शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
2
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
3
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
4
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
5
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
6
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
7
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
8
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
9
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
10
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
11
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
12
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
14
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
15
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
16
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
17
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
18
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
19
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
20
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

‘नेमप्लेट’ वादावरून शंकराचार्यांचा उत्तर प्रदेश सरकारला टोला, म्हणाले, "या निर्णयामुळे…’’   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 22:53 IST

Shankaracharya Avimukteshwaranand Criticize UP Government: कावड यात्रेच्या मार्गातील दुकानदारांना दुकानांवर मालकाचं नाव लावणं सक्तीचं करण्याच्या उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयावर आता ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनीही टीका करत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

सध्या उत्तर प्रदेशसह उत्तरेकडील काही राज्यांमध्ये कावड यात्रेच्या मार्गातील दुकानदारांना दुकानांवर मालकाचं नाव लावण्याच्या सरकारने केलेल्या सक्तीमुळे वाद निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारच्या या निर्णयावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, सरकारच्या निर्णयावर आता ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनीही टीका करत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. नेमप्लेट कायद्यामुळे फायद्यापेक्षा नुकसान होईल. जर दुकानाचा मालक मुस्लिम असेल आणि त्याच्याकडील कर्मचारी हिंदू असतील, तर काय होईल. धर्मांतर करणारेही नाव बदलत नाहीत. मग तुम्ही काय करणार? असा सवाल उपस्थित केला. तसेच कावडीयांकडून डीजे वाजवण्यात येत असल्याबाबतही प्रश्न उपस्थित केला आहे. 

कावड यात्रेत दुकानदारांच्या नावांवरून झालेल्या वादाबाबत ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, अशा प्रकारच्या आदेशांमुळे दोन धर्मातील द्वेष वाढेल. शास्त्रानुसार पवित्रतेची आवश्यकता असते, हे कावडीयांना समजावण्याची आवश्यकता होती. मात्र तुम्ही तर डीजे वाजवताय. त्यांना नाचायला लावताय. अशा परिस्थितीत कावडीयांमध्ये धार्मिक भावना कशी येईल. तुम्ही जेव्हा हिंदू-मुस्लिम ही भावना जेव्हा तीव्र कराल तेव्हा भेदभाव निर्माण होईल. प्रत्येक गोष्टीकडे ते हिंदू मुस्लिम या दृष्टीने पाहतील. तसेच त्यांच्यामध्ये कटुता येईल आणि संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल. 

शंकराचार्य पुढे म्हणाले की, आता बरेच हिंदू म्हणतील की, बघा आता हे पुन्हा आमच्याविरोधात बोलत आहेत. मात्र मी जे सांगत आहे, ते खरं आहे. जे घडतंय, ते योग्य आहे, असं मी कसं सांगी शकतो. केवळ मुसलमानाचं दुकान आहे आणि हिंदू नोकर आहे. पदार्थ बनवणारा हिंदू आहे आणि मालक गल्ल्यावर बसलाय, म्हणून आपण असं, म्हणू शकतो, का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

दरम्यान, कावड यात्रेच्या मार्गावरील अन्नपदार्थाच्या दुकानांवर मालकाचं नाव अनिवार्य करण्याचे आदेश उत्तर प्रदेश सरकारने दिले होते. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिली आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथIndiaभारत