शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

रोस्टरचा अधिकार सरन्यायाधीशांचाच, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, शांती भूषण यांची याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 04:10 IST

सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीश समान असले तरी सरन्यायाधीश ज्येष्ठ व समानातही प्रथम पहिले म्हणजेच ‘फर्स्ट अमंग द इक्वल्स’ असतात.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीश समान असले तरी सरन्यायाधीश ज्येष्ठ व समानातही प्रथम पहिले म्हणजेच ‘फर्स्ट अमंग द इक्वल्स’ असतात. त्यामुळे न्यायालयीन प्रकरणे कोणत्या न्यायाधीशाकडे सोपवावीत आणि कोणत्या न्यायाधीशाची खंडपीठे कधी तयार करावीत, हा अधिकार त्यांचाच आहे. तो अधिकार न्यायवृंद म्हणजे कॉलेजियमला देण्याची गरज नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला.प्रकरणे न्यायाधीशांकडे सोपविणे व पीठे तयार करणे याचे रोस्टर एकट्या सरन्यायाधीशांनी तयार करण्याच्या पद्धतीला आव्हान देत, ते कॉलेजियममार्फत व्हावे, अशी याचिका ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ व माजी केंद्रीय कायदामंत्री शांती भूषण यांनी केली होती.ती फेटाळताना न्या. ए. के सिक्री व न्या. अशोक भूषण यांनी म्हटले की सर्वोच्च न्यायालयाच्या प्रॅक्टिस अँड प्रोसिजर (२0१७) नुसार खटल्यांचे वाटप, वर्गीकरण (रोस्टर) हे काम सरन्यायाधीशांच्या मार्गदर्शनानुसार रजिस्ट्रार करतात.प्रसंगी त्यात सरन्यायाधीश बदलही करू शकतात. समानातील पहिले व ज्येष्ठ या नात्याने त्यांचा हा अधिकार आहे. तो लिखित स्वरूपात नसला तरी सर्वमान्य आहे. त्याता बदल करण्याचे कारण नाही.चर्चा-मसलत करण्याची गरज नाहीयाआधी दोनदा सर्वोच्च न्यायालयात अशाच स्वरूपाच्या याचिका सुनावणीसाठी आल्या होत्या. त्यांचा उल्लेख करून न्या. सिक्री व न्या. अशोक भूषण म्हणाले की, राज्यघटनेत रोस्टरचे अधिकार सरन्यायाधीशांकडे असतील, असे स्पष्ट केले नसले तरी न्यायालयातील शिस्त व योग्य पद्धतीचा विचार करता ते त्यांच्याकडेच असणे आवश्यक आहे. खटल्यांचे वाटप करताना त्यांनी इतर न्यायाधीशांशी चर्चा-मसलत करण्याची गरज नाही.ही होती पार्श्वभूमी : न्या. जे. चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन लोकूर व न्या. कुरियन जोसेफ यांनी जानेवारीमध्ये पत्रकार परिषद घेऊ न सर्वोच्च न्यायालयातील कामकाज व्यवस्थित चालत नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर अ‍ॅड शांती भूषण यांनी ही याचिका केली.दोन बाजूआपली बाजू मांडताना अ‍ॅड शांती भूषण यांनी सरन्यायाधीशांना रोस्टरसाठी सल्ला व मार्गदर्शन देण्यासाठी अन्य न्यायाधीशांना मदत करणे अपेक्षित आहे, असे म्हटले होते.भारताचे अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनीही अ‍ॅड. शांती भूषण यांच्या याचिकेस विरोध दर्शविताना एकाहून अधिक न्यायाधीशांकडे म्हणजेच कॉलेजियमकडे रोस्टरचे काम सोपवल्यास त्यामुळे गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त केले. मुळात सध्याच्या पद्धतीत बदल करण्याचे कारणच नाही, असे ते मत व्यक्त केले होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय