शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
3
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
5
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
6
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
7
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
8
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
9
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
10
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
11
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
12
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
13
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
14
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
15
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
16
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
17
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
18
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
19
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
20
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

“संसदेत महात्मा गांधींच्या शेजारी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो कशासाठी?”: शशी थरूर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 08:26 IST

वीर सावरकर नेमके कोण होते, ते स्वातंत्र्यसैनिक होते, हिंदूत्ववादी नेते होते की, मुस्लिम विरोधी होते, असे सवाल उपस्थित करण्यात आले.

ठळक मुद्देवीर सावरकर नेमके कोण होतेहिंदूत्ववादी नेते होते की, मुस्लिम विरोधी होतेसंसदेत महात्मा गांधींच्या शेजारी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो कशासाठी

नवी दिल्ली: संसदेतमहात्मा गांधीजींच्या शेजारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तसबीर कशासाठी लावली आहे, ही बाब अनेकांच्या समजण्यापलीकडे आहे, असे शशी थरूर यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना इतिहासकार विक्रम संपत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांशी निगडीत अनेक गोष्टी उलगडून सांगितल्या. यावेळी शशी थरूर यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. याला विक्रम संपत यांनी उत्तरे दिली. 

वारसा, इतिहास आणि अभिमान या विषयावर चर्चा सुरू असताना वीर सावरकर नेमके कोण होते, ते स्वातंत्र्यसैनिक होते, हिंदूत्ववादी नेते होते की, मुस्लिम विरोधी होते, असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावर उत्तर देताना विक्रम संपत यांनी म्हटले की, वीर सावरकर या सर्वांचे एक मिश्रण होते. यावर शशी थरूर म्हणाले की, विक्रम संपत यांचा सावरकरांवरील अभ्यास दांडगा आहे. विक्रम संपत यांची दोन्ही पुस्तके वाचली नाहीत, कारण ती वाचायला वर्ष लोटेल, अशी मिश्लिक टिप्पणी शशी थरूर यांनी केली. 

महात्मा गांधींच्या शेजारी वीर सावरकरांची तसबीर कशासाठी?

देशातील एक गट असा आहे की जो स्वातंत्र्यवीर सावरकरांना राष्ट्रवादी या नात्याने पाहतो. तर दुसरा गट सावरकरांना इंग्रजांकडे याचिका करणारा, इंग्रजांकडून पेंशन घेणारा माणूस म्हणून पाहतो. त्यामुळे आमच्यातील काही जणांना ही बाब समजणे कठीण आहे की, संसदेत महात्मा गांधी यांच्या शेजारी वीर सावरकर यांची तसबीर कशासाठी लावली आहे, असे शशी थरूर यांनी म्हटले. यावर विक्रम संपत म्हणाले की, ज्या विनंती किंवा याचिकांची गोष्ट केली जाते, त्या वास्तविक सावरकर यांच्या दया याचिका नव्हत्या. तसेच पेंशनबाबत बोलायचे झाले तर ते अन्य अनेक स्वातंत्रसैनिकांना मिळत असे. ज्यांची पदवी इंग्रज सरकार काढून घेत असे. इंग्रज मानत होते की, वीर सावरकर, भगत सिंग, चंद्रशेखर आझाद, दुर्गा भाभी, राज बिहारी बोस एकमेकांच्या संपर्कात होते, म्हणूनच त्यांची ५ वर्षांची शिक्षा १३ वर्षे करण्यात आली. 

दरम्यान, या चर्चेवेळी पंतप्रधान मोदींनी १४ ऑगस्ट फाळणीचा दिवस स्मरण दिवस म्हणून मानला जाईल, अशी घोषणा केली होती. यावर बोलताना थरूर म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांची ही गोष्ट चुकीची आहे, ते आम्हाला पटलेले नाही. याला उत्तर देताना विक्रम संपत म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी योग्य गोष्ट केली आहे. ही चांगली बाब आहे. कारण, इतिहास लक्षात ठेवला की, कोणत्या गोष्टींची, घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, हे माणसाच्या कायम स्मरणात राहते. इंडिया टुडेच्या कॉन्लेव्ह २०२१ मध्ये यावर विस्तृत चर्चा करण्यात आली. 

टॅग्स :PoliticsराजकारणShashi Tharoorशशी थरूरVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरMahatma Gandhiमहात्मा गांधीParliamentसंसद