शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

"शरद पवार देशाचे पंतप्रधान नाहीत"; अदानींच्या प्रश्नावरुन राहुल गांधी थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 12:24 IST

गरीब लोक पंखा चालवतात, ट्युबलाईट लावतात. त्याचे पैसे अदानींच्या खिशात जातात असं म्हणत राहुल गांधींनी नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली – कोळशाच्या किंमतीवरून आलेल्या रिपोर्टनंतर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोळशाच्या किंमती चुकीच्या दाखवून वीजबिलात फसवणुकीच्या माध्यमातून उद्योगपती गौतम अदानी यांनी विजेचे दर वाढवले. जनतेच्या खिशातून १२ हजार कोटी रुपये थेट अदानींनी घेतले असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेदरम्यान राहुल गांधींना काही पत्रकारांनी प्रश्न विचारला, तुम्ही शरद पवारांना प्रश्न का नाही विचारत, कारण इंडिया आघाडीचा विरोध असतानाही ते अदानींची भेट घेतात. त्यावर राहुल गांधींनी शरद पवारांना मी कुठलेही प्रश्न विचारले नाहीत, यामागे कारण आहे. शरद पवार हे देशाचे पंतप्रधान नाहीत असं उत्तर दिले आहे. फायनेन्शियल टाइम्स रिपोर्टमध्ये अदानींच्या कंपनीने कोळशाची कमी दरात खरेदी करून तिचे दर जास्त दाखवले असा दावा करण्यात आला आहे.

तसेच शरद पवार पंतप्रधान नाहीत. पवार अदानींना वाचवत नाही. त्यांना पंतप्रधान मोदी वाचवत आहेत. त्यामुळे मी शरद पवारांना नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारतोय. जेव्हा शरद पवार पंतप्रधान बनतील आणि ते अदानींना वाचवण्याचा प्रयत्न करतील तेव्हा त्यांनाही मी प्रश्न विचारेन. सध्या पंतप्रधानांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न आहे असं राहुल गांधींनी सांगितले.

इतकेच नाही तर गरीब लोक पंखा चालवतात, ट्युबलाईट लावतात. त्याचे पैसे अदानींच्या खिशात जातात. अदानींची सुरक्षा भारताचे पंतप्रधान करत आहेत. लोकं वीज वापरतात ते पैसे अदानींना मिळतात. गौतम अदानी हे कोळसा खरेदी अतिरिक्त कमाई करतायेत. परदेशी वृत्तपत्र फायनेन्शियल टाइम्सच्या रिपोर्टचा हवाला देत राहुल गांधींनी थेट वीजचोरीचे हे प्रकरण असल्याचे म्हटलं. अदानींमध्ये असं काय खास आहे ज्यामुळे भारत सरकार त्यांची चौकशी करत नाही असा प्रश्न राहुल गांधींनी केला. अदानींना कुणी प्रश्न विचारू शकत नाही. त्यांच्यामागे कोणती शक्ती आहे हे देशातील संपूर्ण जनता जाणते असंही त्यांनी म्हटलं.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीAdaniअदानी