शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

रोस्टरचा अधिकार सरन्यायाधीशांचाच, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, शांती भूषण यांची याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 04:10 IST

सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीश समान असले तरी सरन्यायाधीश ज्येष्ठ व समानातही प्रथम पहिले म्हणजेच ‘फर्स्ट अमंग द इक्वल्स’ असतात.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीश समान असले तरी सरन्यायाधीश ज्येष्ठ व समानातही प्रथम पहिले म्हणजेच ‘फर्स्ट अमंग द इक्वल्स’ असतात. त्यामुळे न्यायालयीन प्रकरणे कोणत्या न्यायाधीशाकडे सोपवावीत आणि कोणत्या न्यायाधीशाची खंडपीठे कधी तयार करावीत, हा अधिकार त्यांचाच आहे. तो अधिकार न्यायवृंद म्हणजे कॉलेजियमला देण्याची गरज नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला.प्रकरणे न्यायाधीशांकडे सोपविणे व पीठे तयार करणे याचे रोस्टर एकट्या सरन्यायाधीशांनी तयार करण्याच्या पद्धतीला आव्हान देत, ते कॉलेजियममार्फत व्हावे, अशी याचिका ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ व माजी केंद्रीय कायदामंत्री शांती भूषण यांनी केली होती.ती फेटाळताना न्या. ए. के सिक्री व न्या. अशोक भूषण यांनी म्हटले की सर्वोच्च न्यायालयाच्या प्रॅक्टिस अँड प्रोसिजर (२0१७) नुसार खटल्यांचे वाटप, वर्गीकरण (रोस्टर) हे काम सरन्यायाधीशांच्या मार्गदर्शनानुसार रजिस्ट्रार करतात.प्रसंगी त्यात सरन्यायाधीश बदलही करू शकतात. समानातील पहिले व ज्येष्ठ या नात्याने त्यांचा हा अधिकार आहे. तो लिखित स्वरूपात नसला तरी सर्वमान्य आहे. त्याता बदल करण्याचे कारण नाही.चर्चा-मसलत करण्याची गरज नाहीयाआधी दोनदा सर्वोच्च न्यायालयात अशाच स्वरूपाच्या याचिका सुनावणीसाठी आल्या होत्या. त्यांचा उल्लेख करून न्या. सिक्री व न्या. अशोक भूषण म्हणाले की, राज्यघटनेत रोस्टरचे अधिकार सरन्यायाधीशांकडे असतील, असे स्पष्ट केले नसले तरी न्यायालयातील शिस्त व योग्य पद्धतीचा विचार करता ते त्यांच्याकडेच असणे आवश्यक आहे. खटल्यांचे वाटप करताना त्यांनी इतर न्यायाधीशांशी चर्चा-मसलत करण्याची गरज नाही.ही होती पार्श्वभूमी : न्या. जे. चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन लोकूर व न्या. कुरियन जोसेफ यांनी जानेवारीमध्ये पत्रकार परिषद घेऊ न सर्वोच्च न्यायालयातील कामकाज व्यवस्थित चालत नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर अ‍ॅड शांती भूषण यांनी ही याचिका केली.दोन बाजूआपली बाजू मांडताना अ‍ॅड शांती भूषण यांनी सरन्यायाधीशांना रोस्टरसाठी सल्ला व मार्गदर्शन देण्यासाठी अन्य न्यायाधीशांना मदत करणे अपेक्षित आहे, असे म्हटले होते.भारताचे अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनीही अ‍ॅड. शांती भूषण यांच्या याचिकेस विरोध दर्शविताना एकाहून अधिक न्यायाधीशांकडे म्हणजेच कॉलेजियमकडे रोस्टरचे काम सोपवल्यास त्यामुळे गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त केले. मुळात सध्याच्या पद्धतीत बदल करण्याचे कारणच नाही, असे ते मत व्यक्त केले होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय