शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

"शरद पवार देशाचे पंतप्रधान नाहीत"; अदानींच्या प्रश्नावरुन राहुल गांधी थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 12:24 IST

गरीब लोक पंखा चालवतात, ट्युबलाईट लावतात. त्याचे पैसे अदानींच्या खिशात जातात असं म्हणत राहुल गांधींनी नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली – कोळशाच्या किंमतीवरून आलेल्या रिपोर्टनंतर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोळशाच्या किंमती चुकीच्या दाखवून वीजबिलात फसवणुकीच्या माध्यमातून उद्योगपती गौतम अदानी यांनी विजेचे दर वाढवले. जनतेच्या खिशातून १२ हजार कोटी रुपये थेट अदानींनी घेतले असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेदरम्यान राहुल गांधींना काही पत्रकारांनी प्रश्न विचारला, तुम्ही शरद पवारांना प्रश्न का नाही विचारत, कारण इंडिया आघाडीचा विरोध असतानाही ते अदानींची भेट घेतात. त्यावर राहुल गांधींनी शरद पवारांना मी कुठलेही प्रश्न विचारले नाहीत, यामागे कारण आहे. शरद पवार हे देशाचे पंतप्रधान नाहीत असं उत्तर दिले आहे. फायनेन्शियल टाइम्स रिपोर्टमध्ये अदानींच्या कंपनीने कोळशाची कमी दरात खरेदी करून तिचे दर जास्त दाखवले असा दावा करण्यात आला आहे.

तसेच शरद पवार पंतप्रधान नाहीत. पवार अदानींना वाचवत नाही. त्यांना पंतप्रधान मोदी वाचवत आहेत. त्यामुळे मी शरद पवारांना नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारतोय. जेव्हा शरद पवार पंतप्रधान बनतील आणि ते अदानींना वाचवण्याचा प्रयत्न करतील तेव्हा त्यांनाही मी प्रश्न विचारेन. सध्या पंतप्रधानांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न आहे असं राहुल गांधींनी सांगितले.

इतकेच नाही तर गरीब लोक पंखा चालवतात, ट्युबलाईट लावतात. त्याचे पैसे अदानींच्या खिशात जातात. अदानींची सुरक्षा भारताचे पंतप्रधान करत आहेत. लोकं वीज वापरतात ते पैसे अदानींना मिळतात. गौतम अदानी हे कोळसा खरेदी अतिरिक्त कमाई करतायेत. परदेशी वृत्तपत्र फायनेन्शियल टाइम्सच्या रिपोर्टचा हवाला देत राहुल गांधींनी थेट वीजचोरीचे हे प्रकरण असल्याचे म्हटलं. अदानींमध्ये असं काय खास आहे ज्यामुळे भारत सरकार त्यांची चौकशी करत नाही असा प्रश्न राहुल गांधींनी केला. अदानींना कुणी प्रश्न विचारू शकत नाही. त्यांच्यामागे कोणती शक्ती आहे हे देशातील संपूर्ण जनता जाणते असंही त्यांनी म्हटलं.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीAdaniअदानी