शाहनवाज मुल्ला कबड्डी पंच परीक्षेत उत्तीर्ण
By Admin | Updated: July 1, 2014 21:43 IST2014-07-01T21:43:34+5:302014-07-01T21:43:34+5:30
उत्तर सोलापूर: महाराष्ट्र राज्य कबड्डी असो़च्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पंच परीक्षेमध्ये शाहनवाज अब्दुलगनी मुल्ला हे उत्तीर्ण झाले आहेत़ ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गणेशनगर कोंडी तांडा येथे शिक्षक असून, त्यांनी खो-खो, मैदानी, कबड्डी स्पर्धेत जिल्हास्तरीय व राज्यस्तरावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल़े

शाहनवाज मुल्ला कबड्डी पंच परीक्षेत उत्तीर्ण
अ ोला : राज्यातील खाजगी कृषी महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापन कोट्यातून परप्रांतीय विद्यार्थ्यांना सर्रास प्रवेश दिला जात असून, या प्रवेशापोटी त्या विद्यार्थ्यांकडून लाखो रू पये डोनेशन घेतले जात आहे. या प्रकारामुळे कृषी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विदर्भ, मराठवाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे.राज्य शासनाने कृषी विद्यापीठांतर्गत नवीन कृषी महाविद्यालये सुरू केली असून, जागादेखील वाढविल्या आहेत. तसेच खासगी कृषी महाविद्यालयांनाही अनुमती दिली आहे. राज्यात आजमितीस ६४ खासगी कृषी महाविद्यालये आहेत. यात सात उद्यानविद्या, १६ जैवतंत्रज्ञान व आठ कृषी अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. यातील विदर्भात १६ कृषी, दोन उद्यानविद्या, एक जैवतंत्रज्ञान व एक कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा समावेश आहे. या सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण संशोधन परिषदेकडे (एमसीईएआर) ऑनलाइन अर्ज भरावे लागतात. एमसीईएआरकडून या अर्जाची गुणवत्ता यादी तयार केली जाते. तीन टक्के जागा केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनुसार इतर राज्यातील विद्यार्थ्यांकरीता राखीव असतात. २० टक्के जागांवर व्यवस्थापन समितीव्दारे प्रवेश दिला जातो. त्यासाठी एसीएईआरच्या यादीत विद्यार्थ्यांचे नाव असणे अनिवार्य असते. म्हणूनच जो तीन टक्के केंद्रीय पद्धतीने प्रवेश दिला जातो, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ घातला जात आहे. या विद्यार्थ्यांकडून लाखो रू पये डोनेशन घेऊन प्रवेश दिला जात असल्याचा आरोप विदर्भ, मराठवाड्यातील विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. (प्रतिनिधी)़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़कोटखाजगी कृषी महाविद्यालयामध्ये २० टक्के व्यवस्थापन कोटा आहे. या कोट्यातून परप्रांतीय विद्यार्थ्यांचा भरणा केला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. विदर्भ, मराठवाड्यात हे प्रमाण जास्त आहे. या संदर्भात प्रत्येक महाविद्यालयाकडून प्रवेश यादी मागविली आहे.- डॉ. व्ही.एम. भाले, अधिष्ठाता कृषी,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़कोटकृषी महाविद्यालयांना २० टक्के व्यवस्थापन कोटा दिला आहे. त्यामधून हा प्रकार सुरू आहे. असे असले तरी राज्यात कृषी अभ्यासक्रमाच्या जागा वाढविल्या आहेत, त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही.- ॲड़ विजय कोलते, माजी उपाध्यक्ष , एमसीईएआर, पूणे