शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 13:30 IST

Shashi Tharoor: भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी आपले मत मांडले.

भारतीय क्रिकेट संघाने २०२५ च्या आशिया कपमध्ये आपली उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवली आहे. भारताने काल बांगलादेशला पराभवाची धुळ चारून फायनलचे तिकीट मिळवले. आता बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील विजेता संघ अंतिम सामना २८ सप्टेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताशी भिडेल. त्यामुळे या स्पर्धेत तिसऱ्यांदा भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये शेजारील देशाच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न केल्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यावर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी आपले मत व्यक्त केले.

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना आशिया कपमध्ये भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याबद्दल थेट भाष्य केले. "मला वैयक्तिकरित्या असे वाटते की एकदा खेळण्याचा निर्णय घेतला गेला की, जर आपल्याला पाकिस्तानबद्दल इतका राग असेल तर आपण त्यांच्यासोबत खेळायला नको होते. पण जर आपण त्यांच्याशी खेळत आहोत, तर आपण खेळाच्या भावनेने खेळायला हवे होते आणि त्यांच्याशी हस्तांदोलन करायला हवे होते", असे ते म्हणाले.

१९९९ मधील कारगिल युद्धाचा दाखला देताना शशी थरूर म्हणाले की, "१९९९ मध्ये कारगिल युद्ध सुरू असताना आपले सैनिक देशासाठी शहीद झाले. त्यावेळी भारत इंग्लंडमध्ये पाकिस्तानविरुद्ध विश्वचषक खेळत होता. तेव्हा भारतीय संघाने त्यांच्याशी हस्तांदोलन केले. कारण क्रीडाभावनेची भावना देशांमधील, सैन्यांमधील संघर्षाच्या भावनेपेक्षा वेगळी असते. हे माझे मत आहे." पाकिस्तानविरुद्धच्या भावना स्वाभाविक आहेत. परंतु, क्रीडाभावनेला राजकारण आणि लष्करी संघर्षांपासून वेगळे ठेवले पाहिजे, असेही ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Shashi Tharoor criticizes India for not shaking hands with Pakistan.

Web Summary : Shashi Tharoor questions India's refusal to shake hands with Pakistani players during the Asia Cup, citing past instances where sportsmanship prevailed even during conflict. He believes sports should be separate from political tensions.
टॅग्स :Asia Cup 2025आशिया कप २०२५India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानShashi Tharoorशशी थरूरT20 Cricketटी-20 क्रिकेट