शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

‘नेमप्लेट’ वादावरून शंकराचार्यांचा उत्तर प्रदेश सरकारला टोला, म्हणाले, "या निर्णयामुळे…’’   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 22:53 IST

Shankaracharya Avimukteshwaranand Criticize UP Government: कावड यात्रेच्या मार्गातील दुकानदारांना दुकानांवर मालकाचं नाव लावणं सक्तीचं करण्याच्या उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयावर आता ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनीही टीका करत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

सध्या उत्तर प्रदेशसह उत्तरेकडील काही राज्यांमध्ये कावड यात्रेच्या मार्गातील दुकानदारांना दुकानांवर मालकाचं नाव लावण्याच्या सरकारने केलेल्या सक्तीमुळे वाद निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारच्या या निर्णयावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, सरकारच्या निर्णयावर आता ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनीही टीका करत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. नेमप्लेट कायद्यामुळे फायद्यापेक्षा नुकसान होईल. जर दुकानाचा मालक मुस्लिम असेल आणि त्याच्याकडील कर्मचारी हिंदू असतील, तर काय होईल. धर्मांतर करणारेही नाव बदलत नाहीत. मग तुम्ही काय करणार? असा सवाल उपस्थित केला. तसेच कावडीयांकडून डीजे वाजवण्यात येत असल्याबाबतही प्रश्न उपस्थित केला आहे. 

कावड यात्रेत दुकानदारांच्या नावांवरून झालेल्या वादाबाबत ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, अशा प्रकारच्या आदेशांमुळे दोन धर्मातील द्वेष वाढेल. शास्त्रानुसार पवित्रतेची आवश्यकता असते, हे कावडीयांना समजावण्याची आवश्यकता होती. मात्र तुम्ही तर डीजे वाजवताय. त्यांना नाचायला लावताय. अशा परिस्थितीत कावडीयांमध्ये धार्मिक भावना कशी येईल. तुम्ही जेव्हा हिंदू-मुस्लिम ही भावना जेव्हा तीव्र कराल तेव्हा भेदभाव निर्माण होईल. प्रत्येक गोष्टीकडे ते हिंदू मुस्लिम या दृष्टीने पाहतील. तसेच त्यांच्यामध्ये कटुता येईल आणि संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल. 

शंकराचार्य पुढे म्हणाले की, आता बरेच हिंदू म्हणतील की, बघा आता हे पुन्हा आमच्याविरोधात बोलत आहेत. मात्र मी जे सांगत आहे, ते खरं आहे. जे घडतंय, ते योग्य आहे, असं मी कसं सांगी शकतो. केवळ मुसलमानाचं दुकान आहे आणि हिंदू नोकर आहे. पदार्थ बनवणारा हिंदू आहे आणि मालक गल्ल्यावर बसलाय, म्हणून आपण असं, म्हणू शकतो, का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

दरम्यान, कावड यात्रेच्या मार्गावरील अन्नपदार्थाच्या दुकानांवर मालकाचं नाव अनिवार्य करण्याचे आदेश उत्तर प्रदेश सरकारने दिले होते. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिली आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथIndiaभारत