शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

लग्नावरून घरी परतणाऱ्या कारची ट्रकला धडक; भीषण अपघातात ४ युवक जागीच ठार, २ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 13:39 IST

चुकीच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली. त्यात चौघांचा मृत्यू झाला

शाहजहांपूर - उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूर येथे लग्नावरून घरी परतणाऱ्या ४ युवकांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात कारमधील अन्य २ जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी नजीकच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त कारमधील सर्व युवकांनी दारू प्यायल्याचं उघड झालं आहे. चुकीच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली त्यात ही दुर्घटना घडली आहे. 

घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या दुकानदाराने सांगितले की, अचानक एका मोठा आवाज ऐकायला आला त्यात जवळ जाऊन पाहिले तेव्हा रस्त्यावर भयंकर अपघात झाला होता. त्यानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनेची माहिती पोलीस स्टेशनला कळवली. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी अपघातग्रस्त कारमधील ४ युवकांचे मृतदेह बाहेर काढले अशी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांच्या तपासात हे युवक एका लग्नाहून घरी परतत होते, चुकीच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली. त्यात चौघांचा मृत्यू झाला. लवकरच ट्रक चालकाला अटक करू अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

कारमधील अन्य २ युवकांची स्थिती गंभीर होती. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ दोघांना रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या जखमींची प्रकृती नाजूक आहे. स्थानिकांच्या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त गाडीत अडकलेले ४ युवकांचे मृतदेह बाहेर काढले. कारमधील दोघांची स्थिती गंभीर होती असं पोलिसांनी म्हटलं. गॅस कटरच्या सहाय्याने कारमधील मृतदेह बाहेर काढले. त्यातील २ जण जिवंत असल्याचं आढळलं. रात्रीच्या १२ च्या सुमारास हा अपघात घडला होता. 

दरम्यान, या अपघात २५ वर्षीय राहुल, २७ वर्षीय विनय शर्मा, २२ वर्षीय आकाश, २४ वर्षीय गोपाळ या युवकांचा जागीच मृत्यू झाला तर ३० वर्षीय रोहित कुमार आणि ३५ वर्षीय रजत हे गंभीर जखमी झालेत. या दोघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Accidentअपघात