शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

संसदेतूनच लोकांच्या समस्येचं समाधान, लोकमत सोहळ्यात शरद पवारांचं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 20:16 IST

संसदेच्या दोन्ही सभागृहातून देशभरातील लोकांच्या समस्येवर समाधान मिळविण्यात येते.

नवी दिल्ली - लोकमत पार्लिमेंटरी अवॉर्डसाठी ज्या खासदारांची नावे पुढे आली होती, सर्वच खासदार त्यांच्या कामात उत्कृष्ट आहेत. त्यामुळे, या सर्वांपैकी एकाची निवड करणे आमच्यासाठी कठीण काम होते. मात्र, आमच्या निवड समितीने कसोशीने ते काम पूर्ण केले, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि लोकमत पार्लिमेंटरी अवॉर्ड निवड समितीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.  

संसदेच्या दोन्ही सभागृहातून देशभरातील लोकांच्या समस्येवर समाधान मिळविण्यात येते. आपल्या राज्याची आणि देशाची सेवा करण्याचं काम या सभागृहातून केलं जातं. देशाच्या या सभागृहाला मोठा इतिहास असून अनेक दिग्गजांनी येथूनच देशाची सेवा केली आहे. सभागृहात उपराष्ट्रपती आणि लोकसभेचे अध्यक्ष यांची भूमिका अत्यंत महत्वाची असून दोन्ही पदावरील काम अतिशय कठीण असते, असेही पवार यांनी म्हटले. संसदेच्या सभागृहातील सदस्यांचा सन्मान करण्याचं काम लोकमतने केले, त्याबद्दल लोकमतचे अभिनंदन करतो. लोकमतचे संस्थापक ज्यांना आम्ही बाबूजी म्हणायचो, त्यांनी आमच्यासोबत महाराष्ट्र सरकारमध्ये काम केलंय. ते स्वातंत्र्यसेनानी होते. त्यामुळे, इतर उद्योगांपेक्षाही त्यांचं सर्वाधिक लक्ष हे लोकमत वृत्तपत्राकडेच असायचं. हे वर्तमानपत्र सर्वात चांगलं चाललं पाहिजे, हे वर्तमानपत्र लोकांच्या समस्येचं प्रतिक झालं पाहिजे, यासाठीच त्यांनी काम केल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. बाबूजींच्या या प्रयत्नामुळेच आज हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेतील लोकांसाठी लोकमत हे महत्त्वाचे साधन बनले आहे, असेही पवार यांनी म्हटले.

लोकमत पार्लिमेंटरी अवॉर्ड पुरस्कार सोहळ्यात लोकसभा व राज्यसभेतील प्रत्येकी चार सर्वोत्कृष्ट खासदारांना सन्मानित करण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या विजेत्यांची निवड केली. जीवनगौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट खासदार, सर्वोत्कृष्ट महिला खासदार, संसदेत पहिल्यांदा निवडून आलेली सर्वोत्कृष्ट महिला खासदार अशा चार श्रेणीत हे पुरस्कार दिले जातात. 

पुरस्कार सोहळ्याआधी आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या भीम सभागृहात ‘राजकारणात प्रादेशिक पक्षांची भूमिका’ या विषयावरील परिसंवादात काँग्रेसचे खासदार शशी थरूर, असदुद्दीन ओवैसी, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल सहभागी झाले असून, त्यांनी मतप्रदर्शन केलं आहे. 2017 पासून या पुरस्कारांची सुरुवात झाली असून, 2018 मध्ये लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, एन. के. प्रेमचंद्रन, निशिकांत दुबे, सुष्मिता देव, रमादेवी, मीनाक्षी लेखी, हेमामालिनी यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. पहिल्या वर्षी शरद पवार, सीताराम येचुरी, गुलाम नबी आझाद, जया बच्चन, कनिमोळी, रजनी पाटील, छाया वर्मा या मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. राज्यात ग्रामपंचायत, विधिमंडळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही आता पुरस्काराने गौरविले जाते.

लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्यातील पुरस्कृत खासदार

सर्वोत्कृष्ट खासदार (राज्यसभा)- तिरुची शिवा (द्रमुक)सर्वोत्तम खासदार (लोकसभा)- सौगत रॉयसर्वोत्कृष्ट महिला खासदार (लोकसभा)- सुप्रिया सुळेसर्वोत्कृष्ट महिला खासदार (राज्यसभा)- विप्लव ठाकूरसर्वोत्कृष्ट (नवागत) महिला खासदार (राज्यसभा)- कहकशां परवीनसर्वोत्कृष्ट (नवागत) महिला खासदार (लोकसभा)- डॉ. भारती पवार

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारLokmatलोकमतlokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्डlok sabhaलोकसभा