शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
3
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
4
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
7
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
8
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
9
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
10
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
11
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
12
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
13
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
14
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
15
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
16
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
17
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
18
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
19
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
20
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...

Sharad Pawar on Gautam Adani: हिंडेनबर्गने अदानींना टार्गेट केलं, JPC चौकशीची गरज नाही; शरद पवार स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 21:35 IST

Sharad Pawar on Gautam Adani: शरद पवारांच्या भूमिकेमुळे काँग्रेसलाही मोठा धक्का बसला आहे.

Sharad Pawar on Gautam Adani: 24 जानेवारीला अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गची रिपोर्ट आली आणि भारतात मोठा राजकीय भूकंप आला. रिपोर्टमध्ये अदानी समूहावर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. शेअर बाजारापासून संसदेपर्यंत एकच गोंधळ उडाला. गौतम अदानी यांचीच देशभरात सर्वत्र चर्चा होऊ लागली. संसदेत विरोधकांनी सरकारवर टीका करत जेपीसी मागणी केली. आता या सर्व गोंधळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.

अदानींना टार्गेट केलेएनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी अदानींना क्लीन चिट दिली. हिंडेनबर्गवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, या रिपोर्टमधून अदानी समूहाला टार्गेट करण्यात आल्याचे दिसते. मात्र, अदानी समूहाने काही चुकीचे केले असेल तर त्याची चौकशी झालीच पाहिजे. याआधीही अशी विधाने समोर आली आणि अनेक दिवस संसदेत गदारोळ झाला, मात्र यावेळी अदानी प्रकरणाला जास्त महत्व दिले गेले. अदानीबाबत विधाने करणाऱ्यांची पार्श्वभूमी काय?, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

जेपीसी चौकशीची गरज नाही अदानी प्रकरणात जीपीसी चौकशीबाबत काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी संसदेत प्रचंड गदारोळ केला. याबाबत शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांची युती आहे. पण, आम्ही काँग्रेसच्या विचारांशी सहमत नाही. जेपीसी चौकशी झाली तरी देखरेख सत्ताधारी पक्षाकडे असेल आणि सत्ताधारी पक्षाकडे बहुमत आहे. अशा परिस्थितीत सत्य कसे बाहेर येईल? आता अदानी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तज्ज्ञांची समिती स्थापन करून चौकशी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे सत्य बाहेर येण्याची शक्यता अधिक आहे. अशा परिस्थितीत जेपीसी चौकशीची गरज नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

आम्हीही तेव्हा टाटा-बिर्लांवर टीका करायचो

पवार पुढे म्हणतात, राजकारणात आल्यावर आम्हीही सरकारच्या विरोधात बोलायचो. तेव्हा आम्ही टाटा-बिर्लांचे नाव वापरायचो. त्यांचे योगदान आम्हाला माहित होते, पण तरीही आम्ही त्यांच्या विरोधात बोलायचो. आज टाटा-बिर्ला नव्हे तर अंबानी-अदानींच्या नावाची चलती आहे. म्हणूनच जेव्हा सरकारवर हल्लाबोल करायचा असतो, तेव्हा विरोधक अदानी-अंबानींचे नाव घेतात. तुमचं काही चुकलं असेल तर तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, पण विनाकारण हल्ला करणं माझ्या समजण्यापलीकडचं आहे, असे म्हणत शरद पवारांनी काँग्रेसलाच चिमटा काढला.

देशाच्या विकासात अंबानींचे योगदानयावेली शरद पवार यांनी अंबानी समूहाचे कौतुक केले. पवार म्हणाले की, पेट्रोकेमिकल क्षेत्रात, वीज क्षेत्रात अंबानींचे योगदान मोठे आहे. देशाला त्या गोष्टींची गरज नव्हती का? या लोकांनी जबाबदारी घेतली आणि या क्षेत्रांसाठी काम केले. त्यांनी पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत, त्यामुळे त्यावर टीका करणे मला योग्य वाटत नाही, असेही पवार म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारGautam Adaniगौतम अदानीcongressकाँग्रेसBJPभाजपा