शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
2
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
3
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
4
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
5
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
6
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
7
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
8
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
9
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
10
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
11
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
12
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
13
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
14
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
15
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
16
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
17
Mumbai: नवरात्री दांडिया कार्यक्रमात राडा, जमावाकडून तरुणाला मारहाण, गोरेगाव येथील घटना!
18
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
19
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!

IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 13:30 IST

Shashi Tharoor: भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी आपले मत मांडले.

भारतीय क्रिकेट संघाने २०२५ च्या आशिया कपमध्ये आपली उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवली आहे. भारताने काल बांगलादेशला पराभवाची धुळ चारून फायनलचे तिकीट मिळवले. आता बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील विजेता संघ अंतिम सामना २८ सप्टेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताशी भिडेल. त्यामुळे या स्पर्धेत तिसऱ्यांदा भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये शेजारील देशाच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न केल्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यावर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी आपले मत व्यक्त केले.

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना आशिया कपमध्ये भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याबद्दल थेट भाष्य केले. "मला वैयक्तिकरित्या असे वाटते की एकदा खेळण्याचा निर्णय घेतला गेला की, जर आपल्याला पाकिस्तानबद्दल इतका राग असेल तर आपण त्यांच्यासोबत खेळायला नको होते. पण जर आपण त्यांच्याशी खेळत आहोत, तर आपण खेळाच्या भावनेने खेळायला हवे होते आणि त्यांच्याशी हस्तांदोलन करायला हवे होते", असे ते म्हणाले.

१९९९ मधील कारगिल युद्धाचा दाखला देताना शशी थरूर म्हणाले की, "१९९९ मध्ये कारगिल युद्ध सुरू असताना आपले सैनिक देशासाठी शहीद झाले. त्यावेळी भारत इंग्लंडमध्ये पाकिस्तानविरुद्ध विश्वचषक खेळत होता. तेव्हा भारतीय संघाने त्यांच्याशी हस्तांदोलन केले. कारण क्रीडाभावनेची भावना देशांमधील, सैन्यांमधील संघर्षाच्या भावनेपेक्षा वेगळी असते. हे माझे मत आहे." पाकिस्तानविरुद्धच्या भावना स्वाभाविक आहेत. परंतु, क्रीडाभावनेला राजकारण आणि लष्करी संघर्षांपासून वेगळे ठेवले पाहिजे, असेही ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Shashi Tharoor criticizes India for not shaking hands with Pakistan.

Web Summary : Shashi Tharoor questions India's refusal to shake hands with Pakistani players during the Asia Cup, citing past instances where sportsmanship prevailed even during conflict. He believes sports should be separate from political tensions.
टॅग्स :Asia Cup 2025आशिया कप २०२५India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानShashi Tharoorशशी थरूरT20 Cricketटी-20 क्रिकेट