शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

'शबरीमाला प्रकरणात कोर्टाच्या निर्णयास सरकार बांधील'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 06:47 IST

केरळचे राज्यपाल म्हणतात; महिलांना मंदिरात प्रवेश हे कर्तव्यच

तिरुवनंतपुरम : शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करणे हे केरळ सरकारचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन राज्यपाल न्या. पी. सदाशिवम यांनी केले. विधानसभा अधिवेशनाच्या सुरुवातीला आपल्या संबोधनात ते म्हणाले की, लैंगिक न्याय, सामाजिक न्यायासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.राज्यपाल न्या. पी. सदाशिवम म्हणाले की, शबरीमालाच्या मुद्यावरून जे घटनाक्रम झाले आहेत त्यावरून असे वाटते की, राज्यात पुनर्जागरण आंदोलन आणखी पुढे नेण्याची आवश्यकता आहे. शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश देण्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर गत काही महिन्यांत राज्यात हिंसाचाराच्या अनेक घटना झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना राज्यपाल पी. सदाशिवम म्हणाले की, माकपाच्या नेतृत्वातील सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास कटिबद्ध आहे.शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेशावर प्रतिबंध आणण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवले होते. सर्वोच्च न्यायालयाची सर्वोच्चता कायम ठेवणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)काय आहे प्रकरण?शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर या निर्णयाला केरळातून भाविकांमधून विरोध होत आहे. मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांना हे भाविक रोखत आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे. मंदिर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपालांचे वक्तव्य महत्त्वपूर्ण आहे.

टॅग्स :Sabarimala Templeशबरीमला मंदिरKeralaकेरळSupreme Courtसर्वोच्च न्यायालय