शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
4
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
5
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
6
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
7
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
8
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
9
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
10
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
11
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
12
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
13
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
14
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
15
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
16
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
17
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
18
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
19
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
20
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”

शरद पवारांचा दिल्लीतून PM मोदींवर हल्लाबोल; नेहरूंवरील भाषणाचा घेतला समाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 17:33 IST

नरेंद्र मोदी यांचं संसदेतील भाषण ऐकून दु:ख झालं. पंतप्रधान हा संपूर्ण देशाचा असतो, तो एका पक्षाचा नसतो, असा टोला शरद पवारांनी लगावला आहे.

Sharad Pawar Delhi Speech ( Marathi News ) :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेच्या सभागृहात भाषण करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत जवाहरलाल नेहरू यांच्या काही वक्तव्यांचा उल्लेख करत त्यांच्यावरही निशाणा साधला. नरेंद्र मोदी यांच्या याच भाषणावर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना लक्ष्य केलं आहे. 

नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संसदेतील भाषण ऐकून दु:ख झालं. कारण पंतप्रधान हा संपूर्ण देशाचा असतो, तो एका पक्षाचा नसतो. मात्र त्यांनी आज आपल्या भाषणात देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या नेत्यांनी आपला उमेदीचा काळ तुरुंगात घालवला, त्या नेत्यांमध्ये जवाहरलाल नेहरू यांचाही समावेश होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा चेहरा बदलण्यासाठी, जगात देशाची प्रतिमा बदलण्याठी ज्यांनी काम केलं त्यामध्ये आपल्याला नेहरूंचं नाव विसरता येणार नाही. जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी खांद्यावर घेतली आणि देशाला प्रजासत्तेच्या मार्गावर घेऊन गेले आणि आज जी लोकशाही आपण बघत आहोत त्या लोकशाहीला ताकद देण्याचं काम नेहरू यांनी केलं. त्यासोबतच देशाच्या विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान, जलसंपदा अशा क्षेत्रांत त्यांनी काम केलं. असं योगदान देणाऱ्या पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टीका केली," अशा शब्दांत शरद पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

"राजकारणात वेगवेगळी विचारधारा असते, मतभिन्नता असते, मात्र ज्यांनी देशासाठी काम केलं त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. मग ते जवाहरलाल नेहरू असोत, लाल बहाद्दूर शास्त्री असतील किंवा इंदिरा गांधी, या नेत्यांनी देशासाठी काही ना काही काम केलं आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्यावर टीका केली असली तरी असा चुकीचा इतिहास पसरवणाऱ्या विचारसरणीला दूर ठेवण्याचं काम देशातील नवी पीढी करेल," असा विश्वासही यावेळी शरद पवारांनी व्यक्त केला.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीतील राजकीय संघर्षावर निकाल देत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं सांगितलं आहे. राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपच्या दबावातूनच निवडणूक आयोगाने हा निकाल दिल्याचा आरोप शरद पवार गटाकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार हे आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात आणखी आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारdelhiदिल्ली