शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अयोध्या निकालाविरुद्ध पुनर्विचार याचिकेला शबाना आझमी, नसरुद्दीन शहांचा विरोध; सांगितले हे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 16:50 IST

निवेदनावर ज्येष्ठ, सामाजिक कार्यकर्ते, वकील, पत्रकार, उद्योजक, कवी, कलाकार, चित्रपट निर्माते आणि नाट्यकालावंतांच्या सह्या आहेत.

ठळक मुद्दे हा मुद्दा जिवंत ठेवल्यास मुस्लिम समुदायाला त्रास सहन करावा लागेल.अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यासह विविध क्षेत्रातील सुमारे १०० मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नामवंत व्यक्ती एकत्र

नवी दिल्ली - अयोध्येत रामजन्मभूमी विवादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत फेरविचार याचिका दाखल करणे मुस्लिमांच्या हिताचे नाही. या कृतीमुळे हिंदू-मुस्लिम ऐक्यावर परिणाम होऊ शकतो, असे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष घायोरूल हसन रिझवी यांनी रविवारी म्हटले होते. अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यासह विविध क्षेत्रातील सुमारे १०० मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नामवंत व्यक्तींनी अयोध्या निकालाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करण्याला विरोध दर्शवला आहे. हा वाद कायम राहिल्यास मुस्लीम समाजाचे नुकसान होऊ शकते असे या सर्वांना वाटते. पुनर्विचार याचिकेला विरोध करण्याबाबतच्या निवेदनावर ज्येष्ठ, सामाजिक कार्यकर्ते, वकील, पत्रकार, उद्योजक, कवी, कलाकार, चित्रपट निर्माते आणि नाट्यकालावंतांच्या सह्या आहेत.

आपल्या संयुक्त निवेदनात असे म्हटले आहे की, या प्रकरणात पुनर्विचार याचिकेमुळे मुस्लिमांना फायदा होण्याऐवजी त्यांचे नुकसान होईल. या निवेदनावर अभिनेता नसीरुद्दीन शाह, अभिनेत्री शबाना आझमी, पत्रकार जावेद अहमद, हैदराबादचे सामाजिक कार्यकर्ते आरिझ अहमद, चेन्नईचे वकील ए.जे. जावद आणि मुंबईचे लेखक अंजुम राजाबाली यांच्यासारख्या नामांकित व्यक्तींनी सह्या केल्या आहेत. या सर्वांच्या मते, भारतीय मुस्लिम समुदाय, घटनात्मक तज्ज्ञ आणि धर्मनिरपेक्ष संस्था या निर्णयाची सुनावणी घेताना कायद्याच्या ऐवजी विश्वासाची बाजू मांडल्याबद्दल नाराज आहेत. मात्र, हा मुद्दा जिवंत ठेवल्यास मुस्लिम समुदायाला त्रास सहन करावा लागेल.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याShabana ajhamiशबाना आझमीNaseeruddin Shahनसिरुद्दीन शाहNew Delhiनवी दिल्लीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय