शहरं
Join us  
Trending Stories
1
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
2
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
3
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
4
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
5
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
6
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
7
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
8
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
9
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
10
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
11
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
12
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
13
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
14
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
15
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
17
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
18
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
19
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
20
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

"शरद पवार देशाचे पंतप्रधान नाहीत"; अदानींच्या प्रश्नावरुन राहुल गांधी थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 12:24 IST

गरीब लोक पंखा चालवतात, ट्युबलाईट लावतात. त्याचे पैसे अदानींच्या खिशात जातात असं म्हणत राहुल गांधींनी नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली – कोळशाच्या किंमतीवरून आलेल्या रिपोर्टनंतर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोळशाच्या किंमती चुकीच्या दाखवून वीजबिलात फसवणुकीच्या माध्यमातून उद्योगपती गौतम अदानी यांनी विजेचे दर वाढवले. जनतेच्या खिशातून १२ हजार कोटी रुपये थेट अदानींनी घेतले असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेदरम्यान राहुल गांधींना काही पत्रकारांनी प्रश्न विचारला, तुम्ही शरद पवारांना प्रश्न का नाही विचारत, कारण इंडिया आघाडीचा विरोध असतानाही ते अदानींची भेट घेतात. त्यावर राहुल गांधींनी शरद पवारांना मी कुठलेही प्रश्न विचारले नाहीत, यामागे कारण आहे. शरद पवार हे देशाचे पंतप्रधान नाहीत असं उत्तर दिले आहे. फायनेन्शियल टाइम्स रिपोर्टमध्ये अदानींच्या कंपनीने कोळशाची कमी दरात खरेदी करून तिचे दर जास्त दाखवले असा दावा करण्यात आला आहे.

तसेच शरद पवार पंतप्रधान नाहीत. पवार अदानींना वाचवत नाही. त्यांना पंतप्रधान मोदी वाचवत आहेत. त्यामुळे मी शरद पवारांना नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारतोय. जेव्हा शरद पवार पंतप्रधान बनतील आणि ते अदानींना वाचवण्याचा प्रयत्न करतील तेव्हा त्यांनाही मी प्रश्न विचारेन. सध्या पंतप्रधानांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न आहे असं राहुल गांधींनी सांगितले.

इतकेच नाही तर गरीब लोक पंखा चालवतात, ट्युबलाईट लावतात. त्याचे पैसे अदानींच्या खिशात जातात. अदानींची सुरक्षा भारताचे पंतप्रधान करत आहेत. लोकं वीज वापरतात ते पैसे अदानींना मिळतात. गौतम अदानी हे कोळसा खरेदी अतिरिक्त कमाई करतायेत. परदेशी वृत्तपत्र फायनेन्शियल टाइम्सच्या रिपोर्टचा हवाला देत राहुल गांधींनी थेट वीजचोरीचे हे प्रकरण असल्याचे म्हटलं. अदानींमध्ये असं काय खास आहे ज्यामुळे भारत सरकार त्यांची चौकशी करत नाही असा प्रश्न राहुल गांधींनी केला. अदानींना कुणी प्रश्न विचारू शकत नाही. त्यांच्यामागे कोणती शक्ती आहे हे देशातील संपूर्ण जनता जाणते असंही त्यांनी म्हटलं.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीAdaniअदानी