शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शहिदांचा मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून पाठवला, शहिदांसोबत ही कोणती वागणूक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 06:45 IST

अरुणाचल प्रदेशच्या तवांग येथे झालेल्या हेलिकॉप्टर क्रॅशमधील शहिदांच्या मृतदेहासोबत विटंबना, शहिदांचा मृतदेह तिरंग्याच्या जागी प्लॅस्टिकच्या पिशवीत आणि कागदी बॉक्समध्ये

ठळक मुद्देक्रिकेटपटू गौतम गंभीरने ट्वीटकरून ही लाजीरवाणी घटना असल्याचं म्हटलं आहेपंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्वीटकरून  शहिदांचे कागदाच्या बॉक्समधले फोटो पाहून धक्का बसला...आपण आपल्या शहिदांना अशी वागणूक देतो का? ... असा प्रश्न विचारला आहे.

नवी दिल्ली - अरुणाचल प्रदेशच्या तवांग येथे झालेल्या हेलिकॉप्टर क्रॅशमधील शहिदांच्या मृतदेहासोबत विटंबना झाल्याचा आरोप केला जात आहे. शहिदांचा मृतदेह तिरंग्याच्या जागी प्लॅस्टिकच्या पिशवीत आणि कागदी बॉक्समध्ये ठेवण्यात आल्याचे फोटो समोर आल्यापासून वादाला सुरूवात झाली आहे.  सोशल मीडियावर या घटनेवरून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. क्रिकेटपटू गौतम गंभीरने ट्वीटकरून ही लाजीरवाणी घटना असल्याचं म्हटलं आहे. वाढता वाद पाहता लष्कराने ट्वीट करून ''शहिदांना नेहमीच सन्मान दिला जातो, पण ही नेहमीप्रमाणे मिळणारी वागणूक नव्हती...'' हे मान्य केलं आहे. 

भारतीय हवाई दलाचे एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टर शुक्रवारी सकाळी अरुणाचल प्रदेशमध्ये तवांगजवळ कोसळले.  या दुर्घटनेत एअर फोर्सच्या सात जवानांचा मृत्यू झाला. माजी कमांडर लेफ्टनंट जनरल  एच. एस. पनाग यांनी रविवारी एक फोटो ट्वीट केला. यामध्ये शहिदांचा मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवीत आणि कागदी बॉक्समध्ये ठेवण्यात आल्याचं दिसत होतं. काल सात जवान घरातून मातृभूमीचं रक्षण करण्यासाठई घरातू निघाले होते....आणि अशाप्रकारे ते घरी परतले...असं ट्वीट त्यांनी केलं.

फोटो समोर आल्यानंतर गौतम गंभीरने ही घटना लाजीरवाणी असल्याचं ट्वीट केलं.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्वीटकरून  शहिदांचे कागदाच्या बॉक्समधले फोटो पाहून धक्का बसला...आपण आपल्या शहिदांना अशी वागणूक देतो का? ... असा प्रश्न विचारला आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत असून अमरिंदर सिंग यांच्याप्रमाणेच आपण आपल्या शहिदांना अशी वागणूक देतो का? हा प्रश्न सोशल मीडियावर अनेकजण विचारत आहे.

टॅग्स :MartyrशहीदArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशTawangतवांगGovernmentसरकारindian air forceभारतीय हवाई दल