शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

"शरद पवार देशाचे पंतप्रधान नाहीत"; अदानींच्या प्रश्नावरुन राहुल गांधी थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 12:24 IST

गरीब लोक पंखा चालवतात, ट्युबलाईट लावतात. त्याचे पैसे अदानींच्या खिशात जातात असं म्हणत राहुल गांधींनी नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली – कोळशाच्या किंमतीवरून आलेल्या रिपोर्टनंतर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोळशाच्या किंमती चुकीच्या दाखवून वीजबिलात फसवणुकीच्या माध्यमातून उद्योगपती गौतम अदानी यांनी विजेचे दर वाढवले. जनतेच्या खिशातून १२ हजार कोटी रुपये थेट अदानींनी घेतले असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेदरम्यान राहुल गांधींना काही पत्रकारांनी प्रश्न विचारला, तुम्ही शरद पवारांना प्रश्न का नाही विचारत, कारण इंडिया आघाडीचा विरोध असतानाही ते अदानींची भेट घेतात. त्यावर राहुल गांधींनी शरद पवारांना मी कुठलेही प्रश्न विचारले नाहीत, यामागे कारण आहे. शरद पवार हे देशाचे पंतप्रधान नाहीत असं उत्तर दिले आहे. फायनेन्शियल टाइम्स रिपोर्टमध्ये अदानींच्या कंपनीने कोळशाची कमी दरात खरेदी करून तिचे दर जास्त दाखवले असा दावा करण्यात आला आहे.

तसेच शरद पवार पंतप्रधान नाहीत. पवार अदानींना वाचवत नाही. त्यांना पंतप्रधान मोदी वाचवत आहेत. त्यामुळे मी शरद पवारांना नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारतोय. जेव्हा शरद पवार पंतप्रधान बनतील आणि ते अदानींना वाचवण्याचा प्रयत्न करतील तेव्हा त्यांनाही मी प्रश्न विचारेन. सध्या पंतप्रधानांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न आहे असं राहुल गांधींनी सांगितले.

इतकेच नाही तर गरीब लोक पंखा चालवतात, ट्युबलाईट लावतात. त्याचे पैसे अदानींच्या खिशात जातात. अदानींची सुरक्षा भारताचे पंतप्रधान करत आहेत. लोकं वीज वापरतात ते पैसे अदानींना मिळतात. गौतम अदानी हे कोळसा खरेदी अतिरिक्त कमाई करतायेत. परदेशी वृत्तपत्र फायनेन्शियल टाइम्सच्या रिपोर्टचा हवाला देत राहुल गांधींनी थेट वीजचोरीचे हे प्रकरण असल्याचे म्हटलं. अदानींमध्ये असं काय खास आहे ज्यामुळे भारत सरकार त्यांची चौकशी करत नाही असा प्रश्न राहुल गांधींनी केला. अदानींना कुणी प्रश्न विचारू शकत नाही. त्यांच्यामागे कोणती शक्ती आहे हे देशातील संपूर्ण जनता जाणते असंही त्यांनी म्हटलं.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीAdaniअदानी