शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

शेतकरी आंदोलन पोहोचले सर्वोच्च न्यायालयात, शंभू बॉर्डर खुली करण्याची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 19:26 IST

Farmers Protest : सोमवारी पुन्हा शेतकरी संघटनांची बैठक होणार आहे.

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. शंभू सीमेसह इतर सर्व सीमा खुल्या करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. गौरव लुथरा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून ही मागणी केली आहे. गौरव लुथरा हे पंजाबचे रहिवासी आहे.  सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, पंजाब सरकार आणि हरयाणा सरकारला सर्व राज्यांच्या सीमा खुल्या करण्याचे आदेश द्यावेत. सीमा बंद करणे हे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे, असे याचिकेत म्हटले आहे.  

या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.  दरम्यान, गेल्या शुक्रवारी दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न केल्यानंतर 101 शेतकऱ्यांच्या समूहाने रविवारी पुन्हा दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न केला, परंतु पंजाबच्या सीमेवर हरयाणाच्या सुरक्षा जवानांनी आंदोलकांवर अश्रुधुराचे नळकांडे आणि पाण्याच्या तोफांचा मारा केला. यावेळी जवळपास नऊ शेतकरी जखमी झाल्याचे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे.यानंतर शेतकऱ्यांचा दिल्लीकडे निघणारा मोर्चा आज तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.

सोमवारी पुन्हा शेतकरी संघटनांची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील कार्यवाही निश्चित केली जाणार आहे. पंजाबचे शेतकरी नेते सर्वन सिंग पंधेर यांनी सांगितले की, किमान नऊ शेतकरी जखमी झाले असून त्यापैकी एकाला चंदीगडमधील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये दाखल करण्यात आले आहे. सिंधू सीमेवर सर्वन सिंग पंधेर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी शेतकऱ्यांच्या समूहाला परत बोलावले आहे. सोमवारी संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाची बैठक होणार आहे. या बैठकीत आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात येणार आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय