शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

“संसदेत महात्मा गांधींच्या शेजारी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो कशासाठी?”: शशी थरूर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 08:26 IST

वीर सावरकर नेमके कोण होते, ते स्वातंत्र्यसैनिक होते, हिंदूत्ववादी नेते होते की, मुस्लिम विरोधी होते, असे सवाल उपस्थित करण्यात आले.

ठळक मुद्देवीर सावरकर नेमके कोण होतेहिंदूत्ववादी नेते होते की, मुस्लिम विरोधी होतेसंसदेत महात्मा गांधींच्या शेजारी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो कशासाठी

नवी दिल्ली: संसदेतमहात्मा गांधीजींच्या शेजारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तसबीर कशासाठी लावली आहे, ही बाब अनेकांच्या समजण्यापलीकडे आहे, असे शशी थरूर यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना इतिहासकार विक्रम संपत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांशी निगडीत अनेक गोष्टी उलगडून सांगितल्या. यावेळी शशी थरूर यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. याला विक्रम संपत यांनी उत्तरे दिली. 

वारसा, इतिहास आणि अभिमान या विषयावर चर्चा सुरू असताना वीर सावरकर नेमके कोण होते, ते स्वातंत्र्यसैनिक होते, हिंदूत्ववादी नेते होते की, मुस्लिम विरोधी होते, असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावर उत्तर देताना विक्रम संपत यांनी म्हटले की, वीर सावरकर या सर्वांचे एक मिश्रण होते. यावर शशी थरूर म्हणाले की, विक्रम संपत यांचा सावरकरांवरील अभ्यास दांडगा आहे. विक्रम संपत यांची दोन्ही पुस्तके वाचली नाहीत, कारण ती वाचायला वर्ष लोटेल, अशी मिश्लिक टिप्पणी शशी थरूर यांनी केली. 

महात्मा गांधींच्या शेजारी वीर सावरकरांची तसबीर कशासाठी?

देशातील एक गट असा आहे की जो स्वातंत्र्यवीर सावरकरांना राष्ट्रवादी या नात्याने पाहतो. तर दुसरा गट सावरकरांना इंग्रजांकडे याचिका करणारा, इंग्रजांकडून पेंशन घेणारा माणूस म्हणून पाहतो. त्यामुळे आमच्यातील काही जणांना ही बाब समजणे कठीण आहे की, संसदेत महात्मा गांधी यांच्या शेजारी वीर सावरकर यांची तसबीर कशासाठी लावली आहे, असे शशी थरूर यांनी म्हटले. यावर विक्रम संपत म्हणाले की, ज्या विनंती किंवा याचिकांची गोष्ट केली जाते, त्या वास्तविक सावरकर यांच्या दया याचिका नव्हत्या. तसेच पेंशनबाबत बोलायचे झाले तर ते अन्य अनेक स्वातंत्रसैनिकांना मिळत असे. ज्यांची पदवी इंग्रज सरकार काढून घेत असे. इंग्रज मानत होते की, वीर सावरकर, भगत सिंग, चंद्रशेखर आझाद, दुर्गा भाभी, राज बिहारी बोस एकमेकांच्या संपर्कात होते, म्हणूनच त्यांची ५ वर्षांची शिक्षा १३ वर्षे करण्यात आली. 

दरम्यान, या चर्चेवेळी पंतप्रधान मोदींनी १४ ऑगस्ट फाळणीचा दिवस स्मरण दिवस म्हणून मानला जाईल, अशी घोषणा केली होती. यावर बोलताना थरूर म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांची ही गोष्ट चुकीची आहे, ते आम्हाला पटलेले नाही. याला उत्तर देताना विक्रम संपत म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी योग्य गोष्ट केली आहे. ही चांगली बाब आहे. कारण, इतिहास लक्षात ठेवला की, कोणत्या गोष्टींची, घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, हे माणसाच्या कायम स्मरणात राहते. इंडिया टुडेच्या कॉन्लेव्ह २०२१ मध्ये यावर विस्तृत चर्चा करण्यात आली. 

टॅग्स :PoliticsराजकारणShashi Tharoorशशी थरूरVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरMahatma Gandhiमहात्मा गांधीParliamentसंसद