शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

Sharad Pawar: मंत्रिमंडळात बदल होणार नाही, पण...; शरद पवारांनी अखेर स्पष्ट शब्दात सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 16:50 IST

महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष चालेल. पुढील विधानसभा निवडणुकीतही मविआ जिंकेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतल्याने राज्यात विविध राजकीय चर्चांना उधाण आले. शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांच्यावर मंगळवारी सकाळी ईडीने कारवाई केल्यानंतर मोदी-पवार भेट झाली त्यामुळे या कारवाईबाबत बैठकीत काही चर्चा झाली का? यावरही प्रश्न होता. परंतु मोदींच्या भेटीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत सर्व चर्चेवर स्पष्टीकरण दिले आहे.

शरद पवार(Sharad Pawar) म्हणाले की, लक्षद्विपमध्ये प्रशासक प्रफुल्ल पटेल यांनी चुकीचे निर्णय घेतले आहे. त्यामुळे लक्षद्विपमधील नागरिकांना मुलभूत सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी मोदींची भेट घेतली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल हेदेखील उपस्थित होते. पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या निवडीबाबतही चर्चा करण्यात आली. १२ आमदारांच्या प्रश्नावर मोदी विचार करून निर्णय घेतील. मागील अनेक दिवसांपासून या जागा भरल्या जात नाहीत. तपास यंत्रणांच्या कारवाईबाबत बोलताना संजय राऊत यांच्यावरील अन्यायाची बाब मोदींना कळवलं. राऊत यांची संपत्ती जप्त करणं योग्य नाही. नवाब मलिकांवरील संदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच संजय राऊतांवर कारवाई करण्याची गरज काय होती?, राष्ट्रवादी-शिवसेना भाजपाविरोधात उभी आहे. राष्ट्रवादी कधीच भाजपासोबत नव्हती. भाजपाविरोधात पर्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. कोल्हापुरच्या पोटनिवडणुकीत भाजपा प्रदेशाध्यक्षांनी जर भाजपाला मतदान दिले नाही तर ईडी घरी येऊ शकते असं विधान केले होते. महाविकास आघाडीची एकत्र बैठक होईल. त्यानंतर पुढील रणनीती ठरवली जाईल. महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष चालेल. पुढील विधानसभा निवडणुकीतही मविआ जिंकेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. कॅबिनेटमध्ये बदलाची शक्यता नाही. काही जागा रिक्त आहेत. महाविकास आघाडीत चर्चा करून त्या जागा भरल्या जातील.

 

राज ठाकरेंच्या मुद्द्यावर भाष्य करणार नाही

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीच्या भोंग्याबाबत जे विधान केले त्यावर बोलणार नाही. देशात भाजपा सत्तेत आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांचीही आहे. परंतु राज ठाकरेंच्या भाषणानंतर अनेक भाजपा नेत्यांनी त्यांच्या समर्थनार्थ भाष्य केले. राज ठाकरे हे भाजपाला मतदान देऊ नका सांगत होते. परंतु आता त्यांच्यात बदल झालाय असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी लगावला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीSanjay Rautसंजय राऊत