शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
7
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
8
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
9
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
10
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
11
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
12
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
13
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
14
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
15
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
16
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
17
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
18
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
19
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
20
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना

Sharad Pawar on Gautam Adani: हिंडेनबर्गने अदानींना टार्गेट केलं, JPC चौकशीची गरज नाही; शरद पवार स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 21:35 IST

Sharad Pawar on Gautam Adani: शरद पवारांच्या भूमिकेमुळे काँग्रेसलाही मोठा धक्का बसला आहे.

Sharad Pawar on Gautam Adani: 24 जानेवारीला अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गची रिपोर्ट आली आणि भारतात मोठा राजकीय भूकंप आला. रिपोर्टमध्ये अदानी समूहावर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. शेअर बाजारापासून संसदेपर्यंत एकच गोंधळ उडाला. गौतम अदानी यांचीच देशभरात सर्वत्र चर्चा होऊ लागली. संसदेत विरोधकांनी सरकारवर टीका करत जेपीसी मागणी केली. आता या सर्व गोंधळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.

अदानींना टार्गेट केलेएनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी अदानींना क्लीन चिट दिली. हिंडेनबर्गवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, या रिपोर्टमधून अदानी समूहाला टार्गेट करण्यात आल्याचे दिसते. मात्र, अदानी समूहाने काही चुकीचे केले असेल तर त्याची चौकशी झालीच पाहिजे. याआधीही अशी विधाने समोर आली आणि अनेक दिवस संसदेत गदारोळ झाला, मात्र यावेळी अदानी प्रकरणाला जास्त महत्व दिले गेले. अदानीबाबत विधाने करणाऱ्यांची पार्श्वभूमी काय?, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

जेपीसी चौकशीची गरज नाही अदानी प्रकरणात जीपीसी चौकशीबाबत काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी संसदेत प्रचंड गदारोळ केला. याबाबत शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांची युती आहे. पण, आम्ही काँग्रेसच्या विचारांशी सहमत नाही. जेपीसी चौकशी झाली तरी देखरेख सत्ताधारी पक्षाकडे असेल आणि सत्ताधारी पक्षाकडे बहुमत आहे. अशा परिस्थितीत सत्य कसे बाहेर येईल? आता अदानी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तज्ज्ञांची समिती स्थापन करून चौकशी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे सत्य बाहेर येण्याची शक्यता अधिक आहे. अशा परिस्थितीत जेपीसी चौकशीची गरज नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

आम्हीही तेव्हा टाटा-बिर्लांवर टीका करायचो

पवार पुढे म्हणतात, राजकारणात आल्यावर आम्हीही सरकारच्या विरोधात बोलायचो. तेव्हा आम्ही टाटा-बिर्लांचे नाव वापरायचो. त्यांचे योगदान आम्हाला माहित होते, पण तरीही आम्ही त्यांच्या विरोधात बोलायचो. आज टाटा-बिर्ला नव्हे तर अंबानी-अदानींच्या नावाची चलती आहे. म्हणूनच जेव्हा सरकारवर हल्लाबोल करायचा असतो, तेव्हा विरोधक अदानी-अंबानींचे नाव घेतात. तुमचं काही चुकलं असेल तर तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, पण विनाकारण हल्ला करणं माझ्या समजण्यापलीकडचं आहे, असे म्हणत शरद पवारांनी काँग्रेसलाच चिमटा काढला.

देशाच्या विकासात अंबानींचे योगदानयावेली शरद पवार यांनी अंबानी समूहाचे कौतुक केले. पवार म्हणाले की, पेट्रोकेमिकल क्षेत्रात, वीज क्षेत्रात अंबानींचे योगदान मोठे आहे. देशाला त्या गोष्टींची गरज नव्हती का? या लोकांनी जबाबदारी घेतली आणि या क्षेत्रांसाठी काम केले. त्यांनी पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत, त्यामुळे त्यावर टीका करणे मला योग्य वाटत नाही, असेही पवार म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारGautam Adaniगौतम अदानीcongressकाँग्रेसBJPभाजपा