शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

शरद पवारांचा दिल्लीतून PM मोदींवर हल्लाबोल; नेहरूंवरील भाषणाचा घेतला समाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 17:33 IST

नरेंद्र मोदी यांचं संसदेतील भाषण ऐकून दु:ख झालं. पंतप्रधान हा संपूर्ण देशाचा असतो, तो एका पक्षाचा नसतो, असा टोला शरद पवारांनी लगावला आहे.

Sharad Pawar Delhi Speech ( Marathi News ) :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेच्या सभागृहात भाषण करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत जवाहरलाल नेहरू यांच्या काही वक्तव्यांचा उल्लेख करत त्यांच्यावरही निशाणा साधला. नरेंद्र मोदी यांच्या याच भाषणावर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना लक्ष्य केलं आहे. 

नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संसदेतील भाषण ऐकून दु:ख झालं. कारण पंतप्रधान हा संपूर्ण देशाचा असतो, तो एका पक्षाचा नसतो. मात्र त्यांनी आज आपल्या भाषणात देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या नेत्यांनी आपला उमेदीचा काळ तुरुंगात घालवला, त्या नेत्यांमध्ये जवाहरलाल नेहरू यांचाही समावेश होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा चेहरा बदलण्यासाठी, जगात देशाची प्रतिमा बदलण्याठी ज्यांनी काम केलं त्यामध्ये आपल्याला नेहरूंचं नाव विसरता येणार नाही. जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी खांद्यावर घेतली आणि देशाला प्रजासत्तेच्या मार्गावर घेऊन गेले आणि आज जी लोकशाही आपण बघत आहोत त्या लोकशाहीला ताकद देण्याचं काम नेहरू यांनी केलं. त्यासोबतच देशाच्या विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान, जलसंपदा अशा क्षेत्रांत त्यांनी काम केलं. असं योगदान देणाऱ्या पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टीका केली," अशा शब्दांत शरद पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

"राजकारणात वेगवेगळी विचारधारा असते, मतभिन्नता असते, मात्र ज्यांनी देशासाठी काम केलं त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. मग ते जवाहरलाल नेहरू असोत, लाल बहाद्दूर शास्त्री असतील किंवा इंदिरा गांधी, या नेत्यांनी देशासाठी काही ना काही काम केलं आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्यावर टीका केली असली तरी असा चुकीचा इतिहास पसरवणाऱ्या विचारसरणीला दूर ठेवण्याचं काम देशातील नवी पीढी करेल," असा विश्वासही यावेळी शरद पवारांनी व्यक्त केला.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीतील राजकीय संघर्षावर निकाल देत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं सांगितलं आहे. राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपच्या दबावातूनच निवडणूक आयोगाने हा निकाल दिल्याचा आरोप शरद पवार गटाकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार हे आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात आणखी आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारdelhiदिल्ली