शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

शरद पवारांची महाविकास आघाडी इतर राज्यांत जाण्यास उत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 04:55 IST

बिहारातील नितीशकुमारांचा जदयू आणि रामविलास पासवान यांचा लोजपा, तसेच महाराष्ट्रातील रामदास आठवले यांचा रिपाइं यांच्याशी पहिल्यांदा संपर्क करण्याचा आघाडीचा प्रयत्न आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विजयाने उत्साहित झालेली शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी इतर राज्यांतही जाणार असल्याचे वृत्त आहे. एनडीएविरोधातील आघाडीला देशव्यापी स्वरूप देण्यात येईल, असे खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच म्हटले आहे. मात्र, केवळ एनडीएविरोधातीलच नव्हे, तर एनडीएमधील असंतुष्ट पक्षांनाही आघाडीत घेण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे समजते.उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, बिहारातील नितीशकुमारांचा जदयू आणि रामविलास पासवान यांचा लोजपा, तसेच महाराष्ट्रातील रामदास आठवले यांचा रिपाइं यांच्याशी पहिल्यांदा संपर्क करण्याचा आघाडीचा प्रयत्न आहे. या पक्षांसोबतच्या बैठकीत सकारात्मक परिणाम येऊ शकतो, असा विश्वास आघाडीच्या नेत्यांना वाटतो. फडणवीस यांनी रात्रीतून शपथ घेतली तेव्हा जदयूने नाराजी व्यक्त केली होती, हे आघाडीच्या नेत्यांच्या विश्वासामागील प्रमुख कारण आहे. रामदास आठवलेही सरकार स्थापनेच्या काळात सातत्याने शिवसेनेच्या संपर्कात होते. ते भाजपसाठी प्रयत्न करीत होते,तरीही बहुमत ज्याच्याकडे आहे, त्याचेच सरकार बनावे, असे मत त्यांनी शिवसेना नेत्यांजवळ बोलून दाखविले होते. त्यामुळे आठवले यांनाही आज ना उद्या आघाडीत आणता येईल, असे आघाडीच्या नेत्यांना वाटते.याशिवाय उत्तर प्रदेशातील सरकारचा सहयोगी पक्ष अपना दल यासह बसपा, सपा आणि लोकदल आपल्यासोबत येऊ शकतात, असे आघाडीला वाटते. शरद पवार यांनी मध्यस्थी केल्यास हे पक्ष सोबत येऊ शकतात, असे आघाडीच्या नेत्यांना वाटते. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी केंद्राच्या विरोधात आघाडीत येऊ शकतात, असेही नेत्यांना वाटते.ही केवळ सत्याची सोबतजदयूच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, महाराष्ट्रात बहुमताला डावलण्यात आले तेव्हा आम्ही सत्य बोलण्याचे काम केले. हा विरोध एनडीए अथवा फडणवीस सरकारला नव्हता. ही केवळ सत्याची सोबत होती. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना शरद पवार पूर्वीपासून जाणतात. त्यांच्याकडून काही प्रस्ताव आला तर विचार होऊ शकतो. मात्र, त्यापुढील रणनीती नितीशकुमार हेच ठरवतील.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार