्याची गरज...', आंबेडकर वादावर शशी थरुरांनी काँग्रेस-भाजपला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 15:44 IST

Shashi Tharoor: आज संसदेत भाजप-काँग्रेसच्या खासदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे.

Shashi Tharoor: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राजकारण तापले आहे. एकीकडे विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला असून, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर, दुसरीकडे भाजपने काँग्रेसवर वारंवार संविधान आणि बाबासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. या सर्व गदारोळावर काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली.

शशी थरुर यांनी भाजप-काँग्रेसला फटकारलेअमित शाहांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी संसद परिसरात निदर्शने केली. यावेळी भाजपचे खासदारदेखील काँग्रेसविरोधात निदर्शने करत होते. यावेळी भाजप-काँग्रेसच्या खासदारांमध्ये धक्काबुक्की झाली, ज्यात दोन खासदार जखमी झाले. याबाबत बोलताना काँग्रेसचे खासदार शशी थरूर म्हणाले की, 'दुर्दैवाने बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आणि संविधान हेच राजकीय रणांगण बनले आहे.'

'दोन्ही बाजूने अयोग्य गोष्टी सुरू आहेत. आपल्याला भविष्यातील समस्यांवर पुढे जाण्याची गरज आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भाषणाचा व्हिडिओ योग्य नसेल, तर त्यांनी खरा व्हिडिओ सादर करावा,' असे आव्हान थरुर यांनी यावेळी दिले.

काँग्रेसने केली कारवाईची मागणी काही काँग्रेस खासदारांनी गुरुवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले अन् भाजपच्या खासदारांनी मारहाण केल्याचा आरोप केला. त्यांनी याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे. या पत्रावर काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, मुख्य व्हीप कोडिकुनिल सुरेश, व्हिप मणिकम टागोर आणि इतर काही सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा