शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

“संसदेत महात्मा गांधींच्या शेजारी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो कशासाठी?”: शशी थरूर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 08:26 IST

वीर सावरकर नेमके कोण होते, ते स्वातंत्र्यसैनिक होते, हिंदूत्ववादी नेते होते की, मुस्लिम विरोधी होते, असे सवाल उपस्थित करण्यात आले.

ठळक मुद्देवीर सावरकर नेमके कोण होतेहिंदूत्ववादी नेते होते की, मुस्लिम विरोधी होतेसंसदेत महात्मा गांधींच्या शेजारी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो कशासाठी

नवी दिल्ली: संसदेतमहात्मा गांधीजींच्या शेजारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तसबीर कशासाठी लावली आहे, ही बाब अनेकांच्या समजण्यापलीकडे आहे, असे शशी थरूर यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना इतिहासकार विक्रम संपत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांशी निगडीत अनेक गोष्टी उलगडून सांगितल्या. यावेळी शशी थरूर यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. याला विक्रम संपत यांनी उत्तरे दिली. 

वारसा, इतिहास आणि अभिमान या विषयावर चर्चा सुरू असताना वीर सावरकर नेमके कोण होते, ते स्वातंत्र्यसैनिक होते, हिंदूत्ववादी नेते होते की, मुस्लिम विरोधी होते, असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावर उत्तर देताना विक्रम संपत यांनी म्हटले की, वीर सावरकर या सर्वांचे एक मिश्रण होते. यावर शशी थरूर म्हणाले की, विक्रम संपत यांचा सावरकरांवरील अभ्यास दांडगा आहे. विक्रम संपत यांची दोन्ही पुस्तके वाचली नाहीत, कारण ती वाचायला वर्ष लोटेल, अशी मिश्लिक टिप्पणी शशी थरूर यांनी केली. 

महात्मा गांधींच्या शेजारी वीर सावरकरांची तसबीर कशासाठी?

देशातील एक गट असा आहे की जो स्वातंत्र्यवीर सावरकरांना राष्ट्रवादी या नात्याने पाहतो. तर दुसरा गट सावरकरांना इंग्रजांकडे याचिका करणारा, इंग्रजांकडून पेंशन घेणारा माणूस म्हणून पाहतो. त्यामुळे आमच्यातील काही जणांना ही बाब समजणे कठीण आहे की, संसदेत महात्मा गांधी यांच्या शेजारी वीर सावरकर यांची तसबीर कशासाठी लावली आहे, असे शशी थरूर यांनी म्हटले. यावर विक्रम संपत म्हणाले की, ज्या विनंती किंवा याचिकांची गोष्ट केली जाते, त्या वास्तविक सावरकर यांच्या दया याचिका नव्हत्या. तसेच पेंशनबाबत बोलायचे झाले तर ते अन्य अनेक स्वातंत्रसैनिकांना मिळत असे. ज्यांची पदवी इंग्रज सरकार काढून घेत असे. इंग्रज मानत होते की, वीर सावरकर, भगत सिंग, चंद्रशेखर आझाद, दुर्गा भाभी, राज बिहारी बोस एकमेकांच्या संपर्कात होते, म्हणूनच त्यांची ५ वर्षांची शिक्षा १३ वर्षे करण्यात आली. 

दरम्यान, या चर्चेवेळी पंतप्रधान मोदींनी १४ ऑगस्ट फाळणीचा दिवस स्मरण दिवस म्हणून मानला जाईल, अशी घोषणा केली होती. यावर बोलताना थरूर म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांची ही गोष्ट चुकीची आहे, ते आम्हाला पटलेले नाही. याला उत्तर देताना विक्रम संपत म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी योग्य गोष्ट केली आहे. ही चांगली बाब आहे. कारण, इतिहास लक्षात ठेवला की, कोणत्या गोष्टींची, घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, हे माणसाच्या कायम स्मरणात राहते. इंडिया टुडेच्या कॉन्लेव्ह २०२१ मध्ये यावर विस्तृत चर्चा करण्यात आली. 

टॅग्स :PoliticsराजकारणShashi Tharoorशशी थरूरVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरMahatma Gandhiमहात्मा गांधीParliamentसंसद