शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

TMC नेत्याच्या हत्येनंतर बीरभूममध्ये हिंसाचार; 5 घरांना लावली आग, 7 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 12:16 IST

West Bengal : रामपुरहाटमध्ये तृणमूल काँग्रेसच्या उपाध्यक्षाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

बीरभूम : पश्चिम बंगालमधील बीरभूममध्ये तृणमूल काँग्रेस (टीएमसी) नेत्याच्या हत्येनंतर मंगळवारी हिंसाचार उसळला. या ठिकाणी जमावाने 5 घरांचे दरवाजे बंद करून आग लावली. या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला. ही घटना बीरभूममधील रामपूरहाटमधील आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रामपुरहाटमध्ये तृणमूल काँग्रेसच्या उपाध्यक्षाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. येथील जमावाने 5 घरांचे दरवाजे बंद करून आग लावली. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला. घटनेनंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. एवढेच नाही तर डीएमसह बीरभूमचे सर्व अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

तृणमूल काँग्रेस पंचायत नेते भादू शेख यांची सोमवारी बीरभूमच्या रामपुरहाटमध्ये हत्या करण्यात आली. सोमवारी रात्री त्याच्यावर बॉम्ब फेकण्यात आला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भादू शेख हे राज्य महामार्ग 50 वरून जात होते. त्यावेळी अज्ञातांनी त्यांच्यावर बॉम्ब हल्ला केला. त्यानंतर त्यांना रामपूरहाट येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. आठवडाभरापूर्वी दोन नगरसेवकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालTrinamool Congressतृणमूल काँग्रेस